शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

खोकीधारकांवर टांगती तलवार कायम

By admin | Updated: January 29, 2015 00:07 IST

आष्ट्यातील अतिक्रमणे : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तात्पुरता दिलासा

आष्टा : आष्टा बसस्थानकासमोरील खोकीधारकांची अतिक्रमणे काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यांसाठी नुकतीच स्थगिती दिली आहे, मात्र लवकरच ही अतिक्रमणे काढावी लागणार असल्याने या खोकीधारकांमध्ये ‘थोडी खुशी गम जादा’ अशी भावना आहे.पेठ-सांगली रस्त्यावर आष्ट्यानजीक सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने रस्ता रुंदीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. आष्टा बसस्थानकासमोरील सांगली, आष्टा, इस्लामपूर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे ३५ ते ४0 वर्षापासून अनेक बेरोजगार युवकांनी लोखंडी खोकी टाकून स्वत:चे व्यवसाय सुरु केले. कोणी गॅरेज, सायकल दुकान, आॅटो पार्टस्, वेल्डींग, केशकर्तनालय, तर कोणी पानपट्टी, बेकरी, जनरल स्टोअर्स, रसवंतीगृह, नाष्टा सेंटर, हॉटेल सुरु केले. त्यांनी अनेक बँका, पतसंस्थांची यासाठी कर्जे काढली.सहा महिन्यांपूर्वी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व खोकीधारक यांच्यात बैठक होऊन रस्त्याच्या माध्यमापासून १५ मीटरऐवजी ११ मीटरचा रस्ता, १ मीटर गटार, फुटपाथ सोडून दुकान गाळे खोकी ठेवण्यास मान्यता देण्यात आली. त्याप्रमाणे खोकीधारकांनी खोकी मागे सरकवून घेतली. मात्र लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बदलले, जिल्हाधिकारी यांना आदेश मिळाल्याने जिल्ह्यातील सर्व अतिक्रमणे काढण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आष्टा शहरातील सार्वजनिक बांधकामच्या जागेतील खोकीधारकांचीही अतिक्रमणे काढण्याचे आदेश मिळाल्याने दि. १८ ते २१ पर्यंतची मुदत देऊन ती खोकी काढण्याची नोटीस सर्व १२७ खोकीधारकांना देण्यात आली. आमदार जयंत पाटील, विलासराव शिंदे, नगराध्यक्षा मंगला शिंदे यांनी बैठक घेतली.या नोटिसीनंतर खोकीधारकांमध्ये खळबळ माजली. लाखो रुपये कर्ज काढून उभारलेली दुकाने जाणार, या भीतीने ते हवालदिल झाले. तीन दिवस दुकाने बंद ठेवून त्यांनी या घटनेचा निषेध केला. जिल्हाधिकाऱ्यांना पुनर्वसन करण्याची मागणी करीत निवेदन दिले. माजी आमदार विलासराव शिंदे, मुख्याधिकारी अभिजित राऊत, वाळवा पंचायत समितीचे उपसभापती वैभव शिंदे, विशाल शिंदे, नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे, सुनील माने, शैलेश सावंत यांच्यासह खोकीधारकांची जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याशी बैठक झाली. त्यांनी पर्यायी जागांबाबत चर्चा केली. खोकीधारकांना तीन महिन्याची मुदत दिली. आष्टा बसस्थानक परिसरातील एसटी महामंडळाची जागा, तसेच जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील जागेबाबतही विचार झाला. या जागांबाबत खोकीधारक सकारात्मक असले तरी लवकर निंर्णय होणे आवश्यक आहे. या खोक्यांबरोबर शासनाच्या जागेवरील अन्य अतिक्रमणांवरही हातोडा पडणार असल्याने नागरिकही संभ्रमावस्थेत आहेत. आमदार जयंत पाटील, विलासराव शिंदे यांनी न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. तीन महिन्यांची मुदत असली तरी, तीन महिन्यानंतर काय? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. (वार्ताहर)