शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमीतील माती दिल्लीला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:26 IST

इस्लामपूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मिठ्ठी सत्याग्रह करण्यात आला. यावेळी विश्वास सायनाकर, धनाजी गुरव, दिग्विजय पाटील, प्रा. एल. डी. ...

इस्लामपूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मिठ्ठी सत्याग्रह करण्यात आला. यावेळी विश्वास सायनाकर, धनाजी गुरव, दिग्विजय पाटील, प्रा. एल. डी. पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : स्वातंत्र्य चळवळीत हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमीतील मूठभर माती उचलून ‘मिठ्ठी सत्याग्रह’ करण्यात आला. येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील माती संकलित करण्यात आली. ‘हुतात्म्यांच्या रक्तात भिजलेली माती - विकू देणार नाही’ अशी प्रतिज्ञा करण्यात आली.

हुतात्म्यांच्या मातीचे कलश सांगली येथे एकत्र करून आमराईत हुतात्मा पत्रावळे यांच्या पुतळ्याजवळ वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तर त्या मातीतील निम्मा भाग दिल्लीच्या आंदोलनासाठी पाठवला जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चाने हा सत्याग्रह सुरू केला आहे. यावेळी ज्येष्ठ विचारवंत निवृत्त प्राचार्य विश्वास सायनाकर, धनाजी गुरव, प्रा. एल. डी. पाटील, दिग्विजय पाटील उपस्थित होते.

धनाजी गुरव म्हणाले, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देशभर आंदोलने सुरू आहेत. महात्मा गांधींनी १२ मार्च ते ६ एप्रिल १९३० असा मिठाचा सत्याग्रह करणारा दांडी मार्च काढला होता. त्याच पद्धतीने ‘मिठ्ठी सत्याग्रह’ देशभर होत आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना, पुरोगामी आणि समाजवादी पक्ष संघटना या कार्यक्रमात सहभागी झाल्या.

दिग्विजय पाटील म्हणाले, या सत्याग्रहाची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारचे कार्यकर्ते भगवानराव मोरे यांच्या हणमंतवडीये या गावातून झाली. क्रांतिवीरांगणा हौसाक्का पाटील यांच्या हस्ते मूठभर माती उचलून सत्याग्रह सुरू झाला. सांगली जिल्ह्यात जेथे जेथे इंग्रजांच्या विरोधातील लढ्यात हुतात्मे झाले, तेथील माती एकत्रित करून सत्याग्रह करण्यात येत आहे.