शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

भूसंपादनास विरोधासाठी काँग्रेसचा रास्ता रोको मिरज-पंढरपूर रस्त्यावर वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:32 IST

मिरज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गास भूसंपादनाला विरोधासाठी काँग्रेस नेते प्रा. सिध्दार्थ जाधव यांच्या नेतृत्वाखाली टाकळी, बोलवाड व मालगाव परिसरातील शेतकऱ्यांनी

ठळक मुद्दे: राष्ट्रीय महामार्गाला विरोध; मिरज - पंढरपूर रस्त्यावर आंदोलन

मिरज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गास भूसंपादनाला विरोधासाठी काँग्रेस नेते प्रा. सिध्दार्थ जाधव यांच्या नेतृत्वाखाली टाकळी, बोलवाड व मालगाव परिसरातील शेतकऱ्यांनी मिरज-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. शेतकºयांच्या जनसुनावणीत संमत झाल्याप्रमाणे रत्नागिरी-नागपूर महामार्ग व्हावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आमदार सुरेश खाडे यांनी, शाळेजवळून महामार्ग जावा यासाठी राजकीय वजन वापरून सुमारे १०० मीटर महामार्गात बदल केला आहे. यामुळे मालगाव, सुभाषनगर, टाकळी, बोलवाड येथील शेतकऱ्यांची ५५ घरे, २२ विहिरी, कूपनलिका, जनावरांचे गोठे बाधित होऊन जमीनदोस्त होणार आहेत. यापूर्वी जनसुनावणीमध्ये पाच रस्त्यांचे पर्याय सुचविण्यात आले होते. त्याप्रमाणे पर्याय क्रमांक तीन सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. यामुळे केवळ दोनच घरे बाधित होऊन क्षारपड व नापीक जमिनीतून महामार्ग जाणार होता. त्यामुळे पर्याय क्रमांक तीनप्रमाणेच महामार्ग करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली.

काँग्रेस नेते प्रा. सिध्दार्थ जाधव म्हणाले, आ. खाडे सुडाचे राजकारण करीत आहेत. एरंडोलीत रस्ताच नसलेल्या ठिकाणी पूल बांधत आहेत. लोकप्रतिनिधी जनतेचा सेवक असतो, हे आमदारांना माहीत नाही. माजी सभापती अनिल आमटवणे म्हणाले, जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करणाºयांवर गुन्हे दाखल करून आ. खाडे सुडाचे राजकारण करीत आहेत. मतदार संघात त्यांनी कोणतेही विधायक काम केलेले नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी सतत आंदोलने करताना आम्ही सत्ताधाºयांच्या दबावाला बळी पडणार नाही.

मालगावचे शेतकरी किशोर सावंत म्हणाले, स्वत:च्या फायद्यासाठी आ. खाडे शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. त्याचा हिशेब येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी देतील.

नामदेव करगणे म्हणाले, शेतकरीविरोधी भाजप सरकारचे आमदार असल्याने आ. खाडे शेतकºयांच्या विरोधातच आहेत. शेतकºयांनी प्रा. सिध्दार्थ जाधव यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन त्यांनी केले.मालगाव, सुभाषनगर, टाकळी, बोलवाड, भोसे, कळंबी, कवठेमहांकाळ पसिरातील शेतकरी आंदोलनात सहभागी होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रास्ता रोकोमुळे सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती.चुकीचे अधिग्रहणमूळ महामार्गाच्या आराखड्याऐवजी चुकीच्या पध्दतीने अधिग्रहण प्रक्रिया सुरू असल्याचा व जमीन अधिग्रहण करताना लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाने बागायत शेतीतून महामार्ग वळविण्यात आल्याचा आरोप यावेळी प्रा. सिध्दार्थ जाधव यांनी केला.राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनास विरोधासाठी काँग्रेस नेते प्रा. सिध्दार्थ जाधव यांच्या नेतृत्वाखाली टाकळी, बोलवाड व मालगाव परिसरातील शेतकऱ्यानी मिरज-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.