शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
4
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
5
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
6
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
7
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
8
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
9
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
10
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
11
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
12
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
13
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
14
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
15
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
16
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
17
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
18
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
19
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
20
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 

वयाच्या ७६ व्यावर्षी नोंदली यशोगाथा । ऐतवडेच्या निवृत्त शिक्षकाने घेतले १९२ टन ऊस उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:56 IST

लागण आणि भरणीवेळी सेंद्रिय खत वापरले. ६ आठवड्यांनी नत्र दिले. त्यानंतर तीन दिवसांनी मायक्रोशक्ती, संजीवके, कीटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी घेतली. आठवड्याने पुन्हा नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये देऊन फुटवा आलेल्या उसाची बाळबांधणी केली.

ठळक मुद्देनिवृत्तीनंतरचे जीवन शेतीला समर्पित । तरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शक कामगिरी

युनूस शेख ।इस्लामपूर : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील ७६ वर्षीय निवृत्त शिक्षकाने उत्तम व्यवस्थापन आणि शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ६० गुंठे क्षेत्रात १९२ टन उसाचे उत्पादन घेण्याचा विक्रम नोंदवला. त्यांना एकरी १२८ टनाचा सर्वोच्च उतारा मिळाला. त्यांनी ८६०३२ या जातीच्या दोन डोळा टिपरी बियाणांची लागण केली होती. प्रत्येक ऊस हा २२ ते २५ कांड्यांचा होता.

बळवंत दत्तू गायकवाड असे या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. निवृत्त होऊन त्यांना १६ वर्षांचा कालावधी झाला आहे. निवृत्तीनंतर त्यांनी कष्टाच्या जोरावर ही यशोगाथा निर्माण केली आहे.शेताची पूर्वमशागत करतानाच गायकवाड यांनी सेंद्रिय खतांचा वापर केला. राजाराम बायोअर्थ, शेणखत, समृद्ध खताने ही मशागत करून सरी सोडल्या. ऊस बेण्यावर सिटो जिवाणूंचा बेसल डोस दिल्यावर लागण केली. लागण आणि भरणीवेळी सेंद्रिय खत वापरले. ६ आठवड्यांनी नत्र दिले. त्यानंतर तीन दिवसांनी मायक्रोशक्ती, संजीवके, कीटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी घेतली. आठवड्याने पुन्हा नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये देऊन फुटवा आलेल्या उसाची बाळबांधणी केली.

उसाच्या वाढीनुसार खत मात्रेत वाढ करताना, प्रत्येक आठवड्यास संजीवके, कीटकनाशक, विद्राव्य खते ही ठिबक सिंचन संचातून दिली. भरणीवेळी एनपीके खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीच्या कसानुसार दिली. ऊस वाढीसाठी राजाराम नायट्रो प्लस, फॉस्फो प्लस, केएसबी, मेटारायझियम अशा जिवाणू खतांचा वापर प्राधान्याने केला.निवृत्तीनंतर गायकवाड यांंनी घेतलेली मेहनत आणि त्यांना मिळालेले यश हे तरूण शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे. अन्य शेतकºयांनी त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे.

या यशाबद्दल राजारामबापू कारखान्याचे मार्गदर्शक, अर्थमंत्री जयंत पाटील, अध्यक्ष पी. आर. पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

  • ठिबकद्वारे जिवाणू

प्रत्येक ३ महिन्याने ठिबकद्वारे जिवाणू सोडण्याचे नियोजन १० महिन्यांपर्यंत केले. उसाचा पाला काढणे, तणनाशक फवारणी केल्याने वाढीला मदत झाली. ६ डिसेंबरला या उसाची तोडणी झाल्यावर बळवंत गायकवाड यांच्या कष्टाला हे यश मिळाले. योग्य नियोजनातून शेती व्यवसायात यश मिळते हे त्यांनी दाखवून दिले आहे.

 

  • माती परीक्षण

ऐतवडे बुद्रुक येथील आपल्या ६० गुंठे शेतीमध्ये जून २०१८ मध्ये ऊस बियाणांची लागण केली. त्यापूर्वी मातीचा पोत माती परीक्षणातून माहिती करून घेतला. त्यानुसार ठिबक सिंचनाचे पाणी, जैविके खते, कीटकनाशके, बुरशीनाशकांची मात्रा ठरवली. या प्रयोगात त्यांना राजारामबापू कारखान्याचे व्यवस्थापन आणि शेती विभागाची मोठी मदत मिळाली.

ऐतवडे बुदुक (ता. वाळवा) येथील बळवंत गायकवाड यांनी मोठ्या कष्टातून ६० गुंठे क्षेत्रात उसाचे १९२ टन उत्पादन घेऊन यशस्वी शेती केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी