शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

शेतकरी पेन्शनसाठी राज्यव्यापी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:22 IST

सांगली : ‘पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, अशा घोषणा देत रविवारी सांगलीत शेतकºयांनी पेन्शनसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार केला. विधिमंडळावर मोर्चासह रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करून शासनाला जाग आणू. आता पेन्शन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराही देण्यात आला.सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर जनता दलाच्यावतीने शेतकरी पेन्शन परिषदेचे आयोजन ...

सांगली : ‘पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, अशा घोषणा देत रविवारी सांगलीत शेतकºयांनी पेन्शनसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार केला. विधिमंडळावर मोर्चासह रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करून शासनाला जाग आणू. आता पेन्शन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराही देण्यात आला.सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर जनता दलाच्यावतीने शेतकरी पेन्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील होते. यावेळी राज्य सरचिटणीस शिवाजीराव परुळेकर, हमाल पंचायतीचे नेते बापूसाहेब मगदूम, बाळासाहेब कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. के. डी. शिंदे उपस्थित होते.शरद पाटील म्हणाले की, शेतकºयांची ताकद एकवटली तर मुख्यमंत्री, शासनालाही पळ काढावा लागेल. त्यांना पेन्शन दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आज वयोवृद्ध शेतकºयांची अवस्था बिकट आहे. मुले, सुना सांभाळत नाहीत. माणसांची पांजरपोळ असलेली वृद्धाश्रमे वाढली आहेत. १९९२ मध्ये आर. आर. पाटील यांनी विधिमंडळात शेतकºयांच्या पेन्शनवर चर्चा घडवून आणली. तसा ठरावही झाला. पण २५ वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. पेन्शनसाठी राज्यव्यापी लढा उभारून शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडू. दीड वर्षानी लोकसभेच्या निवडणुका आहेत. आमदार, खासदार मते मागायला येतील. तेव्हा पेन्शन द्या, मगच मतदान करू, अशी भूमिका घ्यावी लागेल. प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेऊन जनमत तयार केले जात आहे. त्यातून शासनाला शेवटचा टोला लगावू, असा इशाराही दिला.शिवाजीराव परुळेकर म्हणाले की, नरेंद्र मोदींचे सरकार व्यापारी, उद्योजकांचे आहे. भाजपच्या पक्षनिधीसाठी दहा दिवसांत ८० हजार कोटी रुपये जमा केले. शेतकºयांना दोन हजार पेन्शन देण्यास भाजपची काय हरकत आहे. आधी वीज बिलात ३० टक्के वाढ केली; मग कृषी संजीवनी योजना लागू करून शेतकºयांचेच खिसे कापण्याचा उद्योग शासनाने केला आहे. त्यामुळे पेन्शनसाठी मोठा लढा उभा करावा लागेल.बाळासाहेब कुलकर्णी म्हणाले की, आधी पेन्शन, मग मतदान, अशी भूमिका शेतकºयांनी घेतली पाहिजे. त्यासाठी राजकीय पक्षांचे झेंडे बाजूला ठेवून शेतकºयांनी एकजूट व्हावे, असे आवाहन केली, तर के. डी. शिंदें यांनी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. यावेळी डॉ. जयपाल चौगुले, बी. डी. पाटील, गोपाळ पाटील, बी. आर. पाटील यांचीही भाषणे झाली.यावेळी माजी नगरसेवक मोहन जाधव, विठ्ठल खोत, संजय ऐनापुरे, आबा सागर, डॉ. लक्ष्मण शिंदे, मुनाफ पटेल, प्रमोद ढेरे, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी हरिभाऊ दशवंत, शशिकांत गायकवाड उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जनार्दन गोंधळी यांनी, तर आभार शशिकांत गायकवाड यांनी मानले.भाजपचे शासन निगरगटप्रा. शरद पाटील म्हणाले की, केंद्र व राज्यातील भाजपचे शासन निगरगट आहे. शासनाने संजय गांधी, श्रावणबाळ, शेतमजूर अशा गोंडस नावाखाली काही योजना सुरू केल्या; पण त्याला इतक्या जाचक अटी लावल्या की, लाभार्थी शोधूनही सापडणार नाही. क्रिमिलेअरचे उत्पन्न ८ लाखांपर्यंत वाढविले. आठ लाख उत्पन्न असलेल्यांना सवलती मिळणार, मग ५० हजार उत्पन्न असलेल्या शेतकºयांना सवलत देण्यास शासनाचा हात आखडता का? असा सवालही त्यांनी केला.दोन शरद खवळले!राज्यातील दोन शरद खवळले आहेत. एक शरद पवार. तब्बल तीस वर्षांनंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. नागपूर येथे ते मोर्चात गेले. त्यांनी शासनाची देणी देऊ नका, असे आवाहन जनतेला केले आहे. दुसरे जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष शरद पाटील. ते सर्वसामान्य शेतकºयांच्या पेन्शनसाठी संघर्ष करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पेन्शन घेतल्याशिवाय माघार घेऊ नका, असे आवाहन शिवाजीराव परुळेकर यांनी केले.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली