शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

ऊसाला राज्यबंदी लावताय, 'तर टनाला पाच हजार रुपये द्या'

By संतोष भिसे | Updated: September 16, 2023 18:34 IST

दुष्काळाच्या सवलती जाहीर कराव्यात

सांगली : ऊसाला राज्यबंदी लावणार असाल, तर कारखान्यांनी प्रतिटन पाच हजार रुपये दर द्यावा असे आवाहन शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य महादेव कोरे यांनी केले आहे. दर मिळणार नसेल, तर शेतकरी आपले उत्पादन कोठेही विकण्यास स्वतंत्र राहील असेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाने ऊस परराज्यात पाठविण्यास बंदीचा आदेश शुक्रवारी काढला आहे. यंदा राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम ऊसाच्या उत्पादनावर होणार आहे. राज्यातील कारखान्यांना ऊस कमी पडण्याच्या शक्यतेने परराज्यात ऊस पाठवता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. शेतकरी संघटनेने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरे म्हणाले, शेतकऱ्याने पिकविलेल्या ऊसाची मालकी शेतकऱ्याचीच आहे.  कारखाने किंवा सरकारला मालकी दाखवता येणार नाही. जो चांगला भाव देईल, त्याला आपले उत्पादन विकण्यास शेतकरी स्वतंत्र आहे. राज्य सरकारच्या आदेशाचा गैरफायदा घेत कारखाने दर पाडण्याचे कारस्थान करण्याची भिती आहे. कारखान्यांचे हित पाहणाऱ्या सरकारने आपण प्रथम शेतकऱ्यांच्या कल्याणाशी बांधील आहोत हे लक्षात ठेवावे. कारखाने चालवायचे असतील, तर ऊसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव द्यावा.कोरे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत साऱखरेचा भाव ३५ रुपयांवरुन ४५ रुपयांपर्यंत गेला आहे. फक्त २० टक्के साखर सर्वसामान्य लोक वापरतात. उर्वरित ८० टक्के साखर उद्योगांकडून वापरली जाते. उद्योगांनी साखरेपासूनच्या उत्पादनांचे भाव सतत वाढवत नेले आहेत. पण त्याचा कोणताही फायदा  शेतकऱ्यांना होत नाही. त्याशिवाय ऊसाचा उत्पादन खर्चही वाढला आहे. या स्थितीत शेतकऱ्यांचा ऊस अडविण्याचे पाप सरकारने करु नये. चांगला भाव देणाऱ्या कारखान्याला ऊस पाठविण्यासाठी त्याला मोकळीक द्यावी. अन्यथा, शेतकरी संघटना मार्ग शोधेल.दुष्काळाच्या सवलती जाहीर कराव्यातकोरे म्हणाले की, ऑक्टोबर महिना तोंडावर आला, तरी पुरेसा पाऊस झालेला नाही. हवामानाचे अंदाज फोल ठरले असून खरीप हंगाम कोरडाच गेला आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळाच्या सवलती त्वरित जाहीर कराव्यात.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने