शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमीतील माती दिल्लीला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:26 IST

इस्लामपूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मिठ्ठी सत्याग्रह करण्यात आला. यावेळी विश्वास सायनाकर, धनाजी गुरव, दिग्विजय पाटील, प्रा. एल. डी. ...

इस्लामपूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मिठ्ठी सत्याग्रह करण्यात आला. यावेळी विश्वास सायनाकर, धनाजी गुरव, दिग्विजय पाटील, प्रा. एल. डी. पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : स्वातंत्र्य चळवळीत हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमीतील मूठभर माती उचलून ‘मिठ्ठी सत्याग्रह’ करण्यात आला. येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील माती संकलित करण्यात आली. ‘हुतात्म्यांच्या रक्तात भिजलेली माती - विकू देणार नाही’ अशी प्रतिज्ञा करण्यात आली.

हुतात्म्यांच्या मातीचे कलश सांगली येथे एकत्र करून आमराईत हुतात्मा पत्रावळे यांच्या पुतळ्याजवळ वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तर त्या मातीतील निम्मा भाग दिल्लीच्या आंदोलनासाठी पाठवला जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चाने हा सत्याग्रह सुरू केला आहे. यावेळी ज्येष्ठ विचारवंत निवृत्त प्राचार्य विश्वास सायनाकर, धनाजी गुरव, प्रा. एल. डी. पाटील, दिग्विजय पाटील उपस्थित होते.

धनाजी गुरव म्हणाले, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देशभर आंदोलने सुरू आहेत. महात्मा गांधींनी १२ मार्च ते ६ एप्रिल १९३० असा मिठाचा सत्याग्रह करणारा दांडी मार्च काढला होता. त्याच पद्धतीने ‘मिठ्ठी सत्याग्रह’ देशभर होत आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना, पुरोगामी आणि समाजवादी पक्ष संघटना या कार्यक्रमात सहभागी झाल्या.

दिग्विजय पाटील म्हणाले, या सत्याग्रहाची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारचे कार्यकर्ते भगवानराव मोरे यांच्या हणमंतवडीये या गावातून झाली. क्रांतिवीरांगणा हौसाक्का पाटील यांच्या हस्ते मूठभर माती उचलून सत्याग्रह सुरू झाला. सांगली जिल्ह्यात जेथे जेथे इंग्रजांच्या विरोधातील लढ्यात हुतात्मे झाले, तेथील माती एकत्रित करून सत्याग्रह करण्यात येत आहे.