शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

Pahalgam Terror Attack: ..अन् पलूसकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, जम्मू-काश्मीरला गेलेले सहा पर्यटक सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 14:37 IST

अवघ्या एक किलोमीटर अंतरावर झाला दहशतवादी हल्ला

पलूस : पहलगाम बेसरन घाटीमधील दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा समावेश असून यातील दोन पर्यटक महाराष्ट्रातील आहेत. याच पहलगामच्या एक किलोमीटर अंतरावर पलूस येथील सहा पर्यटक गेले होते. मात्र हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती कोल्हापूर येथील टुर्सच्या वतीने देण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी, पलूस येथील पर्यटक विजय कटारे, नारायण सगरे, प्रकाश डाके, महादेव माने, विजय लाड, जितेंद्र देसाई हे कोल्हापूर येथील टुर्सच्या माध्यमातून जम्मू व काश्मीरला फिरायला गेले होते. मंगळवारी पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर हे सर्व पर्यटक एका ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेत असताना त्यांच्या गाइडला फोन आला व पहेलगाममधील बेसरन घाटी येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. तरी तुम्ही ते ठिकाण सोडून सुरक्षित ठिकाणी जावे, अशा सूचना देण्यात आल्या. यावर टुर्सच्या प्रमुख व गाइड यांनी ते ठिकाण सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले.

संदेश येताच सुटकेचा नि:श्वासपलूसमधील सहाही पर्यटकांचा नातेवाइकांशी संपर्क झाला असून हे सर्व सहा पर्यटक सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. ही बातमी पलूससह परिसरात वाऱ्यासारखी पसरली. जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यानंतर बराच काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र काही वेळाने हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याचा संदेश येताच सहा कुटुंबीय व नातेवाईक तसेच पलूसकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. लवकरच हे सहा पर्यटक सुखरूप घरी परत येतील, असे नातेवाइकांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाtourismपर्यटनJammu Kashmirजम्मू-काश्मीर