शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

वैद्यकीय प्रवेशाचे गणित यावर्षी बदलणार, ‘कट ऑफ’बाबत बांधले जातायत अंदाज 

By अविनाश कोळी | Updated: June 28, 2025 19:16 IST

यंदा सहाशे पार केवळ १,३३२ 

अविनाश कोळीसांगली : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता प्रवेश प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजून कोणतीही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नसली तरी विद्यार्थी आणि पालकांमध्ये वैद्यकीय प्रवेशासाठीचा कट ऑफ किती राहील, याबाबत अंदाज बांधले जात आहेत. यंदाच्या निकालात पाचशेहून अधिक गुण मिळविणाऱ्यांची संख्या ५९ हजार ५०३ इतकी आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशाचे चित्र मागील वर्षीपेक्षा प्रचंड भिन्न राहील.यंदा तुलनेने गेल्या कित्येक वर्षात सर्वाधिक कठीण पेपर आल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. कमी गुणांमुळे आपल्याला वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळेल की नाही, याची भीती विद्यार्थी आणि पालकांना वाटत होती. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक कमी गुण असूनही चांगली आली आहे.यावर्षी पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यालाच ६८६ गुण मिळाले आहेत. यावर्षी ५००हून अधिक गुण मिळवणारे देशभरात फक्त ५९ हजार ५०३ विद्यार्थी असल्यामुळे यंदा वैद्यकीय प्रवेशाचा कटऑफ मोठ्या प्रमाणात खाली येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुणनिहाय विद्यार्थी संख्यागुण  - विद्यार्थी१४४-२००  - ३,०३,०४०२०१-२५०  - १,९८,३४६२५१-३०० -  १५७,९५२३०१-३५० -  १,२६,९३५३५१-४०० -  १,०५,५७८४०१-४५० -  ८८,२३९४५१-५०० -  ६९,५०३५०१-५५० -  ३९,५२१५५१-६०० -  १०,६५८६०१-६५० -  १२५९६५१-६८६  -  ७३

गतवर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक चांगली आली असल्यामुळे ऑल इंडिया कौन्सिलिंगचा कट ऑफ कमी येणार आहे. महाराष्ट्रातील प्रवेशासाठी महाराष्ट्रातील गुणवत्ता यादीतील क्रमांक (स्टेट मेरिट लिस्ट) आणि महाराष्ट्रातील कॅटेगरी क्रमांक किती आहे, हे महत्त्वाचे आहे. तरीही गतवर्षीपेक्षा खूप कमी गुणांना महाराष्ट्रात प्रवेश मिळण्याची संधी आहे.  - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली