शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

किसान क्रेडिट कार्ड वितरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम : चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 14:17 IST

केसीसी कार्ड धारक नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना विशेष ग्राम सभा घेऊन आणि त्यांच्या पर्यंत पोहचून केसीसी कार्ड वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देकिसान क्रेडिट कार्ड वितरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम : चौधरीकेसीसी कार्ड धारकांची संख्या 1 लाख 75 हजार हजारांच्या आसपास

सांगली : केंद्र सरकारच्या कृषी आणि किसान विकास मंत्रालयातर्फे काढण्यात आलेल्या आदेशानुसार दिनांक 8 फेब्रुवारी पासून पुढील 15 दिवसांसाठी सर्व शेतकरी बांधवाना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजनेत सामावून घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.

या कामी सर्व बँका, कृषी विभाग, मत्स्यपालन विभाग, पशुपालन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून किसान सन्मान योजनेमध्ये लाभार्थी असणाऱ्या परंतु केसीसी कार्ड धारक नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना विशेष ग्राम सभा घेऊन आणि त्यांच्या पर्यंत पोहचून केसीसी कार्ड वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत.केंद्र सरकारने मागील वर्षापासून शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य रूपाने 6 हजार रूपये वार्षिक मदत जाहीर केली आहे. परंतु मंत्रालयाच्या असे निदर्शनास आले आहे की प्रधान मंत्री किसान योजनेत सहभागी असणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांकडे किसान कार्ड उपलब्ध नाहीत. असे शेतकरी केसीसी कार्डाच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध योजनांपासून वंचित राहतात.

अशा कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन सर्व बँकांनी पंधरा दिवसात त्यांना केसीसी कार्ड वितरीत करावयाचे आहे. देशभरात राबवण्यात येणाऱ्या या विशेष उपक्रमांतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे केसीसी कार्ड नाही त्यांनी नजीकच्या बँक शाखेकडे संपर्क साधून एक पानी अर्ज भरून द्यावा. सर्व बाबींची पूर्तता झाल्यावर बँकामार्फत अशा शेतकऱ्यांना त्वरित केसीसी कार्ड वितरीत केले जाईल.

जे शेतकरी केसीसी कार्ड धारक आहेत पण त्यांचे कार्ड वापरात नसल्याने बंद आहे, अशा शेतकऱ्यांनाही या योजनेंतर्गत नवीन कार्ड देण्यात येईल. या विशेष उपक्रमांतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या नवीन केसीसी कार्डासाठी कोणतेही शुल्क बँकाकडून आकारण्यात येणार नाही. या कार्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ अल्पदरात पीक कर्जच नाही तर उपलब्ध मर्यादेपर्यंत शेतीपूरक व्यवसाय उदा. पशु पालन आणि मत्स्यपालन व्यवसायालाही कर्ज मिळेल.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व बँका, कृषी विभाग, मत्स्यपालन विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामपंचायत, पटवारी यांना सूचना देऊन आणि बँक शाखानिहाय मेळावे घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना केसीसी कार्ड वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत.

सांगली जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 3 लाख 20 हजार शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला आहे. या उलट जिल्ह्यात उपयोगात असलेल्या केसीसी कार्ड धारकांची संख्या 1 लाख 75 हजार हजारांच्या आसपास आहे. उर्वरित शेतकऱ्यांना केसीसी कार्ड वितरीत करून या योजनेतील लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम सर्व संबंधित विभागांना करावयाचे आहे, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.या मोहिमेच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी घेणार असून जिल्ह्यातील बँकांच्या सर्व शाखांनी या मोहिमेसाठी शाखा पातळीवर मेळावे आयोजित करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना केसीसी कार्ड वितरीत करावे. तसेच या कामासाठी सर्व संबंधित विभागांनी त्यांच्या तालुका, ग्रामस्तरीय यंत्रणेमार्फत बँकांना सहकार्य करावे, असे आवाहन अग्रणी जिल्हा प्रबंधक आर.पी. यादव यांनी केले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरीSangliसांगली