शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमीतील माती दिल्लीला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:26 IST

इस्लामपूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मिठ्ठी सत्याग्रह करण्यात आला. यावेळी विश्वास सायनाकर, धनाजी गुरव, दिग्विजय पाटील, प्रा. एल. डी. ...

इस्लामपूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मिठ्ठी सत्याग्रह करण्यात आला. यावेळी विश्वास सायनाकर, धनाजी गुरव, दिग्विजय पाटील, प्रा. एल. डी. पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : स्वातंत्र्य चळवळीत हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमीतील मूठभर माती उचलून ‘मिठ्ठी सत्याग्रह’ करण्यात आला. येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील माती संकलित करण्यात आली. ‘हुतात्म्यांच्या रक्तात भिजलेली माती - विकू देणार नाही’ अशी प्रतिज्ञा करण्यात आली.

हुतात्म्यांच्या मातीचे कलश सांगली येथे एकत्र करून आमराईत हुतात्मा पत्रावळे यांच्या पुतळ्याजवळ वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तर त्या मातीतील निम्मा भाग दिल्लीच्या आंदोलनासाठी पाठवला जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चाने हा सत्याग्रह सुरू केला आहे. यावेळी ज्येष्ठ विचारवंत निवृत्त प्राचार्य विश्वास सायनाकर, धनाजी गुरव, प्रा. एल. डी. पाटील, दिग्विजय पाटील उपस्थित होते.

धनाजी गुरव म्हणाले, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देशभर आंदोलने सुरू आहेत. महात्मा गांधींनी १२ मार्च ते ६ एप्रिल १९३० असा मिठाचा सत्याग्रह करणारा दांडी मार्च काढला होता. त्याच पद्धतीने ‘मिठ्ठी सत्याग्रह’ देशभर होत आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना, पुरोगामी आणि समाजवादी पक्ष संघटना या कार्यक्रमात सहभागी झाल्या.

दिग्विजय पाटील म्हणाले, या सत्याग्रहाची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारचे कार्यकर्ते भगवानराव मोरे यांच्या हणमंतवडीये या गावातून झाली. क्रांतिवीरांगणा हौसाक्का पाटील यांच्या हस्ते मूठभर माती उचलून सत्याग्रह सुरू झाला. सांगली जिल्ह्यात जेथे जेथे इंग्रजांच्या विरोधातील लढ्यात हुतात्मे झाले, तेथील माती एकत्रित करून सत्याग्रह करण्यात येत आहे.