शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महागाईने करपली भाकरी; राज्यात ज्वारीच्या क्षेत्रात सव्वाचार लाख हेक्टरने घट, दरात वाढ

By अशोक डोंबाळे | Updated: February 9, 2023 14:45 IST

ऊस, फळबागा आणि अन्य पिकांकडे शेतकरी वळल्यामुळे ज्वारीचे क्षेत्र घटल्याचा तज्ज्ञांचा अंदाज

अशोक डोंबाळेसांगली : गरिबांचे प्रमुख अन्न असलेली भाकरी दिवाळीनंतर महागली आहे. महाराष्ट्रात ज्वारीचे क्षेत्र चार लाख ३२ हजार ३७५ हेक्टरने घटल्यामुळे ज्वारीचे दर वाढले आहेत. दिवाळीपूर्वी ३५ रुपये किलो असलेला शाळू सध्या ४५ ते ५३ रुपये झाला आहे. गव्हापेक्षा ज्वारीचा दर अधिक असल्यामुळे भाकरीची श्रीमंतांचे अन्न होण्याकडे वाटचाल सुरू आहे.कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात २०१६-१७ ते २०२०-२१ यादरम्यान ज्वारीचे क्षेत्र १७ लाख ३६ हजार २८६ हेक्टर होते. २०२२-२३ या वर्षात ते १३ लाख ३९११ हेक्टरवर आले आहे. चार लाख ३२ हजार ३७५ हेक्टरने घट झाली आहे. ऊस, फळबागा आणि अन्य पिकांकडे शेतकरी वळल्यामुळे ज्वारीचे क्षेत्र घटल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. लागवड कमी झाल्यामुळे सध्या ज्वारीचे दर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. दिवाळीपूर्वी ३० ते ३५ रुपये किलो असणारी ज्वारी ४५ ते ५३ रुपयांवर गेली आहे.श्रीमंतांनाही गोड वाटू लागली गरिबांचे प्रमुख अन्न म्हणून भाकरी ओळखली जाते. ग्रामीण भागात भाकरीला पसंती असली, तरी शहरात गव्हाची चपाती खाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी शाळूपेक्षा गव्हाचा दर अधिक असायचा. परंतु, भाकरीमुळे शरीराला फायदा होत असल्याने अनेकजण चपाती सोडून भाकरीकडे वळत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांकडून ज्वारीची भाकरी खाण्याबाबत सल्ला दिला जात असल्यामुळे गरिबाघरची भाकरी श्रीमंतांनाही गोड वाटू लागली आहे.आवक घटल्यामुळे दर वाढलेसांगली बाजार समितीमध्ये एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत ९० हजार २८३ क्विंटल शाळूची आवक झाली होती. सरासरी दर ३२०० ते ३५०० रुपये क्विंटल होता. यंदा याच काळात ८६ हजार २१ क्विंटल आवक झाली आहे; तर सरासरी दर ४५०० ते ५३०० रुपये क्विंटल आहे.

ज्वारीचे क्षेत्र घटल्यामुळे स्थानिक ज्वारीची आवक यंदा घटली आहे. ती बाजारात आली असती, तर शाळूचे दर वाढले नसते. यंदा शाळूचा हंगाम उशिराने सुरू झाला आहे. त्यामुळे दरवाढ झाली आहे. पंधरा दिवसांत नवीन शाळू बाजारात येईल. - संजय चौगुले, होलसेल व्यापारी, सांगली.

टॅग्स :Sangliसांगली