शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सुहेल शर्मा यांचीही विजयी सलामी! सांगली महापालिका निवडणूक : अनुचित प्रकार, मारामारीला आळा; शांततेत प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:00 IST

महिन्याभरापासून सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीचे वादळ अखेर शुक्रवारी शांत झाले. या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यात आली.

सचिन लाड ।सांगली : महिन्याभरापासून सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीचे वादळ अखेर शुक्रवारी शांत झाले. या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी निवडणुकीतून विजयी सलामी दिली आहे. ‘बेसिंग पोलिसिंग’वर भर देऊन काम केल्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.शर्मा यांनी तीन महिन्यांपूर्वीच निवडणुकीच्या अनुषंगाने बॅटिंग सुरूकेली होती.

तडीपार, स्थानबद्ध, मोक्का या कारवाईचे चौकार आणि षटकार ठोकले. अवैध धंदेवाल्यांना जम बसवू दिला नाही. प्रतिबंधात्मक कारवाईभर दिला. गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविली. ‘कोम्बिंग आॅपरेशन’, ‘आॅलआऊट’ मोहीम यासारखे प्रयोग केले. या कारवाईचा गुन्हेगारांनी धसका घेतला. पोलीस कारवाईचा ससेमीरा टाळण्यासाठी अनेक गुन्हेगार पडद्याआड गेले. आचारसंहिता लागताच शर्मा यांनी शहरात येणाºया प्रत्येक मार्गावर नाकाबंदीचे पॉर्इंट लावले. या पॉर्इंटवर पोलीस चौक्या उभ्या केल्या. दारूच्या नशेत वाहन चालविणारे तळीराम तर सायंकाळी सातनंतर रस्त्यावर दिसत नव्हते. रात्री नऊनंतर शहर चिडीचूप होत असे.

महापालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली. निकालानंतरही अनुचित प्रकार घडला नाही. कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी सोडली, तर मारामारी अथवा वादावादीचे प्रकार घडले नाहीत. शर्मा यांनी कारवाईबाबत घेतलेला आक्रमक पवित्रा आणि त्यांच्या शिस्तबद्धतेपुढे सर्वांना झुकावे लागले. शर्मा यांच्या प्रत्येक आदेशाचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे अधिकाºयांचीही धावपळ झाली नाही. शहर शांत ठेवण्यासाठी शर्मा व त्यांच्या ‘टीम’ने कारवाईत सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.खडतर काळात सूत्रेपदाची सूत्रे हाती घेऊन सुहेल शर्मा यांना अजून वर्षही पूर्ण झालेले नाही. पोलीस कोठडीत अनिकेत कोथळे खून प्रकरण घडले आणि शर्मा यांच्याकडे जिल्ह्याची सूत्रे आली. तो काळ आव्हानात्मक होता. पोलीस दलाचे खच्चीकरण झाले होते. गुन्ह्यांचा आलेख वाढला होता. घरफोडी, चोरी, चेनस्नॅचिंग या गुन्ह्यांनी कळस गाठला होता. पोलिसांच्या असहायतेचा गुन्हेगारांनी गैरफायदा घेतला. पुढे महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली होती. अशा स्थितीत शर्मा यांनी शिस्तबद्ध काम केले.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकPoliceपोलिस