शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

सावत्र आईने तीन मुली पळविल्या

By admin | Updated: April 7, 2017 00:11 IST

सावत्र आईने तीन मुली पळविल्या

शिराळा : बांबवडे (ता. शिराळा) येथील विद्या मानसिंग धुमाळ (वय ३५) या विवाहितेने आपल्या तीन सावत्र मुलींना पळवून नेल्याची घटना बुधवार, दि. ५ रोजी घडली. याबाबत गुरुवारी शिराळा पोलिसात मानसिंग धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. स्नेहल मानसिंग धुमाळ (वय १६), तृप्ती मानसिंग धुमाळ (१४), श्रेया मानसिंग धुमाळ (११) अशी त्या मुलींची नावे आहेत.मानसिंग यांच्या पहिल्या पत्नीस तीन मुली आहेत. ती मुंबईला गेल्यानंतर त्यांनी या घराशी कोणतेही संबंध ठेवले नाहीत. दुसरी पत्नीही जास्त दिवस नांदली नाही. मानसिंग यांच्या मावशी इस्लामपूर बसस्थानकाजवळ केळी विक्रीचा व्यापार करतात. त्यांच्याकडे दि. १५ जानेवारी रोजी विद्या नावाची महिला आली व मी एकटीच असल्याने मला कोणाचेही पाठबळ नाही, असे तिने सांगितले.यावेळी मावशी आशाताई कांबळे यांनी, तू माझ्या भाच्याबरोबर लग्न करशील का? असे विचारले. यानंतर दि. १६ जानेवारीला मानसिंग यांचा तिसरा विवाह विद्या हिच्याबरोबर झाला. यावेळी विद्याने मी टाकळी (जि. लातूर) या गावची असल्याचे सांगितले. यानंतर जवळपास अडीच महिने विद्या घरातील सासरे हिंदुराव धुमाळ, सासू यशोदा धुमाळ, पती व तीनही मुलींचा विश्वास संपादन करीत संसार करीत होती. बुधवार, दि. ५ रोजी दुपारी १ वाजता सासरे व सासू शेतात गेले, तर पती मानसिंग हे पेट्रोलपंपावर नोकरीस असल्याने कासेगाव येथे गेले होते. त्यावेळी स्नेहल, तृप्ती, श्रेया या तीनही मुलींना कपडे व साहित्यासह घेऊन विद्या बाहेर पडली.सुरुवातीला मानसिंग, रमेश धुमाळ, विलास धुमाळ यांनी कऱ्हाड, इस्लामपूर आदी ठिकाणी शोध घेतला. मात्र, त्यांचा कोठेच पत्ता लागला नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री उशिरा शिराळा पोलिसांत फिर्यादी देण्यात आली.पोलिसांनी लातूर जिल्ह्यातील टाकळीसह विविध गावांमध्ये त्यांचा शोध घेतला. मात्र, विद्या नावाची महिला नसल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.