शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

‘ताकारी, टेंभू’चा ऐन उन्हाळ्यात दिलासा

By admin | Updated: May 26, 2015 00:53 IST

कडेगाव तालुक्यातील चित्र : नियोजनानुसार आवर्तनांमुळे शेतकऱ्यांमधून समाधान

प्रताप महाडिक - कडेगाव -ताकारी आणि टेंभू या दोन्ही सिंचन योजनांची आवर्तने यावर्षी नियोजित वेळेनुसार मिळाली आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात लाभक्षेत्रातील शेतीपिकांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासली नाही. त्यामुळे कडेगाव तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे.कडेगाव तालुक्यात प्रत्येकवर्षी ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनतो. उन्हाळा सुरू झाला की लगेचच अनेक गावांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. परंतु अलीकडच्या काही वर्षांत ताकारी आणि टेंभू योजनांचे पाणी आले आणि पाणीटंचाई कमी झाली. सुरूवातीच्या काळात वीजबिल थकबाकी न भरल्यामुळे दोन्ही योजनांच्या पहिल्या आवर्तनास थोडासा विलंब लागला. परंतु तरी वीजबिल थकबाकी भरण्याची व्यवस्था झाली आणि दोन्ही योजनांचे पहिले आवर्तन सुरू झाले. त्यानंतर दुसरे, तिसरे आणि सध्या चौथे आवर्तनही नियोजित वेळेनुसार सुरू आहे.टेंभू योजनेच्या माध्यमातून कडेगाव तालुक्यातील ४५०० हेक्टर शेतजमिनीला पाणी मिळते. योजनेचे चौथे आवर्तन सुरू आहे. टेंभू योजनेच्या मुख्य कालव्याच्या अस्तरिकरणाचे काम अद्याप अपूर्ण आहे. यामुळे आवर्तन सुरू झाले की पाण्याचा अपव्ययही मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय पोटकालव्यांचीही कामेही अद्याप अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण होताच कडेगाव तालुक्यातील ९५०० हेक्टर लाभक्षेत्राला पाणी मिळेल. त्यामुळे पाणीपट्टीचे दरही कमी होतील. वसुली योग्यप्रकारे होईल आणि योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहण्यास कोणत्याही अडचणी येणार नाहीत.एकंदरीत दोन्ही योजनांच्या माध्यमातून कडेगाव तालुक्याला ऐन उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. दोन्ही योजनांची अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत आणि लाभक्षेत्रामध्ये वाढ व्हावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.अपुरा कर्मचारी वर्गताकारी आणि टेंभू दोन्ही योजनांचा स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग सुरू झाला आहे. लाभक्षेत्र मोजणी, पाणीपट्टी आकारणी, पाणीपट्टी वसुली, आवर्तनांचे नियोजन ही कामे या विभागाकडे सोपविली आहेत. परंतु या विभागाकडे दोन्ही योजनांसाठी अपुरा कर्मचारी वर्ग आहे. यामुळे ही कामे केवळ ३० ते ४० टक्के कर्मचारी पूर्ण करू शकत नाहीत. शासन नवीन कर्मचारी भरती करीत नाही आणि कंत्राटी पध्दतीने कर्मचारी भरती करीत नाही. यामुळे सिंचन व्यवस्थापन विभाग अडचणीत सापडला आहे.यापुढे अडचण नाही...कडेगाव तालुक्यातील ६५०० हेक्टर लाभक्षेत्राला ताकारी योजनेद्वारे पाणी मिळत आहे. काही पोटकालव्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण होताच लाभक्षेत्रातही वाढ होईल. लाभक्षेत्र वाढताच पाणीपट्टी दर कमी करता येतील. यामुळे पाणीपट्टी वसुलीलाही चांगला प्रतिसाद मिळेल. परिणामी वीजबिलाची थकबाकीही राहणार नाही. या साऱ्याचे फलित म्हणून सातत्य राहून योजना कार्यक्षमपणे चालवता येईल. सध्या ६२५० रुपये प्रति एकर इतकी पाणीपट्टी ऊस पिकासाठी आकारली जाते. ही पाणीपट्टी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून वसूल करून घेतात आणि योजनेकडे भरतात. ताकारी योजनेचे सध्या चौथे आवर्तन सुरू आहे. पाटबंधारे विभागाने एप्रिल २०१५ अखेरचे वीजबिलही भरले आहे. आता चौथ्या आवर्तनाचे वीजबिलही पाणीपट्टी वसुलीतून भरण्यास कोणतीही अडचण नाही, त्याचा शेतकऱ्यांना फायदाच होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.