शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या ७६ व्यावर्षी नोंदली यशोगाथा । ऐतवडेच्या निवृत्त शिक्षकाने घेतले १९२ टन ऊस उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:56 IST

लागण आणि भरणीवेळी सेंद्रिय खत वापरले. ६ आठवड्यांनी नत्र दिले. त्यानंतर तीन दिवसांनी मायक्रोशक्ती, संजीवके, कीटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी घेतली. आठवड्याने पुन्हा नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये देऊन फुटवा आलेल्या उसाची बाळबांधणी केली.

ठळक मुद्देनिवृत्तीनंतरचे जीवन शेतीला समर्पित । तरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शक कामगिरी

युनूस शेख ।इस्लामपूर : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील ७६ वर्षीय निवृत्त शिक्षकाने उत्तम व्यवस्थापन आणि शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ६० गुंठे क्षेत्रात १९२ टन उसाचे उत्पादन घेण्याचा विक्रम नोंदवला. त्यांना एकरी १२८ टनाचा सर्वोच्च उतारा मिळाला. त्यांनी ८६०३२ या जातीच्या दोन डोळा टिपरी बियाणांची लागण केली होती. प्रत्येक ऊस हा २२ ते २५ कांड्यांचा होता.

बळवंत दत्तू गायकवाड असे या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. निवृत्त होऊन त्यांना १६ वर्षांचा कालावधी झाला आहे. निवृत्तीनंतर त्यांनी कष्टाच्या जोरावर ही यशोगाथा निर्माण केली आहे.शेताची पूर्वमशागत करतानाच गायकवाड यांनी सेंद्रिय खतांचा वापर केला. राजाराम बायोअर्थ, शेणखत, समृद्ध खताने ही मशागत करून सरी सोडल्या. ऊस बेण्यावर सिटो जिवाणूंचा बेसल डोस दिल्यावर लागण केली. लागण आणि भरणीवेळी सेंद्रिय खत वापरले. ६ आठवड्यांनी नत्र दिले. त्यानंतर तीन दिवसांनी मायक्रोशक्ती, संजीवके, कीटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी घेतली. आठवड्याने पुन्हा नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये देऊन फुटवा आलेल्या उसाची बाळबांधणी केली.

उसाच्या वाढीनुसार खत मात्रेत वाढ करताना, प्रत्येक आठवड्यास संजीवके, कीटकनाशक, विद्राव्य खते ही ठिबक सिंचन संचातून दिली. भरणीवेळी एनपीके खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीच्या कसानुसार दिली. ऊस वाढीसाठी राजाराम नायट्रो प्लस, फॉस्फो प्लस, केएसबी, मेटारायझियम अशा जिवाणू खतांचा वापर प्राधान्याने केला.निवृत्तीनंतर गायकवाड यांंनी घेतलेली मेहनत आणि त्यांना मिळालेले यश हे तरूण शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे. अन्य शेतकºयांनी त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे.

या यशाबद्दल राजारामबापू कारखान्याचे मार्गदर्शक, अर्थमंत्री जयंत पाटील, अध्यक्ष पी. आर. पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

  • ठिबकद्वारे जिवाणू

प्रत्येक ३ महिन्याने ठिबकद्वारे जिवाणू सोडण्याचे नियोजन १० महिन्यांपर्यंत केले. उसाचा पाला काढणे, तणनाशक फवारणी केल्याने वाढीला मदत झाली. ६ डिसेंबरला या उसाची तोडणी झाल्यावर बळवंत गायकवाड यांच्या कष्टाला हे यश मिळाले. योग्य नियोजनातून शेती व्यवसायात यश मिळते हे त्यांनी दाखवून दिले आहे.

 

  • माती परीक्षण

ऐतवडे बुद्रुक येथील आपल्या ६० गुंठे शेतीमध्ये जून २०१८ मध्ये ऊस बियाणांची लागण केली. त्यापूर्वी मातीचा पोत माती परीक्षणातून माहिती करून घेतला. त्यानुसार ठिबक सिंचनाचे पाणी, जैविके खते, कीटकनाशके, बुरशीनाशकांची मात्रा ठरवली. या प्रयोगात त्यांना राजारामबापू कारखान्याचे व्यवस्थापन आणि शेती विभागाची मोठी मदत मिळाली.

ऐतवडे बुदुक (ता. वाळवा) येथील बळवंत गायकवाड यांनी मोठ्या कष्टातून ६० गुंठे क्षेत्रात उसाचे १९२ टन उत्पादन घेऊन यशस्वी शेती केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी