शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

सावत्र आईने तीन मुली पळविल्या

By admin | Updated: April 7, 2017 00:11 IST

सावत्र आईने तीन मुली पळविल्या

शिराळा : बांबवडे (ता. शिराळा) येथील विद्या मानसिंग धुमाळ (वय ३५) या विवाहितेने आपल्या तीन सावत्र मुलींना पळवून नेल्याची घटना बुधवार, दि. ५ रोजी घडली. याबाबत गुरुवारी शिराळा पोलिसात मानसिंग धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. स्नेहल मानसिंग धुमाळ (वय १६), तृप्ती मानसिंग धुमाळ (१४), श्रेया मानसिंग धुमाळ (११) अशी त्या मुलींची नावे आहेत.मानसिंग यांच्या पहिल्या पत्नीस तीन मुली आहेत. ती मुंबईला गेल्यानंतर त्यांनी या घराशी कोणतेही संबंध ठेवले नाहीत. दुसरी पत्नीही जास्त दिवस नांदली नाही. मानसिंग यांच्या मावशी इस्लामपूर बसस्थानकाजवळ केळी विक्रीचा व्यापार करतात. त्यांच्याकडे दि. १५ जानेवारी रोजी विद्या नावाची महिला आली व मी एकटीच असल्याने मला कोणाचेही पाठबळ नाही, असे तिने सांगितले.यावेळी मावशी आशाताई कांबळे यांनी, तू माझ्या भाच्याबरोबर लग्न करशील का? असे विचारले. यानंतर दि. १६ जानेवारीला मानसिंग यांचा तिसरा विवाह विद्या हिच्याबरोबर झाला. यावेळी विद्याने मी टाकळी (जि. लातूर) या गावची असल्याचे सांगितले. यानंतर जवळपास अडीच महिने विद्या घरातील सासरे हिंदुराव धुमाळ, सासू यशोदा धुमाळ, पती व तीनही मुलींचा विश्वास संपादन करीत संसार करीत होती. बुधवार, दि. ५ रोजी दुपारी १ वाजता सासरे व सासू शेतात गेले, तर पती मानसिंग हे पेट्रोलपंपावर नोकरीस असल्याने कासेगाव येथे गेले होते. त्यावेळी स्नेहल, तृप्ती, श्रेया या तीनही मुलींना कपडे व साहित्यासह घेऊन विद्या बाहेर पडली.सुरुवातीला मानसिंग, रमेश धुमाळ, विलास धुमाळ यांनी कऱ्हाड, इस्लामपूर आदी ठिकाणी शोध घेतला. मात्र, त्यांचा कोठेच पत्ता लागला नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री उशिरा शिराळा पोलिसांत फिर्यादी देण्यात आली.पोलिसांनी लातूर जिल्ह्यातील टाकळीसह विविध गावांमध्ये त्यांचा शोध घेतला. मात्र, विद्या नावाची महिला नसल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.