शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नेर्ले येथे जवानाच्या पत्नीची दोन मुलांसह पेटवून घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:49 IST

मलकापूर : नेर्ले (ता. शाहूवाडी) येथील विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. स्वाती महेश ...

मलकापूर : नेर्ले (ता. शाहूवाडी) येथील विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. स्वाती महेश पाटील (वय २८), विभावरी महेश पाटील (४), देवांश महेश पाटील (१) अशी या दुर्दैवी माय-लेकरांची नावे आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. आत्महत्येचा हा प्रकार गुरुवारी सकाळी दहा वाजता घडला.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, नेर्ले (ता. शाहूवाडी) येथील शिवाजी बापू पाटील हे पत्नी नंदा, सून स्वाती, नात विभावरी, नातू देवांशसह ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील बंगल्यात एकत्र राहतात. त्यांचा मुलगा व स्वातीचा पती महेश सन २००८ मध्ये सैन्यात भरती झाला असून सध्या तो जैसलमेर (राजस्थान) येथे सेवेत आहे. भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे स्वातीचे माहेर असून तिचे वडील कृष्णा धुमाळ हे व्यवसायानिमित्त सध्या पत्नीसह मुंबईत राहतात. सन २०१३ मध्ये स्वातीचा महेशशी विवाह झाला. सव्वा वर्षांपूर्वी दुसऱ्या मुलाच्या प्रसूतीसाठी स्वाती गावी आली होती. चार वर्षांची मुलगी विभावरी कोकरूड येथील नर्सरी स्कूलमध्ये शिकत होती, तर लहान देवांश नुकताच एक वर्षाचा झाला होता.दरम्यान, शिवाजी पाटील यांच्या घरातील किचनच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. गुरुवारी सकाळी सासू नंदा या साफसफाई उरकून दोन्ही नातवंडांसह शेजारीच असलेल्या नातलगांकडे गेल्या तर सासरे गावातील साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले. दरम्यान, सासू नंदा यांच्याकडे येऊन स्वातीने खाऊ भरविण्याच्या निमित्ताने दोन्ही मुलांना घरी नेले. साखरपुड्याच्या कार्यक्रमावरून सासरे शिवाजी परतल्यानंतर बंगल्याबाहेर झाडाच्या कट्ट्यावर येऊन बसले असता त्यांना काहीतरी जळाल्याचा वास आला. खिडकीतून धूर येऊ लागल्याने घरात शॉर्टसर्किट झाले का म्हणून त्यांनी पत्नीला पाहण्यास सांगितले. यावेळी खोलीचा दरवाजा आतून बंद होता. घरी आलेली मुले व सून दिसत नसल्याने व शंका आल्यामुळे सासूने आरडाओरडा सुरू केला. जमलेल्या नागरिकांनी खोलीचा दरवाजा तोडून आत पाहिले तर स्वातीसह दोन्हीही लहान मुले भाजून निपचित पडली होती. यावेळी स्वाती व विभावरी दोघीही गतप्राण झाल्या होत्या तर लहान देवांशची किंचित हालचाल जाणवल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले परंतु वाटेतच त्याचाही मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचे छायाचित्रण केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविले. खबरदारीचा उपाय म्हणून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी स्ट्रायकिंग फोर्सला घटनास्थळी पाचारण केले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत घटनेची नोंद झाली नव्हती.