शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ योजनेत राजकीय हस्तक्षेप थांबवा

By admin | Updated: December 29, 2016 00:32 IST

अजितराव घोरपडे : पाणी वापर शेतकरी संघटना स्थापन करणार; मिरजेत शेतकऱ्यांची बैठक

मिरज : शासनाने म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याबाबत निश्चित धोरण ठरवावे. योजनेचे पाणी सोडण्याच्या धोरणात अधिकाऱ्यांचा व राजकीय हस्तेक्षप झाल्यास तो सहन केला जाणार नाही. प्रसंगी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी बुधवारी दिला. पाणी वापर शेतकरी संघटना स्थापन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मिरजेतील बाजार समितीमध्ये म्हैसाळ योजनेच्या पाणी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी घोरपडे व म्हैसाळ योजनेचे अधिकारी सूर्यकांत नलवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांची बैठक पार पडली. बाजार समितीचे संचालक दीपक शिंंदे, शंकर गायकवाड यांनी नियोजन केले. अभियंत्यांनी योजनेच्या थकबाकीची माहिती दिली. २०१५-१६ मध्ये योजनेचे १५० दिवस पाणी सोडण्यात आले. ४० हजार एकर शेती क्षेत्राला लाभ मिळाला. गत वर्षाच्या थकीत बिलापोटी साखर कारखान्यांनी ४ कोटी ९० लाख शेतकऱ्यांनी २ कोटी ८१ लाख व शासनाकडून ५ कोटी १७ लाख अशी एकूण १२ कोटी ८ लाख जमा झाले. सध्या २६ कोटी ४५ लाख थकीत आहे. जतला सोडलेल्या पाण्याची आकारणी स्वतंत्र केली असल्याने ती वगळत मिरज व कवठेमहांकाळची २१ कोटी पाणीपट्टी थकीत आहे. आवर्तन सुरू करण्यासाठी थकीत वसुली महत्त्वाची असल्याचे सांगितले. पाणीपट्टीच्या थकीत वसुलीवरून शेतकरी व अधिकाऱ्यांत वादही झाले. पाणीपट्टीच्या आगाऊ रकमा भरूनही पाणी मिळाले नाही. अधिकाऱ्यांमुळे काही शेतकऱ्यांना वसुलीत सवलत मिळाल्याने बिले भरणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय झाला. पाणी सोडण्याबाबत निश्चित धोरण नसल्याने त्याचा फटका बसत असल्याच्या तक्रारी केल्या. पाणी सोडल्यानंतरच वसुली करावी व पाणी वाटप संस्था स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. घोरपडे म्हणाले की, म्हैसाळ योजनेवर सुमारे दोन हजार कोटीहून अधिक खर्च होऊनही १४ वर्षात पाणी वितरण व्यवस्था, गळती व पाणीपट्टी वसुलीच्या नियोजनाकडे दुर्लक्ष आहे. पाणी वापराचे मोजमाप करुन योग्य पाणीपट्टी आकारणी करा. न परवडणाऱ्या पाणीपट्टीमुळे शेतकरी नुकसानीतच आहेत.आमदार असताना पाणी वाटप संस्था स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. तो आजही अमलात न आल्याने पाणी वाटप व वसुलीची समस्या कायम आहे. अधिकाऱ्यांच्या व राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपाने योजनेचे पाणी सोडण्याच्या धोरणात करण्यात येणारे बदल अन्याय करणारे आहेत. यापुढे कोणताही बडा नेता व अधिकाऱ्याकडून पाणी सोडण्याच्या धोरणात बदलासाठी हस्तक्षेप झाल्यास खपवून घेणार नाही, असा इशारा घोरपडे यांनी दिला. (वार्ताहर)धोरण हवे : मुख्यमंत्र्यांची भेट घेणार म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर बागायत क्षेत्र अवलंबून आहे. थकबाकीत शासनाकडून सवलत मिळण्याची अपेक्षा असली तरी, शासनाचे नेमके धोरण काय आहे. यासह योजनेच्या इतर समस्यावर मुख्यमंत्री व संबंधित विभागाच्या मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. ७ जानेवारीच्या आत ही चर्चा होईल. चर्चेनंतर शासनाच्या धोरणावर चर्चा करण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांची बैठक होईल, असे घोरपडे यांनी सांगितले. पाणी वापर शेतकरी संघटनापाणी वापर शेतकरी संघटना स्थापन करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी लढा उभारणार असल्याचे घोरपडे यांनी बैठकीत घोषित केले.