शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

सांगलीत कृष्णाकाठ पणत्यांनी उजळला

By admin | Updated: November 15, 2016 00:32 IST

‘वीर जवान तुझे सलाम ! : ‘एक पणती जवानांसाठी’ उपक्रम; पणत्या प्रज्ज्वलित केल्यानंतर वातावरण धीरगंभीर

सांगली : ‘भारतमाता की जय’, ‘वीर जवान तुझे सलाम’, ‘वंदेमातरम्’ अशा जयघोषात आणि सामाजिक भान जपत सैनिकांच्या कृतज्ञतेपोटी लावलेल्या पणत्यांनी येथील कृष्णाकाठ सोमवारी सायंकाळी उजळून गेला. धीरगंभीर वातावरणात ‘वीर जवान तुझे सलाम! : एक पणती जवानांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. सांगलीकरांनी कृष्णाकाठावर गर्दी करत या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या संकल्पनेतून सोमवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सीमेवर लढताना नुकतेच वीरमरण आलेले दुधगाव (ता. मिरज) येथील शहीद जवान नितीन कोळी यांच्या कुटुंबीयांच्याहस्ते पणती लावून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित सांगलीकरांनी सुरुवातीला वसंत स्फूर्तिस्थळ परिसरात पणत्या लावल्या. यावेळी ‘वीर जवान तुझे सलाम’ असा मजकूर लिहिलेल्या पणत्या प्रज्ज्वलित केल्यानंतर वातावरण धीरगंभीर बनले. यावेळी बोटीमध्ये पणत्यांच्या माध्यमातून अशोक चक्राची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. नदीमध्ये त्या पणत्या प्रज्ज्वलित करण्यात येत होत्या. शहीद नितीन कोळी यांच्या पत्नी संपदा कोळी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य, जिल्हाधिकारी गायकवाड यांच्या पत्नी वंदना गायकवाड, शैलजा पाटील, ऐश्वर्या पाटील आदींनी बोटीतूनच माई घाटापर्यंत येत पणत्या प्रज्वलित केल्या. यानंतर उपस्थित नागरिकांच्या उपस्थितीत माई घाटावरही पणत्या लावण्यात आल्या. यावेळी पाण्यात सोडण्यात आलेल्या पणत्यांमुळे नदीपात्र आकर्षक दिसत होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आयुक्त रवींद्र खेबूडकर, वंदना गायकवाड, आभाळमाया फाऊंडेशनचे प्रमोद चौगुले, एम. एस. राजपूत, नारायण उंटवाले, दत्ता पाटील, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष गोपाल मर्दा, शहीद नितीन कोळी यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांच्या उपक्रमाला प्रतिसाद त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने आणि सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी गायकवाड यांनी कृष्णाकाठ पणत्यांनी उजळविण्याचा उपक्रम हाती घेतला होता. शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने गेला आठवडाभर या उपक्रमाचे नियोजन सुरू होते. सायंकाळच्या सुमारास संपूर्ण कृष्णाकाठ पणत्या आणि त्या प्रज्ज्वलित करण्यासाठी पुढे सरसावलेल्या सांगलीकरांच्या गर्दीने भरून गेला होता.