शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

सांगली जिल्ह्यात ९४६९ हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:30 IST

सांगली : जिल्ह्यात यंदा साखर कारखान्यांना ८९ हजार ९१८ हेक्टर उसाचे क्षेत्र उपलब्ध होणार आहे. भाजीपाला, कडधान्य पिकांना हमीभाव नसल्यामुळे शेतकरी ऊस पिकाकडे वळल्याचे दिसत आहे

ठळक मुद्देदराचा धोका : सिंचन योजनांमुळे दुष्काळी भागात जादा कलकारखानदारांकडून भविष्यात आर्थिक कोंडी होण्याची भीती

अशोक डोंबाळे ।सांगली : जिल्ह्यात यंदा साखर कारखान्यांना ८९ हजार ९१८ हेक्टर उसाचे क्षेत्र उपलब्ध होणार आहे. भाजीपाला, कडधान्य पिकांना हमीभाव नसल्यामुळे शेतकरी ऊस पिकाकडे वळल्याचे दिसत आहे. वाढत्या उसाच्या क्षेत्राचाही धोका असून, कारखानदारांकडून भविष्यात आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी गेल्या हंगामामध्ये ७१ लाख ६१ हजार ३५९ टन उसाचे गाळप करून ८८ लाख १३ हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. यावेळी जिल्ह्यात ७२ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र होते.ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ आणि वाकुर्डे उपसा सिंचन योजना सुरू झाल्यामुळे ८४४९ हेक्टर उसाचे क्षेत्र वाढले. १४ साखर कारखान्यांनी ९० लाख टन उसाचे गाळप केले व ९८ लाख क्विंटल साखरेचे विक्रमी उत्पादन घेतले. मात्र उत्पादन प्रचंड वाढल्यामुळे साखरेच्या दराचा प्रश्न गंभीर झाला आहे. जिल्ह्यातील कारखान्यांचा हंगाम संपून दोन महिने झाले, तरीही शेतकऱ्यांना अंतिम बिले मिळाली नाहीत. हंगाम सुरू झाल्यापासून साखरेचे दर घसरत आहेत.

परिणामी राज्य बँकेकडून साखरेचे मूल्यांकन कमी करण्यात आले. बँकांकडून पैसे उपलब्ध होत नसल्याने एफआरपी देतानाही कसरत करावी लागत आहे. कारखान्यांना जाहीर केलेला दर देता आलेला नाही. साखरेचे दर पडल्याने उसाला प्रतिटन २५०० रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या कारखान्यांनी एफआरपीएवढी किंवा त्यापेक्षाही जादा रक्कम पहिल्या हप्त्यापोटी देऊ, असे सांगितले होते, त्यांनीही साखरेचे दर खाली येताच एफआरपीची रक्कम देण्यातही हात आखडते घेतले आहेत. कारखाने शॉर्टमार्जिनमध्ये आले आहेत. दोन महिन्यांपासून उसाच्या पहिला हप्त्याचे सुमारे २५० कोटी रुपये थकले आहेत. मात्र भाजीपाल्यातील दराचा धोका लक्षात घेऊन शेतकरी पुन्हा ऊस लागवडीकडेच वळला आहे.

कोबी, ढबू मिरची, दोडक्यास दर नसल्यामुळे तो फेकावा लागल्याच्या घटना मागील महिन्याभरात जिल्ह्यात घडल्या. तूर, मूग, सोयाबीनलाही हमीभाव नसल्यामुळे दर वारंवार कमी होत आहेत. यापेक्षा ऊस पिकाला धोका कमी आणि एफआरपीचा दर निश्चित केला आहे. याचा विचार करूनच शेतकरी उसाची लागवड करू लागला आहे. मात्र वाढत्या ऊस क्षेत्राचा शेतकºयांबरोबरच साखर कारखानदार आणि शासनालाही धोका आहे. शेतकºयांना एफआरपीनुसार दर देणे कायद्यानेच कारखानदारांना बंधनकारक आहे. कारखाने शॉर्टमार्जिनमध्ये गेल्यास शासनालाच कोट्यवधीची भरपाई द्यावी लागणार आहे.

शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्यात दोन ते तीन हजार हेक्टरने, तर तासगाव, खानापूर, जत, आटपाडी या दुष्काळी तालुक्यात दुपटीने उसाचे क्षेत्र वाढले आहे. दुष्काळी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आणि पाणीही कमी उपलब्ध होत आहे. तरीही शेतकरी उसाची लागवड करण्याकडे वळत आहे.जिल्ह्यातील उसाचे क्षेत्रतालुका २०१७-१८ २०१८-१९मिरज १४०८२ १३८११वाळवा २५०७० २७२८६शिराळा ५९५७ ७९२४तासगाव ३६६८ ७१२४पलूस १०१३६ ११०८८एकूण ८०४४९ ८९९१८तालुका २०१७-१८ २०१८-१९खानापूर १२३३ ३०२९आटपाडी ४०५ ९१४क़ महांकाळ३७२५ २२८३जत ५०८ ८६९कडेगाव १५६६५ १८१६४

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने