शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

महागाईने करपली भाकरी; राज्यात ज्वारीच्या क्षेत्रात सव्वाचार लाख हेक्टरने घट, दरात वाढ

By अशोक डोंबाळे | Updated: February 9, 2023 14:45 IST

ऊस, फळबागा आणि अन्य पिकांकडे शेतकरी वळल्यामुळे ज्वारीचे क्षेत्र घटल्याचा तज्ज्ञांचा अंदाज

अशोक डोंबाळेसांगली : गरिबांचे प्रमुख अन्न असलेली भाकरी दिवाळीनंतर महागली आहे. महाराष्ट्रात ज्वारीचे क्षेत्र चार लाख ३२ हजार ३७५ हेक्टरने घटल्यामुळे ज्वारीचे दर वाढले आहेत. दिवाळीपूर्वी ३५ रुपये किलो असलेला शाळू सध्या ४५ ते ५३ रुपये झाला आहे. गव्हापेक्षा ज्वारीचा दर अधिक असल्यामुळे भाकरीची श्रीमंतांचे अन्न होण्याकडे वाटचाल सुरू आहे.कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात २०१६-१७ ते २०२०-२१ यादरम्यान ज्वारीचे क्षेत्र १७ लाख ३६ हजार २८६ हेक्टर होते. २०२२-२३ या वर्षात ते १३ लाख ३९११ हेक्टरवर आले आहे. चार लाख ३२ हजार ३७५ हेक्टरने घट झाली आहे. ऊस, फळबागा आणि अन्य पिकांकडे शेतकरी वळल्यामुळे ज्वारीचे क्षेत्र घटल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. लागवड कमी झाल्यामुळे सध्या ज्वारीचे दर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. दिवाळीपूर्वी ३० ते ३५ रुपये किलो असणारी ज्वारी ४५ ते ५३ रुपयांवर गेली आहे.श्रीमंतांनाही गोड वाटू लागली गरिबांचे प्रमुख अन्न म्हणून भाकरी ओळखली जाते. ग्रामीण भागात भाकरीला पसंती असली, तरी शहरात गव्हाची चपाती खाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी शाळूपेक्षा गव्हाचा दर अधिक असायचा. परंतु, भाकरीमुळे शरीराला फायदा होत असल्याने अनेकजण चपाती सोडून भाकरीकडे वळत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांकडून ज्वारीची भाकरी खाण्याबाबत सल्ला दिला जात असल्यामुळे गरिबाघरची भाकरी श्रीमंतांनाही गोड वाटू लागली आहे.आवक घटल्यामुळे दर वाढलेसांगली बाजार समितीमध्ये एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत ९० हजार २८३ क्विंटल शाळूची आवक झाली होती. सरासरी दर ३२०० ते ३५०० रुपये क्विंटल होता. यंदा याच काळात ८६ हजार २१ क्विंटल आवक झाली आहे; तर सरासरी दर ४५०० ते ५३०० रुपये क्विंटल आहे.

ज्वारीचे क्षेत्र घटल्यामुळे स्थानिक ज्वारीची आवक यंदा घटली आहे. ती बाजारात आली असती, तर शाळूचे दर वाढले नसते. यंदा शाळूचा हंगाम उशिराने सुरू झाला आहे. त्यामुळे दरवाढ झाली आहे. पंधरा दिवसांत नवीन शाळू बाजारात येईल. - संजय चौगुले, होलसेल व्यापारी, सांगली.

टॅग्स :Sangliसांगली