शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पोलीस-सामाजिक कार्यकर्त्यांतील संघर्ष थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:25 IST

सांगली : नागरिकांची बाजू घेऊन भांडणाऱ्या सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांचा पोलीस व प्रशासनाशी मतभेद होऊ शकतात, मात्र त्यातून अकारण संघर्ष ...

सांगली : नागरिकांची बाजू घेऊन भांडणाऱ्या सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांचा पोलीस व प्रशासनाशी मतभेद होऊ शकतात, मात्र त्यातून अकारण संघर्ष व कारवाईची भूमिका घेऊ नये, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीने शनिवारी जिल्हाधिकारी व जिल्हा पाेलीसप्रमुखांकडे केली.

समितीचे सतीश साखळकर, महेश पाटील, प्रशांत भोसले, आनंद देसाई यांनी प्रत्यक्ष भेटून अधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सांगलीतील नळभाग परिसरातील पोलीस कारवाईने लॉकडाऊनच्या परिस्थितीत नागरिकांत घबराहट दिसून येत आहे. पोलीस प्रशासनाकडून होणारा बंदोबस्त व बंदोबस्तादरम्यान नागरिकांच्यातून दिसणारा असंतोष सद्य परिस्थितीत समजून घेण्याजोगा आहे. लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांत असंतोष आहे. अशा परिस्थितीमध्ये समाजातील प्रमुख लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांना नागरिकांची बाजू घेऊन वेळप्रसंगी प्रशासनाशी संघर्ष करावा लागतो . यातून प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये गैरसमज, तक्रारी होण्याची शक्‍यता नेहमीच असते, पण याचा अर्थ प्रशासनाने लोकप्रतिनिधींना समाजकंटकाच्या भूमिकेत उभे करणे योग्य नाही.

आसिफ बावा व मित्रपरिवार नेहमी समाजात सलोखा राखण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतात. दलित, मुस्लीम, बहुजन समाजासहीत सर्व समाजात व सर्व स्थरात काम करतात. नळभागात मागील आठवड्यात पोलीस व नागरिकांत हुज्जत होत असताना मध्यस्थीसाठी आलेले आसिफ बावा व काही तरुणांची पोलिसांशी वादावादी झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. असे असले तरी यापैकी सर्व तरुण योग्य व्यवसाय करून निवारा करणाऱ्या वर्गातील असून कोणीही समाजकंटक अथवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाहीत.

त्यामुळे याप्रकरणी सलोखा राखून पोलीस कारवाई सौम्य करावी. पोलीस प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सलोख्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर पृथ्वीराज पवार, हणमंत पवार, नगरसेवक संतोष पाटील, अभिजित भोसले, मंगेश चव्हाण, अमर पडळकर, आश्रफ वांकर, उमेश देशमुख, महेश खराडे, डॉ संजय पाटील, प्रशांत भोसले, अविनाश जाधव, राहुल पाटील, किरणराज कांबळे, सुरेश दुधगावकर, ज्योती आदाटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.