शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

उसाला ५००० रुपये दर मिळाल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही - राजू शेट्टी

By संतोष भिसे | Updated: October 12, 2023 16:52 IST

द्राक्ष बेदाणा महामंडळाची मागणी

सांगली : ऊसाला प्रतिटन पाच हजार रुपये आणि दुधाला प्रतिलिटर ६० रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे. यासाठी साखर सम्राटांना आणि दूध सम्राटांना झुकविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. सांगलीत गुरुवारी जन आक्रोश पदयात्रेवेळी ते बोलत होते.सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर श्रीफळ वाढवून पदयात्रेचा प्रारंभ झाला. तेथून गणपती मंदिरासमोर साकडे घालण्यात आले. तेथून पदयात्रा मिरजेकडे रवाना झाली. खासदार शेट्टी म्हणाले, शेतकऱ्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबाचा मोबदला मिळाला पाहिजे. त्याच्या कष्टावर साखरसम्राटांचा चैनी करु देणार नाही. यंदाच्या साखर हंगामात वजन काटे ऑनलाईन केल्याशिवाय कारखान्याला ऊस घालणार नाही.स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, ऊसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे, पण त्यानुसार दर देण्यास कारखानदार तयार नाहीत. पण स्वाभिमानी संघटना कारखानदारांकडून दर मिळविल्याशिवाय राहणार नाही. पदयात्रेत संदीप राजोबा, भरत चौगुले, बाबा सांद्रे, जगन्नाथ भोसले, पोपट मोरे, संजय बेले, भागवत जाधव, बाळासाहेब लिंबीकाई, श्रीधर उदगावे आदी सहभागी झाले.द्राक्ष बेदाणा महामंडळाची मागणीस्वाभिमानीच्या मागण्या अशा : ऊस तोडीसाठी पैशांची वसुली थांबवा, साखर उताऱ्यातील चोरी थांबवा, द्राक्ष बेदाणा महामंडळ स्थापन करा, त्यांच्या खप वाढीसाठी जाहिराती सुरू करा, दलालाची नोंदणी करुन अनामत घ्या, दुधाला हमीभाव लागू करा, डाळिंब आणि द्राक्ष प्रक्रिया उद्योग सुरू करा.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेmilkदूधRaju Shettyराजू शेट्टी