शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सांगलीतील बालाजीनगरच्या बालोद्यानात विनापरवाना झाडांची कत्तल

By अविनाश कोळी | Updated: December 26, 2023 14:44 IST

नागरिकांचा संताप : तीस वर्षे जुन्या झाडांवर कुऱ्हाड

सांगली : बालाजीनगर येथील बहरणाऱ्या बालोद्यानाला उजाड बनविताना येथील काही सोसायटी सदस्यांनी तीन वर्षे जुन्या व पूर्ण वाढलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालविली. फांद्या तोडण्यास परवानगी घेऊन जमिनीपासून झाडे उद्ध्वस्त करण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. महापालिकेच्या उद्यान अधीक्षकांनी याची गंभीर दखल घेतली असून, कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.कुपवाडजवळील बालाजीनगरात सोमवारी हा प्रकार घडला. मंगळवारी सकाळी परिसरातील नागरिक, सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी याबाबत संताप व्यक्त करतानाच महापालिकेच्या कारभाराबाबतही नाराजी व्यक्त केली. उद्यानाची जबाबदारी ज्या सोसायटीवर दिली होती त्या सोसायटीच्या काही सदस्यांनीच झाडांची कत्तल केल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.महापालिकेकडे या सदस्यांनी फांद्या तोडण्याची परवानगी घेतली, मात्र प्रत्यक्षात संपूर्ण झाडेच तोडून टाकण्यात आली. सुमारे १५ ते २० झाडांची कत्तल झाल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

सावली गायब, उद्यानाची वाट

दाट सावली देणाऱ्या झाडांची कत्तल केल्याने उद्यानातील सावली गायब झाली आहे. त्यामुळे उद्यानात सतत वावर असणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

बालाजीनगरच्या वृक्षतोडीचा पंचनामा केला आहे. संबंधितांनी केवळ फांद्या तोडण्याची परवानगी मागितली होती. त्याची परवानगी घेऊन पूर्ण वृक्षतोड केल्याने आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत, असे महापालिकेचे उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली