शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

किसान क्रेडिट कार्ड वितरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम : चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 14:17 IST

केसीसी कार्ड धारक नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना विशेष ग्राम सभा घेऊन आणि त्यांच्या पर्यंत पोहचून केसीसी कार्ड वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देकिसान क्रेडिट कार्ड वितरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम : चौधरीकेसीसी कार्ड धारकांची संख्या 1 लाख 75 हजार हजारांच्या आसपास

सांगली : केंद्र सरकारच्या कृषी आणि किसान विकास मंत्रालयातर्फे काढण्यात आलेल्या आदेशानुसार दिनांक 8 फेब्रुवारी पासून पुढील 15 दिवसांसाठी सर्व शेतकरी बांधवाना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजनेत सामावून घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.

या कामी सर्व बँका, कृषी विभाग, मत्स्यपालन विभाग, पशुपालन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून किसान सन्मान योजनेमध्ये लाभार्थी असणाऱ्या परंतु केसीसी कार्ड धारक नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना विशेष ग्राम सभा घेऊन आणि त्यांच्या पर्यंत पोहचून केसीसी कार्ड वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत.केंद्र सरकारने मागील वर्षापासून शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य रूपाने 6 हजार रूपये वार्षिक मदत जाहीर केली आहे. परंतु मंत्रालयाच्या असे निदर्शनास आले आहे की प्रधान मंत्री किसान योजनेत सहभागी असणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांकडे किसान कार्ड उपलब्ध नाहीत. असे शेतकरी केसीसी कार्डाच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध योजनांपासून वंचित राहतात.

अशा कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन सर्व बँकांनी पंधरा दिवसात त्यांना केसीसी कार्ड वितरीत करावयाचे आहे. देशभरात राबवण्यात येणाऱ्या या विशेष उपक्रमांतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे केसीसी कार्ड नाही त्यांनी नजीकच्या बँक शाखेकडे संपर्क साधून एक पानी अर्ज भरून द्यावा. सर्व बाबींची पूर्तता झाल्यावर बँकामार्फत अशा शेतकऱ्यांना त्वरित केसीसी कार्ड वितरीत केले जाईल.

जे शेतकरी केसीसी कार्ड धारक आहेत पण त्यांचे कार्ड वापरात नसल्याने बंद आहे, अशा शेतकऱ्यांनाही या योजनेंतर्गत नवीन कार्ड देण्यात येईल. या विशेष उपक्रमांतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या नवीन केसीसी कार्डासाठी कोणतेही शुल्क बँकाकडून आकारण्यात येणार नाही. या कार्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ अल्पदरात पीक कर्जच नाही तर उपलब्ध मर्यादेपर्यंत शेतीपूरक व्यवसाय उदा. पशु पालन आणि मत्स्यपालन व्यवसायालाही कर्ज मिळेल.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व बँका, कृषी विभाग, मत्स्यपालन विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामपंचायत, पटवारी यांना सूचना देऊन आणि बँक शाखानिहाय मेळावे घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना केसीसी कार्ड वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत.

सांगली जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 3 लाख 20 हजार शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला आहे. या उलट जिल्ह्यात उपयोगात असलेल्या केसीसी कार्ड धारकांची संख्या 1 लाख 75 हजार हजारांच्या आसपास आहे. उर्वरित शेतकऱ्यांना केसीसी कार्ड वितरीत करून या योजनेतील लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम सर्व संबंधित विभागांना करावयाचे आहे, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.या मोहिमेच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी घेणार असून जिल्ह्यातील बँकांच्या सर्व शाखांनी या मोहिमेसाठी शाखा पातळीवर मेळावे आयोजित करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना केसीसी कार्ड वितरीत करावे. तसेच या कामासाठी सर्व संबंधित विभागांनी त्यांच्या तालुका, ग्रामस्तरीय यंत्रणेमार्फत बँकांना सहकार्य करावे, असे आवाहन अग्रणी जिल्हा प्रबंधक आर.पी. यादव यांनी केले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरीSangliसांगली