शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पूरबाधित गावे पुन्हा सर्वांग सुंदर बनविण्यासाठी योगदान द्यावे - सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 18:21 IST

पूर ओसरला असून लोक आपआपल्या गावांकडे परतत आहेत. उध्वस्त झालेली गावे, संसार पुन्हा सावरून त्यांना पुन्हा नव्या उमेदीने जीवन सुरू करण्यासाठी त्यांचा परिसर, गावे सर्वांगाने सुंदर बनविण्यासाठी सर्वांनी पुढे येवून भरीव योगदान द्यावे, असे प्रतिपादन सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देपूरबाधित गावे पुन्हा सर्वांग सुंदर बनविण्यासाठी योगदान द्यावे - सुभाष देशमुखसामाजिक संस्था, संघटना व प्रशासन यांच्यासमवेत बैठक

सांगली : पूर ओसरला असून लोक आपआपल्या गावांकडे परतत आहेत. उध्वस्त झालेली गावे, संसार पुन्हा सावरून त्यांना पुन्हा नव्या उमेदीने जीवन सुरू करण्यासाठी त्यांचा परिसर, गावे सर्वांगाने सुंदर बनविण्यासाठी सर्वांनी पुढे येवून भरीव योगदान द्यावे, असे प्रतिपादन सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.पूरबाधितांना मदत करण्यासाठी शासन युध्दपातळीवर प्रयत्न करत आहेच, यासोबतच विविध सामाजिक संस्था, संघटनाही प्रयत्न करत आहेत. या सर्वांनी एकाच छत्राखाली येवून सुसुत्रपणे मदत केल्यास कोणीही पुरबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही. यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सामाजिक संस्था, संघटना व प्रशासन यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बैठक घेतली.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, विशेष कार्य अधिकारी रविंद्र खेबुडकर, महावितरणच्या संचालिका निता केळकर, दिपक शिंदे (म्हैसाळकर), विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.पूरबाधितांना मदत करण्यासाठी समाजातील वेगवेगळे घटक वेगवेगळ्या पध्दतीने काम करीत आहेत. हे काम एकत्रित व समन्वयाने झाल्यास सर्व पुरबाधितांपर्यंत मदत पोहोचेल त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल कक्ष तयार करण्यात आला आहे. सर्वांनी या कक्षांतर्गत काम करावे, असे आवाहन करून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, पुरबाधितांना मानसिक, आर्थिक आधाराची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन केले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली डिझास्टर ग्रुप तयार करण्यात आला असून सर्व संघंटनांनी एका छत्राखाली येवून कामाचे नियोजन केल्यास अधिक सुसुत्रता येईल असे सांगून प्रत्येक पुरबाधित गावासाठी एक अधिकारी नियुक्त केला आहे. गावांच्या पुनर्बांधणीसाठी पुढे येणाऱ्या संस्थेसोबत प्रशासनातर्फे एमओयु करण्यात येईल. एखादे गाव संस्थेने दत्तक घेतल्यानंतर करता येण्यासारख्या बाबींचा करार केला जाईल, असे सांगून मदतीच्या सुयोग्य नियोजनासाठी तसेच अडचणी अथवा मदत हवी असल्यास आपत्ती निवारण कक्षाच्या 9370333932, 8208689681, 0233-2600500, टोल फ्री क्रमांक 1077 या क्रमांकावर संपर्क साधा, आम्ही त्यां नोंदवून घेऊ व संबंधित अधिकाऱ्यांच्यामार्फत त्यांचे निवारण करू असे सांगितले.अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी स्वच्छता, आरोग्य, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, घरे, इमारतींचे सर्व्हेक्षण, शिक्षण, एकात्मिक बाल विकास सेवा आदि क्षेत्रामध्ये एनजीओ, विविध संघटनांमार्फत मदत मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले.यावेळी विविध संस्था, संघटनांनी सर्व सामाजिक संघटना, सर्व एनजीओ यांनी आपत्तीवर मात करण्यासाठी प्रशासनाबरोबर कटिबध्द आहेत. आयटी सर्व्हिसेससह जीवनोपयोगी वस्तू, शालोपयोगी वस्तू, आरोग्य, स्वच्छता, समुपदेशन आदि सर्व क्षेत्रांमध्ये प्रशासनाच्या बरोबर राहून मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली