शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
2
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
3
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
4
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
5
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
6
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
7
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
8
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
9
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
10
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
11
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
12
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
13
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
14
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
15
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
16
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
17
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
18
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
19
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
20
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...

सांगली जिल्ह्यातील उपचाराविना मृत्यूच्या घटना थांबवा : संजय विभुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 15:41 IST

सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असताना जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षित काम होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे तातडीने गांभिर्याने पावले उचलून वाढणारे मृत्यू थांबवावेत, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील उपचाराविना मृत्यूच्या घटना थांबवा : संजय विभुतेशिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सांगली : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असताना जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षित काम होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे तातडीने गांभिर्याने पावले उचलून वाढणारे मृत्यू थांबवावेत, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.जिल्हाप्रमुखांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना निवेदन दिले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्याचवेळी उपचाराविना मरणाऱ्यांचे प्रमाणही गेल्या काही दिवसात वाढले आहे.

अशा परिस्थितीत प्रशासनाकडून ज्यापद्धतीने निर्णय होणे अपेक्षित आहे त्यापद्धतीने होताना दिसत नाहीत. ग्रामीण भागामध्ये रुग्णांची वेळेत तपासणी होणे, वेळेत अहवाल देणे या गोष्टी होत नसल्याने संक्रमण वाढत आहे. त्यामुणे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.यावर उपाय म्हणून हंगामी तत्वावर डॉक्टर व परिचारिकांची तातडीने भरती करावी. कोविड रु्रग्णांना ६ हजार ५00 रुपयांऐवजी ३ हजार रुपयांमध्ये चाचणी उपलब्ध करून द्यावी. महात्मा फुले योजनेअंतर्गत सर्व जाचक अटी रद्द करून कोरोना रुग्णांना योजनोचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळवून देता येईल, याविषयी प्रयत्न करावेत.

कोरोनावर उपचार घेण्यासाठी परराज्यातून येत असलेल्या रुग्णांना त्यांच्या राज्यातच परत पाठवण्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना कराव्यात. कारण जिल्ह्यातील रु्रग्णांना अगोदर बेड मिळत नाहीत आणि त्यातच परराज्यातून रुग्ण आले तर आपल्या जिल्ह्यातील रुग्णांचे हाल होणार आहेत. यावर ठोस उपाययोजना करावी. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये सांगली जिल्ह्यासाठी ५०० बेडचे आॅक्सिजन आणि व्हेंटिलेटर असणारे मोठे कोवीड सेंटर उभारण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आणि महापालिका क्षेत्रातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या तालुक्?यातील तहसीलदार, पोलीस, निरीक्षक तालुका आरोग्य अधिकारी आणि इतर सर्व काम करणाऱ्या लोकांची समन्वय समिती स्थापन करावी. कारण जोपर्यंत आपण त्यांच्यावर जबाबदारी देऊन काम करत नाही, समन्वय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या बाबतीमध्ये उपाययोजना करणे अवघड होणार आहे. त्यामुळे समन्वय समिती स्थापन करून रोजच्या रोज त्याचा अहवाल आपल्याकडे मागवून घ्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShiv SenaशिवसेनाSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी