शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीसाठी मिरजेतून पंढरपूरला भजनी वीणांचा पुरवठा, दीडशे वर्षापासून अविरत परंपरा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:32 IST

तीन पिढ्यांपासून मिरजेतील सतारमेकरांची निर्मिती

सदानंद औंधेमिरज : आषाढी एकादशीजवळ येत असल्याने वारकऱ्यांसाठी भजनी वीणा तयार करण्यासाठी मिरजेतील तंतुवाद्य कारागिरांची धावपळ सुरू आहे. गेली दीडशे वर्षे मिरजेत तयार झालेल्या भजनी वीणा आषाढी कार्तिक वारीला पंढरपूरला पाठविण्यात येतात.टाळ व मृदंग व वीणेच्या साथीने वारकरी विठ्ठलाची भक्ती करतात. दरवर्षी आषाढी वारीला पंढरपुरात वीस लाख वारकरी जमतात. या वारकऱ्यांसाठी दरवर्षी सुमारे दहा हजार भजनी वीणाची मागणी असते. मात्र या वीणा तयार करणे वेळखाऊ असल्याने एवढ्या मोठ्या संख्येने वीणांच्या मागणीची पूर्तता होऊ शकत नसल्याचे मिरज तंतुवाद्य क्लस्टरचे अध्यक्ष मोहसीन मिरजकर यांनी सांगितले. मिरजेतील तांतुवाद्य कारागीर भजनी वीणा बनविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तीन पिढ्या येथील सतारमेकर या नावाने ओळखले जाणारे मुस्लिम तंतुवाद्य कारागीर भजनी वीणा बनवितात. दरवर्षी मिरजेत मोठ्या प्रमाणात भजनी वीणा तयार होतात. तिसऱ्या व चौथ्या पिढीतही मिरजेत वीणा बनविण्याची परंपरा सुरू आहे. आषाढी एकादशीशिवाय, कार्तिकी एकादशीला आळंदी येथे व नाथषष्ठीला पैठण येथे मिरजेतून भजनी वीणा रवाना होत असल्याचे उस्मानगणी सतारमेकर यांनी सांगितले. वारकऱ्यांसाठी तयार होणाऱ्या भजनी वीणेची किमत साडेतीन ते नऊ हजार रुपयापर्यंत आहे. भजनी वीणा सुमारे पाच वर्षे टिकते. मिरजेतून आयात करून पंढरपुरात विणांची विक्री होते. भजनी वीणेशिवाय पखवाज व तबल्यालाही मागणी असते. तंतुवाद्यनिर्मितीसाठी ख्याती असलेल्या मिरजेतील तंतुवाद्य कारागिरांनी पूर्वजांचा वारसा निष्ठेने जोपासला आहे. देश-विदेशांतील नामांकित गायक-वादकांना मिरजेतून दर्जेदार तंतुवाद्ये पुरविण्यात येतात. देशातील प्रसिद्ध संगीत महोत्सवात कलाकारांना तंतुवाद्यांचा पुरवठा मिरजेतून होतो.२०० वर्षांपासून तंतुवाद्य निर्मितीमिरजेत २०० वर्षांपासून तंतुवाद्य निर्मिती सुरू आहे. मिरजेत तयार होणाऱ्या सतार व तंबोऱ्याला जीआय नामांकनही मिळाले आहे. मिरजेतील तंतुवाद्य कला टिकावी, वाढावी यासाठी उद्योग विभागाने सतार व तंबोरा ही तंतुवाद्ये तयार करणाऱ्या कारागिरांसाठी क्लस्टर योजनेसही काही वर्षांपूर्वी मंजुरी दिली आहे. मिरजेतील तंतवाद्य निर्माते मजीद सतारमेकर यांना नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकादमी संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.