शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

लाघवी बोलणं... बॅकिंगच्या जोरावर प्रचार कडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 11:59 PM

श्रीनिवास नागे । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : न बोलणाऱ्याचे गहूही खपत नाहीत, पण बोलणाºयाच्या एरंड्याही विकल्या जातात, हे ...

श्रीनिवास नागे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : न बोलणाऱ्याचे गहूही खपत नाहीत, पण बोलणाºयाच्या एरंड्याही विकल्या जातात, हे सुधीर आणि संदीप मोहिते जाणून होते. लाघवी बोलणे आणि युवा नेत्यांचे ‘बॅकिंग’ या जोरावर त्यांनी ‘कडकनाथ’चा एकदम कडऽऽक प्रचार केला. आठ ते दहा हजारावर गुंतवणूकदार केले. पण मागणीपेक्षा उत्पादन अमाप असणारी साखळी योजना जेव्हा वाढत जाते, तेव्हा तिचा बोºया वाजतो. कंपनीचे संचालक पसार होतात किंवा कंपनी तोट्यात गेल्याचे सांगून हात झटकतात. ‘कडकनाथ’मध्येही तेच झाले.रयत अ‍ॅग्रोचा विस्तार झाला खरा, पण कंपनीच्या ‘रयत’ या नावामुळे काहींची अडचण होणार असल्याने सुधीर मोहितेने सारा पसारा ‘महारयत’च्या नावावर केला. त्यात ‘महा’ आणि ‘रयत’ हे शब्द वेगवेगळे राहतील, अशी मखलाशीही साधली. कारण त्याला ‘रयत’ या नावाचा फायदा उचलायचा होता. ‘महारयत’ची कार्यालये वाढली, कर्मचाऱ्यांचा राबता सुरू झाला. गुंतवणूकदाराने जमेल तसे पैसे गुंतवायचे. त्याला त्या-त्या प्रमाणात पक्षी मिळायचे. सोबत खाद्य, भांडी, औषधे मिळायची. सहा-सात महिन्यांनंतर मात्र त्यात अनियमितता सुरू झाली. सगळ्या कार्यालयांकडून थातूरमातूर उत्तरे मिळू लागली. फेब्रुवारीपासून कंपनीचे व्यवहार संशयास्पद दिसू लागल्यानंतर बोभाटा होऊ नये यासाठी सुधीर मोहितेने पुन्हा जाहिरातींचा मारा केला. पण प्रतिसाद थंडावला. जूनपासून कंपनीने कोंबड्यांचे खाद्य, औषधाची सेवा, अंडी-पक्षी खरेदी बंद केल्याने शेड टाकून बसलेले कात्रीत सापडले. खाद्याअभावी कोंबड्या तडफडू लागल्या. काही ठिकाणी मर सुरू झाली. पैसे देऊन आगावू बुकिंग केलेल्यांना पक्षी मिळेनासे झाले. कार्यालये बंद झाली आणि संचालक-कर्मचारी पसार!पशुसंवर्धन योजनांचा भुलभुलैय्या उभा करून शेतकºयांना गंडविण्याचे उद्योग यापूर्वीही झाले आहेत. शेतीपूरक जोडधंदा म्हणून त्यात पैसे भरले जातात. कमी पैशात, कमी वेळात जास्त नफा, हे आमिष! इमू, शेळीपालन योजनांच्या फसवणुकीचे अनुभव ताजे असतानाही गुंतवणूकदार ‘कडकनाथ’चा गंडा घालून बसले! संचयनी, मैत्रेयसारखीच हीसुद्धा साखळी योजना. मल्टीलेव्हल मार्केटिंगचाच प्रकार. फक्त छुप्या पद्धतीने राबवलेला. अशा योजनांत ठरल्याप्रमाणे सुरुवातीला पैसे मिळतात. गुंतवणूकदार हुरळतो. स्वत: आणखी पैसे लावतो, शिवाय पै-पाहुण्यांना, जवळच्यांनाही पैसे लावण्यास सांगतो. मग काही दिवसांनी फसवल्याचे लक्षात येते. कंपनीचे संचालक पोबारा करतात किंवा कंपनी तोट्यात गेल्याचे सांगून हात झटकतात. ‘महारयत’ने तेच केले.गुन्हा दाखल होण्याची भीती असल्याने, ‘महारयत’ने पोलिसांकडे अर्ज देऊन, ३० आॅगस्टपर्यंत ‘व्यवस्था सुरळीत करू’, असे सांगितले, पण कसलं काय..? कोंबड्या घेऊन बसलेले आता डोक्याला हात लावून बसले आहेत, काहीतरी मार्ग निघेल, या आशेने...‘कडकनाथ’चा बोºया कसा वाजला?मुळात कडकनाथ कोंबडीला खवय्यांची फारशी मागणी नव्हतीच. कधीतरी बदल म्हणून खवय्ये तिला पसंती देतीलही, पण ‘कडकनाथ’चा नियमित फडशा पाडणारे किती निघतील? त्यामुळे नुसताच मागणीचा फुगा फुगवण्यात आला.उत्पादित कोंबड्यांना मागणीच नसेल, तर उठाव होणार कसा? आणि खुल्या बाजारपेठेत बोकडाचे मटण ५०० रुपये, कोंबडीचे मांस १५० रुपये किलोने उपलब्ध असेल तर सामान्य ग्राहक ‘कडकनाथ’चेच नव्हे तर इतरही मांस त्यापेक्षा जास्त दराने खरेदी करेल का, हा साधासोप्पा प्रश्न कोणालाच पडला नाही!