शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीजवळच व्हायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST

सांगली : विद्यापीठ कायदा २०१६ मधील तरतुदीनुसार शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्रासाठी जिल्ह्याच्या मुख्यालयापासून २५ किलोमीटरच्या आतील जागा देण्याची मागणी खुद्द ...

सांगली : विद्यापीठ कायदा २०१६ मधील तरतुदीनुसार शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्रासाठी जिल्ह्याच्या मुख्यालयापासून २५ किलोमीटरच्या आतील जागा देण्याची मागणी खुद्द विद्यापीठानेच केली आहे. शिक्षणमंत्र्यांनी कोणालाच विश्वासात न घेता बस्तवडेत उपकेंद्रासाठी तत्त्वत: मान्यता दिली आहे. हे उपकेंद्र सांगलीजवळच हवे, असे मत उपकेंद्र कृती समितीचे निमंत्रक ॲड. अमित शिंदे यांनी व्यक्त केले.

शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये उपकेंद्र व्हावे, अशी मागणी सुरू झाली आहे; परंतु कायद्यातील तरतूद पाहिल्यास उपकेंद्रासाठी केवळ जागा किंवा भौगोलिक क्षेत्र इतकाच निकष नाही. तरतुदीनुसार ते केंद्र हे जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणार आहे. प्रशासकीय सोयीसोबतच संशोधन, शैक्षणिक विस्तार, विस्तारित उपक्रम तसेच विद्यापीठाची कार्यक्षमता व प्रभाव वाढण्याच्या दृष्टीने या केंद्राची निर्मिती करावयाची आहे. त्याचबरोबर विद्यार्थी, महाविद्यालय, शिक्षक व कर्मचारी असा ज्यांचा प्रत्यक्ष संबंध विद्यापीठाशी येणार आहे, त्यांची संख्या सांगली, मिरज, कुपवाड भागात सर्वात जास्त आहे. त्यांना येणे-जाणे सोयीचे व्हावे, वाहतूक व्यवस्था, रेल्वे व इतर सोयीसुविधा जवळ असणे आवश्यक आहे. त्यामुळे हे उपकेंद्र सांगली व मिरज शहरालगत होणे आवश्यक आहे.

हे केंद्र तासगाव तालुक्यातील बस्तवडे गावी करण्यासाठी तत्त्वतः मान्यता मिळाल्याचे समजते. बस्तवडे हे ठिकाण जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ४५ किलोमीटर लांब पडते व जाण्यासाठी २ ते अडीच तासांचा कालावधी लागतो. समितीच्या माध्यमातून आम्ही कुलगुरु, जिल्हाधिकारी व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता;

परंतु शिक्षणमंत्र्यांनी बैठक घेताना सर्वांना विश्वासात घेतले नाही, तरीही जिल्ह्याच्या ठिकाणापासून २५ किमीच्या अंतरावरील जागेलाच अंतिम मान्यता मिळणार आहे. मग ती कोणत्याही मतदारसंघात येवो. उपकेंद्र म्हणजे दुष्काळ निवारणाचे केंद्र नाही. त्यामुळे ते सांगलीजवळच उभारायला हवे.

यासंदर्भात समितीची बैठक पार पडली. यावेळी रोहित शिंदे, तेजस नांद्रेकर, अभिषेक खोत, सागर माळी, महालिंग हेगडे, जयंत जाधव, आदित्य नाईक, अनिरुद्ध हजारे, मयूर लोखंडे आदी उपस्थित होते.