शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

वयाच्या ७६ व्यावर्षी नोंदली यशोगाथा । ऐतवडेच्या निवृत्त शिक्षकाने घेतले १९२ टन ऊस उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:56 IST

लागण आणि भरणीवेळी सेंद्रिय खत वापरले. ६ आठवड्यांनी नत्र दिले. त्यानंतर तीन दिवसांनी मायक्रोशक्ती, संजीवके, कीटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी घेतली. आठवड्याने पुन्हा नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये देऊन फुटवा आलेल्या उसाची बाळबांधणी केली.

ठळक मुद्देनिवृत्तीनंतरचे जीवन शेतीला समर्पित । तरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शक कामगिरी

युनूस शेख ।इस्लामपूर : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील ७६ वर्षीय निवृत्त शिक्षकाने उत्तम व्यवस्थापन आणि शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ६० गुंठे क्षेत्रात १९२ टन उसाचे उत्पादन घेण्याचा विक्रम नोंदवला. त्यांना एकरी १२८ टनाचा सर्वोच्च उतारा मिळाला. त्यांनी ८६०३२ या जातीच्या दोन डोळा टिपरी बियाणांची लागण केली होती. प्रत्येक ऊस हा २२ ते २५ कांड्यांचा होता.

बळवंत दत्तू गायकवाड असे या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. निवृत्त होऊन त्यांना १६ वर्षांचा कालावधी झाला आहे. निवृत्तीनंतर त्यांनी कष्टाच्या जोरावर ही यशोगाथा निर्माण केली आहे.शेताची पूर्वमशागत करतानाच गायकवाड यांनी सेंद्रिय खतांचा वापर केला. राजाराम बायोअर्थ, शेणखत, समृद्ध खताने ही मशागत करून सरी सोडल्या. ऊस बेण्यावर सिटो जिवाणूंचा बेसल डोस दिल्यावर लागण केली. लागण आणि भरणीवेळी सेंद्रिय खत वापरले. ६ आठवड्यांनी नत्र दिले. त्यानंतर तीन दिवसांनी मायक्रोशक्ती, संजीवके, कीटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी घेतली. आठवड्याने पुन्हा नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये देऊन फुटवा आलेल्या उसाची बाळबांधणी केली.

उसाच्या वाढीनुसार खत मात्रेत वाढ करताना, प्रत्येक आठवड्यास संजीवके, कीटकनाशक, विद्राव्य खते ही ठिबक सिंचन संचातून दिली. भरणीवेळी एनपीके खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीच्या कसानुसार दिली. ऊस वाढीसाठी राजाराम नायट्रो प्लस, फॉस्फो प्लस, केएसबी, मेटारायझियम अशा जिवाणू खतांचा वापर प्राधान्याने केला.निवृत्तीनंतर गायकवाड यांंनी घेतलेली मेहनत आणि त्यांना मिळालेले यश हे तरूण शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे. अन्य शेतकºयांनी त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे.

या यशाबद्दल राजारामबापू कारखान्याचे मार्गदर्शक, अर्थमंत्री जयंत पाटील, अध्यक्ष पी. आर. पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

  • ठिबकद्वारे जिवाणू

प्रत्येक ३ महिन्याने ठिबकद्वारे जिवाणू सोडण्याचे नियोजन १० महिन्यांपर्यंत केले. उसाचा पाला काढणे, तणनाशक फवारणी केल्याने वाढीला मदत झाली. ६ डिसेंबरला या उसाची तोडणी झाल्यावर बळवंत गायकवाड यांच्या कष्टाला हे यश मिळाले. योग्य नियोजनातून शेती व्यवसायात यश मिळते हे त्यांनी दाखवून दिले आहे.

 

  • माती परीक्षण

ऐतवडे बुद्रुक येथील आपल्या ६० गुंठे शेतीमध्ये जून २०१८ मध्ये ऊस बियाणांची लागण केली. त्यापूर्वी मातीचा पोत माती परीक्षणातून माहिती करून घेतला. त्यानुसार ठिबक सिंचनाचे पाणी, जैविके खते, कीटकनाशके, बुरशीनाशकांची मात्रा ठरवली. या प्रयोगात त्यांना राजारामबापू कारखान्याचे व्यवस्थापन आणि शेती विभागाची मोठी मदत मिळाली.

ऐतवडे बुदुक (ता. वाळवा) येथील बळवंत गायकवाड यांनी मोठ्या कष्टातून ६० गुंठे क्षेत्रात उसाचे १९२ टन उत्पादन घेऊन यशस्वी शेती केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी