शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

‘ताकारी, टेंभू’चा ऐन उन्हाळ्यात दिलासा

By admin | Updated: May 26, 2015 00:53 IST

कडेगाव तालुक्यातील चित्र : नियोजनानुसार आवर्तनांमुळे शेतकऱ्यांमधून समाधान

प्रताप महाडिक - कडेगाव -ताकारी आणि टेंभू या दोन्ही सिंचन योजनांची आवर्तने यावर्षी नियोजित वेळेनुसार मिळाली आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात लाभक्षेत्रातील शेतीपिकांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासली नाही. त्यामुळे कडेगाव तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे.कडेगाव तालुक्यात प्रत्येकवर्षी ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनतो. उन्हाळा सुरू झाला की लगेचच अनेक गावांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. परंतु अलीकडच्या काही वर्षांत ताकारी आणि टेंभू योजनांचे पाणी आले आणि पाणीटंचाई कमी झाली. सुरूवातीच्या काळात वीजबिल थकबाकी न भरल्यामुळे दोन्ही योजनांच्या पहिल्या आवर्तनास थोडासा विलंब लागला. परंतु तरी वीजबिल थकबाकी भरण्याची व्यवस्था झाली आणि दोन्ही योजनांचे पहिले आवर्तन सुरू झाले. त्यानंतर दुसरे, तिसरे आणि सध्या चौथे आवर्तनही नियोजित वेळेनुसार सुरू आहे.टेंभू योजनेच्या माध्यमातून कडेगाव तालुक्यातील ४५०० हेक्टर शेतजमिनीला पाणी मिळते. योजनेचे चौथे आवर्तन सुरू आहे. टेंभू योजनेच्या मुख्य कालव्याच्या अस्तरिकरणाचे काम अद्याप अपूर्ण आहे. यामुळे आवर्तन सुरू झाले की पाण्याचा अपव्ययही मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय पोटकालव्यांचीही कामेही अद्याप अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण होताच कडेगाव तालुक्यातील ९५०० हेक्टर लाभक्षेत्राला पाणी मिळेल. त्यामुळे पाणीपट्टीचे दरही कमी होतील. वसुली योग्यप्रकारे होईल आणि योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहण्यास कोणत्याही अडचणी येणार नाहीत.एकंदरीत दोन्ही योजनांच्या माध्यमातून कडेगाव तालुक्याला ऐन उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. दोन्ही योजनांची अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत आणि लाभक्षेत्रामध्ये वाढ व्हावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.अपुरा कर्मचारी वर्गताकारी आणि टेंभू दोन्ही योजनांचा स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग सुरू झाला आहे. लाभक्षेत्र मोजणी, पाणीपट्टी आकारणी, पाणीपट्टी वसुली, आवर्तनांचे नियोजन ही कामे या विभागाकडे सोपविली आहेत. परंतु या विभागाकडे दोन्ही योजनांसाठी अपुरा कर्मचारी वर्ग आहे. यामुळे ही कामे केवळ ३० ते ४० टक्के कर्मचारी पूर्ण करू शकत नाहीत. शासन नवीन कर्मचारी भरती करीत नाही आणि कंत्राटी पध्दतीने कर्मचारी भरती करीत नाही. यामुळे सिंचन व्यवस्थापन विभाग अडचणीत सापडला आहे.यापुढे अडचण नाही...कडेगाव तालुक्यातील ६५०० हेक्टर लाभक्षेत्राला ताकारी योजनेद्वारे पाणी मिळत आहे. काही पोटकालव्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण होताच लाभक्षेत्रातही वाढ होईल. लाभक्षेत्र वाढताच पाणीपट्टी दर कमी करता येतील. यामुळे पाणीपट्टी वसुलीलाही चांगला प्रतिसाद मिळेल. परिणामी वीजबिलाची थकबाकीही राहणार नाही. या साऱ्याचे फलित म्हणून सातत्य राहून योजना कार्यक्षमपणे चालवता येईल. सध्या ६२५० रुपये प्रति एकर इतकी पाणीपट्टी ऊस पिकासाठी आकारली जाते. ही पाणीपट्टी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून वसूल करून घेतात आणि योजनेकडे भरतात. ताकारी योजनेचे सध्या चौथे आवर्तन सुरू आहे. पाटबंधारे विभागाने एप्रिल २०१५ अखेरचे वीजबिलही भरले आहे. आता चौथ्या आवर्तनाचे वीजबिलही पाणीपट्टी वसुलीतून भरण्यास कोणतीही अडचण नाही, त्याचा शेतकऱ्यांना फायदाच होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.