शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike : प्रवाशांचे हाल, पण आमचंही जगणं बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 13:53 IST

संतोष भिसे सांगली : एसटीच्या संपामुळे प्रवासी बांधवांचे हाल होताहेत, पण आमच्याही जगण्या-मरण्याचा प्रश्न गंभीर आहे अशी भूमिका एसटी ...

संतोष भिसेसांगली : एसटीच्या संपामुळे प्रवासी बांधवांचे हाल होताहेत, पण आमच्याही जगण्या-मरण्याचा प्रश्न गंभीर आहे अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली. संपामुळे प्रवाशांच्याही सहनशीलतेचा अंत पाहिला जातोय, त्यामुळे संपावरील तोडग्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

जिल्ह्यात ८ नोव्हेंबरपासून १०० टक्के संप सुरू आहे. आजवर १० कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. बसस्थानके खासगी गाड्यांनी भरून गेली आहेत. त्यांच्याकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. स्थानकाबाहेरच ठिय्या मारून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत प्रवाशांची ससेहोलपट सुरू आहे. वडापसाठी दुप्पट आणि तिप्पट प्रवासभाडे आकारले जात आहे. त्यामुळे हा संप लवकरात लवकर मिटावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.

अब तक २७६

- संप सुरू झाल्यापासून जिल्ह्यात आजवर २७६ जणांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे.

- सतरा कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी बडतर्फ करण्यात आले असून त्यामध्ये कंत्राटींचा समावेश आहे.

- त्याशिवाय प्रत्येक आगारात अनेकांना सेवामुक्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. कामावर या, अन्यथा कायमचे घरी जा असा इशारा दिला आहे.

प्रवाशांना त्रास, पण आमचे प्रश्नही महत्त्वाचेच

आमच्या संपामुळे प्रवाशांना त्रास होत असला, तरी आमचे प्रश्नही महत्त्वाचेच आहेत. एसटीचे शासनात विलीनीकरण झाल्याविना ते सुटणार नाहीत. आमच्या वेदना प्रवासी समजून घेतील अशी अपेक्षा आहे. - योगेश कांबळे, एसटी कर्मचारी

अत्यंत तुटपुंज्या वेतनावर आम्हांला घर चालवावे लागते. शासनाकडे वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. म्हणूनच विलीनीकरणाचा लढा सुरू केला आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे.- नागराज कांबळे, एसटी कर्मचारी.

मागण्या योग्य, पण वेठीस धरू नका

ऐन दिवाळीत एसटी बंद राहिल्याने एसटीचे हक्काचे उत्पन्न बुडाले. खासगी वाहनांना जास्त पैसे देऊन आम्हांला प्रवास करावा लागला. एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर अडून राहू नये. - विनायक कोष्टी, प्रवासी, सांगली

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्यच आहेत, पण त्यासाठी प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नाही. लॉकडाऊन काळात कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाने केले, हे लक्षात घेऊन सकारात्मक भूमिका ठेवावी. - लक्ष्मण कोळी, प्रवासी, तासगाव

संपामुळे १५ कोटींचे नुकसान

गेल्या १५ दिवसांत संपामुळे जिल्ह्यात एसटीला सुमारे १५ कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. भरघोस उत्पन्न देणारी पंढरपूरची कार्तिकी यात्राही सुनीसुनीच गेली. पुण्याला धावणाऱ्या काही खासगी शिवशाही गाड्यांमुळे थोडीफार प्रवासी वाहतूक सुरू आहे. सांगली, मिरज, शिराळा, विटा या आगारांचे नुकसान मोठे आहे.

टॅग्स :SangliसांगलीST Strikeएसटी संपpassengerप्रवासी