शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

ST Strike : प्रवाशांचे हाल, पण आमचंही जगणं बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 13:53 IST

संतोष भिसे सांगली : एसटीच्या संपामुळे प्रवासी बांधवांचे हाल होताहेत, पण आमच्याही जगण्या-मरण्याचा प्रश्न गंभीर आहे अशी भूमिका एसटी ...

संतोष भिसेसांगली : एसटीच्या संपामुळे प्रवासी बांधवांचे हाल होताहेत, पण आमच्याही जगण्या-मरण्याचा प्रश्न गंभीर आहे अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली. संपामुळे प्रवाशांच्याही सहनशीलतेचा अंत पाहिला जातोय, त्यामुळे संपावरील तोडग्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

जिल्ह्यात ८ नोव्हेंबरपासून १०० टक्के संप सुरू आहे. आजवर १० कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. बसस्थानके खासगी गाड्यांनी भरून गेली आहेत. त्यांच्याकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. स्थानकाबाहेरच ठिय्या मारून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत प्रवाशांची ससेहोलपट सुरू आहे. वडापसाठी दुप्पट आणि तिप्पट प्रवासभाडे आकारले जात आहे. त्यामुळे हा संप लवकरात लवकर मिटावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.

अब तक २७६

- संप सुरू झाल्यापासून जिल्ह्यात आजवर २७६ जणांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे.

- सतरा कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी बडतर्फ करण्यात आले असून त्यामध्ये कंत्राटींचा समावेश आहे.

- त्याशिवाय प्रत्येक आगारात अनेकांना सेवामुक्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. कामावर या, अन्यथा कायमचे घरी जा असा इशारा दिला आहे.

प्रवाशांना त्रास, पण आमचे प्रश्नही महत्त्वाचेच

आमच्या संपामुळे प्रवाशांना त्रास होत असला, तरी आमचे प्रश्नही महत्त्वाचेच आहेत. एसटीचे शासनात विलीनीकरण झाल्याविना ते सुटणार नाहीत. आमच्या वेदना प्रवासी समजून घेतील अशी अपेक्षा आहे. - योगेश कांबळे, एसटी कर्मचारी

अत्यंत तुटपुंज्या वेतनावर आम्हांला घर चालवावे लागते. शासनाकडे वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. म्हणूनच विलीनीकरणाचा लढा सुरू केला आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे.- नागराज कांबळे, एसटी कर्मचारी.

मागण्या योग्य, पण वेठीस धरू नका

ऐन दिवाळीत एसटी बंद राहिल्याने एसटीचे हक्काचे उत्पन्न बुडाले. खासगी वाहनांना जास्त पैसे देऊन आम्हांला प्रवास करावा लागला. एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर अडून राहू नये. - विनायक कोष्टी, प्रवासी, सांगली

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्यच आहेत, पण त्यासाठी प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नाही. लॉकडाऊन काळात कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाने केले, हे लक्षात घेऊन सकारात्मक भूमिका ठेवावी. - लक्ष्मण कोळी, प्रवासी, तासगाव

संपामुळे १५ कोटींचे नुकसान

गेल्या १५ दिवसांत संपामुळे जिल्ह्यात एसटीला सुमारे १५ कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. भरघोस उत्पन्न देणारी पंढरपूरची कार्तिकी यात्राही सुनीसुनीच गेली. पुण्याला धावणाऱ्या काही खासगी शिवशाही गाड्यांमुळे थोडीफार प्रवासी वाहतूक सुरू आहे. सांगली, मिरज, शिराळा, विटा या आगारांचे नुकसान मोठे आहे.

टॅग्स :SangliसांगलीST Strikeएसटी संपpassengerप्रवासी