शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

आटपाडी, शेटफळे, नेलकरंजीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST

आटपाडी : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात आटपाडी, शेटफळे आणि नेलकरंजीचा समावेश करण्यात आला आहे. या अभियनांतर्गत घनकचरा ...

आटपाडी : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात आटपाडी, शेटफळे आणि नेलकरंजीचा समावेश करण्यात आला आहे. या अभियनांतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प या गावांत राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे.

केंद्र सरकारने २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात गावे हगणदारीमुक्त केली. सध्या घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प सुरू केला आहे. आटपाडी तालुक्यातील आटपाडी, शेटफळे आणि नेलकरंजी गावांचा समावेश झाला आहे. तिन्ही गावांतील सांडपाण्याचे एकत्रीकरण करण्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे. ओला, सुका आणि इतर कचरा संकलित करून प्रक्रिया केली जाणार आहे. गावात नव्याने बंदिस्त गटर, चौकाचौकात कचराकुंडी, घंटागाडी आणि घनकचरा यंत्रणा उभी केली जाणार आहे. प्रकल्पाचे काम पाच वर्षे चालू राहणार आहे. त्याचा आराखडा बनवण्याचे काम दिल्लीतील संस्थेला दिले असून त्यांनी तिन्ही गावांना भेट देऊन गावची पाहणी करून कच्चा आराखडा तयार केला आहे. लवकरच अंतिम आराखडा तयार करून प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे.

यावेळी सरपंच सौ. वृषाली पाटील, ॲड. धनंजय पाटील, उपसरपंच प्रा. अंकुश कोळकर, प्रकाश मरगळे, बाळासाहेब मेटकरी, विजय पाटील, नितीन सागर, राजेंद्र बालटे, सर्जेराव राक्षे, उमाकांत देशमुख, मधुकर माळी उपस्थित होते.