शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

तासगावात मोडकळीस आलेल्या बसच्या वापराप्रकरणी तिघे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 22:13 IST

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बस सुस्थितीत असणे आवश्यक होते. मात्र त्यावेळी मुंंबईला जाणाºया बसची अवस्था धोकादायक होती. त्यामुळे लांब पल्ल्यासाठी चांगल्या बसचा वापर करावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. मात्र या मागणीची दखल घेतली नाही.

ठळक मुद्देआगार व्यवस्थापकांची कारवाई : प्रवाशांच्या लेखी तक्रारीची दखल

तासगाव : मोडकळीस आलेल्या बसचा वापर तासगाव ते मुंबई या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी करण्यात आला होता. याबाबत डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील अभिजित झांबरे यांनी तक्रार केली होती. त्याची दखल घेत आगार व्यवस्थापकांनी याप्रकरणी दोषी आढळणाऱ्या प्रमुख कारागीर, वाहन परीक्षक आणि कारागीर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

दिवाळी सुटी संपल्यानंतर तासगाव आगारातून अभिजित झांबरे मुंबईला जाण्यासाठी निघाले होते.

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बस सुस्थितीत असणे आवश्यक होते. मात्र त्यावेळी मुंंबईला जाणाºया बसची अवस्था धोकादायक होती. त्यामुळे लांब पल्ल्यासाठी चांगल्या बसचा वापर करावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. मात्र या मागणीची दखल घेतली नाही. त्यानंतर झांबरे यांनी स्थानकात तक्रार नोंदवहीत लेखी तक्रार दाखल केली. मुंबईला जाण्यासाठी अन्य कोणता पर्याय नसल्याने प्रवाशांनी जीव मुठीत घेऊनच मुंबईचा प्रवास केला.

झांबरे यांच्या लेखी तक्रारीची तासगावच्या आगार व्यवस्थापकांनी गंभीर देखल घेतली. या प्रकरणाबाबत कारवाई करण्याचे लेखी आश्वासनही दिले. त्यानुसार आगार व्यवस्थापक सी. बी. पाटील यांनी मोडकळीस आलेली बस लांब पल्ल्यासाठी वापरात आणण्यास जबाबदार असणाºया तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.सुरळीत नियोजनाची अपेक्षाआगार व्यवस्थापकांनी प्रवाशांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत कारवाईचे पाऊल उचलले. मात्र तासगाव आगारात अनेक बसेसची अवस्था दयनीय आहे. बसचे वेळापत्रक नेहमीच कोलमडलेले असते. बस फेºयांचे नियोजन प्रवाशांच्या गरजेनुसार होत नाही. त्यामुळे अनेकदा बसेस मोकळ्या जातात, तर अनेकदा बसमधून जाण्यासाठी झुंबड उडते. त्यामुळे आगार व्यवस्थापकांकडून सुरळीत नियोजनासाठीदेखील कारवाईचे पाऊल उचलावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :state transportएसटीpassengerप्रवासी