शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

sangli news: खानापूरचे जवान नायब सुभेदार जयसिंग भगत अनंतात विलीन; लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 14:22 IST

सियाचिन येथे कर्तव्य बजावताना बर्फवृष्टीमुळे मेंदूतील रक्तपुरवठा गोठल्याने कोम्यात गेल्याने झाला मृत्यू

पांडुरंग डोंगरे

खानापूर : खानापूरचे सुपूत्र, जवान नायब सुभेदार जयसिंग (बाबू) शंकर भगत (वय-४०) यांचे लेह लडाख विभागातील सियाचिन मध्ये देशसेवेचे कर्तव्य बजावताना निधन झाले. त्यांच्यावर आज, शनिवारी खानापुरात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.जवान नायब सुभेदार जयसिंग (बाबू ) शंकर भगत यांचे पार्थिव पुणे येथून सकाळी नऊ वाजता खानापूर येथे आणण्यात आले. 'शहीद जवान अमर रहे ' ' नायब सुभेदार जयसिंग बाबू भगत अमर रहे ' ' भारत माता की जय ' अशा जयघोषात खानापूर शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत शालेय विद्यार्थी, तरूण वर्ग, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान भगत यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. पत्नी व लहान मुलांचे निशब्द चेहरे पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले. खानापूर - गोरेवाडी रस्त्यालगत भगत यांच्या घराच्या पूर्वेला पटांगणावर जवान भगत यांचेवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी भारतीय सैन्यदलाच्या २२ मराठा लाइट इन्फनट्रीच्या वतीने पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. लष्करी व शासकीय मानवंदना देण्यात आली.महाराष्ट्र शासनाच्यावतीने पालक मंत्री सुरेश खाडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार गोपिचंद पडळकर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, नगराध्यक्ष डॉ उदयसिंह हजारे, जिल्हाधिकारी डॉ दयानिधी राजा, उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस निरीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले.खानापूर येथील जवान शहीद जयसिंग भगत हे सियाचिन येथे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत होते. दोन दिवसांपूर्वी सियाचिन येथे बर्फवृष्टी झाली होती. त्यावेळी झोपेत त्यांचा मेंदूतील रक्तपुरवठा गोठल्याने ते कोम्यात गेले. सदर घटना त्यांच्या साथीदारांच्या सकाळी निदर्शनास आली. त्यांनी सैन्यदलाच्या हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना चंदीगड येथे दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. शहीद नायब सुभेदार जयसिंग (बाबू) शंकर भगत हे सन २००३ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. सन २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, वडील, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

टॅग्स :Sangliसांगली