शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सांगली महापालिका अधिकाºयांविरोधात सामाजिक कार्यकर्ते एकवटले : काम बंदला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 11:29 IST

  सांगली : महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल कर्मचाºयांनी रविवारी काम बंद आंदोलन केले. कर्मचाºयांच्या या ...

ठळक मुद्देनागरिकांना वेठीस धरणाºयांवर गुन्हे दाखलची मागणीअत्यावश्यक व स्वच्छतेची सेवा बंद केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमाच्या तरतुदीचा भंग केल्याबद्दल सर्व अधिकाºयांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे

 

सांगली : महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल कर्मचाºयांनी रविवारी काम बंद आंदोलन केले. कर्मचाºयांच्या या आंदोलनाविरोधात शहरातील सामाजिक कार्यकर्ते एकवटले आहेत. नागरिकांना वेठीस धरणाºया महापालिका अधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. 

आयुक्त व आरोग्य विभागाकडील कर्मचाºयांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल अधिकारी व कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे रविवारी शहरातील कचरा उठाव झाला नाही. मुख्य बाजारपेठेसह शहरात दुर्गंधी पसरली होती. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत बैठक घेतली. या बैठकीला सतीश साखळकर, सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे, नागरिक हक्क संघटनेचे वि. द. बर्वे, अमर निंबाळकर, मराठा सेवा संघाचे नितीन चव्हाण, केमिस्ट असोसिएशनचे रवींद्र वळवळे, उमेश देशमुख, शिवसेनेचे शंभोराज काटकर, आसीफ बावा, वाहतूकदार संघटनेचे महेश पाटील, दिलीप गायकवाड, सुधीर भोसले, आयुब पटेल, आशिष कोरी, युसूफ मेस्त्री उपस्थित होते. बैठकीत महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक व स्वच्छता सेवा बंद ठेवल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

बैठकीबाबत साखळकर म्हणाले की, महापालिका प्रशासनाने नागरिकांना आरोग्य स्वच्छता ही सेवा पुरविणे बंधनकारक आहे. महापालिका क्षेत्रात साथीच्या रोगांचा फैलाव होत असताना स्वच्छता सेवा बंद केल्याने आरोग्याचे प्रश्न गंभीर होणार आहेत. डेंग्यू, स्वाइन फ्लू, चिकुनगुन्या यासारख्या आजारांनी कित्येक नागरिकांचा बळी गेला आहे. तरीही प्रशासन सार्वजनिक आरोग्याबाबत गंभीर नसून भारतीय दंड संहिता कलम १६६ नुसार आयुक्त, उपायुक्त व कर्मचारी हे गुन्ह्यास पात्र आहेत. अत्यावश्यक व स्वच्छतेची सेवा बंद केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमाच्या तरतुदीचा भंग केल्याबद्दल सर्व अधिकाºयांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. याबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन पाठविले आहे. नगरविकास विभागाकडे तक्रार करणारमहापालिका क्षेत्रात साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. कित्येक नागरिकांचा बळी गेला आहे. तरीही महापालिका प्रशासन सुस्त आहे. रविवारी अधिकारी व कर्मचाºयांनी अत्यावश्यक सेवा बंद ठेवल्या. स्वच्छता झाली नाही. शनिवारच्या बाजारातील कचरा मुख्य बाजारपेठेत पडून राहिला. महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमातील तरतुदीचा भंग झाला आहे. त्यामुळे आयुक्तांसह सर्व अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई व्हावी, यासाठी नगरविकासचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देणार असल्याचे साखळकर म्हणाले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीcommissionerआयुक्त