शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

By हणमंत पाटील | Updated: May 29, 2024 09:37 IST

एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हणमंत पाटील, दत्ता पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, तासगाव (जि. सांगली ) : नातीचा वाढदिवस करून तासगावच्या दिशेने  माघारी येत असताना तासगाव- मणेराजुरी महामार्गावर चिंचणी हद्दीत चालकाचा ताबा सुटून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील हे त्यांच्या कुटुंबीय समवेत कारमधून (एमएच 10 एएन 1497) कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे नातीच्या वाढदिवसासाठी गेले होते. वाढदिवस संपवल्यानंतर नात- लेकीसह कुटुंबीयासमवेत माघारी तासगावला येत होते. तासगाव जवळ आल्यानंतर तासगाव ते मणेराजुरी महामार्गावर असलेल्या ताकारी योजनेच्या कालव्याजवळ चालक राजेंद्र पाटील यांचा वाहनावरचा ताबा सुटल्याने गाडी थेट कालव्यातकोसळली.

या अपघातात गाडीतील राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय 56), त्यांच्या पत्नी सुजाता जगन्नाथ पाटील (वय 52), रा. तासगाव, मुलगी प्रियंका अवधूत खराडे (वय 33), नात दुर्वा अवधूत खराडे (वय 5),  दुसरी नात कार्तिकी अवधूत खराडे ( वय 1), सर्व रा. बुधगाव आणि राजवी विकास भोसले (वय 2) रा. कोकळे यांचा जागीच मृत्यू झाला.  तर पाटील यांची दुसरी मुलगी स्वप्नाली विकास भोसले ही गंभीर जखमी असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला होता. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तासगाव पोलिसांना याबाबत माहिती कळवण्यात आली. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांच्यासह तासगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी स्वप्नाली भोसले यांना रुग्णालयात नेले. 

राजवीचा वाढदिवस ठरला अखेरचाच -

राजवीचा दुसरा वाढदिवस तिच्या कुटुंबीयांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. मात्र वाढदिवस संपवून सुट्टीसाठी आजोबांच्या समवेत आजोळी जात असतानाच काळाने घाला घातला. त्यामुळे राजवीचा हा अखेरचा वाढदिवस ठरला असून पाटील कुटुंबीयांसाठी मंगळवारची रात्र काळरात्र ठरली आहे या घटनेने तासगाव शहरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात