शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

सावत्र आईने तीन मुली पळविल्या

By admin | Updated: April 7, 2017 00:11 IST

सावत्र आईने तीन मुली पळविल्या

शिराळा : बांबवडे (ता. शिराळा) येथील विद्या मानसिंग धुमाळ (वय ३५) या विवाहितेने आपल्या तीन सावत्र मुलींना पळवून नेल्याची घटना बुधवार, दि. ५ रोजी घडली. याबाबत गुरुवारी शिराळा पोलिसात मानसिंग धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. स्नेहल मानसिंग धुमाळ (वय १६), तृप्ती मानसिंग धुमाळ (१४), श्रेया मानसिंग धुमाळ (११) अशी त्या मुलींची नावे आहेत.मानसिंग यांच्या पहिल्या पत्नीस तीन मुली आहेत. ती मुंबईला गेल्यानंतर त्यांनी या घराशी कोणतेही संबंध ठेवले नाहीत. दुसरी पत्नीही जास्त दिवस नांदली नाही. मानसिंग यांच्या मावशी इस्लामपूर बसस्थानकाजवळ केळी विक्रीचा व्यापार करतात. त्यांच्याकडे दि. १५ जानेवारी रोजी विद्या नावाची महिला आली व मी एकटीच असल्याने मला कोणाचेही पाठबळ नाही, असे तिने सांगितले.यावेळी मावशी आशाताई कांबळे यांनी, तू माझ्या भाच्याबरोबर लग्न करशील का? असे विचारले. यानंतर दि. १६ जानेवारीला मानसिंग यांचा तिसरा विवाह विद्या हिच्याबरोबर झाला. यावेळी विद्याने मी टाकळी (जि. लातूर) या गावची असल्याचे सांगितले. यानंतर जवळपास अडीच महिने विद्या घरातील सासरे हिंदुराव धुमाळ, सासू यशोदा धुमाळ, पती व तीनही मुलींचा विश्वास संपादन करीत संसार करीत होती. बुधवार, दि. ५ रोजी दुपारी १ वाजता सासरे व सासू शेतात गेले, तर पती मानसिंग हे पेट्रोलपंपावर नोकरीस असल्याने कासेगाव येथे गेले होते. त्यावेळी स्नेहल, तृप्ती, श्रेया या तीनही मुलींना कपडे व साहित्यासह घेऊन विद्या बाहेर पडली.सुरुवातीला मानसिंग, रमेश धुमाळ, विलास धुमाळ यांनी कऱ्हाड, इस्लामपूर आदी ठिकाणी शोध घेतला. मात्र, त्यांचा कोठेच पत्ता लागला नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री उशिरा शिराळा पोलिसांत फिर्यादी देण्यात आली.पोलिसांनी लातूर जिल्ह्यातील टाकळीसह विविध गावांमध्ये त्यांचा शोध घेतला. मात्र, विद्या नावाची महिला नसल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.