शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

सहा निवडणुका लढलो, पण बंदोबस्तात फिरावे लागले नाही, बाबर यांचा संजयकाकांसह विरोधकांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 17:37 IST

खानापूर मतदारसंघात मी सहावेळा निवडणूक लढविली. परंतु, मला पोलिस बंदोबस्त घेऊन फिरण्याची कधीही वेळ आली नाही, असा घणाघात शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी खा. संजयकाका पाटील यांच्यासह विरोधकांवर येथे पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देजनतेने नाकारलेले एका व्यासपीठावरआटपाडीच्या नेत्यांना मदत केली असल्याने, त्यांच्या सर्व भानगडी माहीत खासदारांनी एफआरपीचे पैसे द्यावेत

विटा : खानापूर मतदारसंघात मी सहावेळा निवडणूक लढविली. परंतु, मला पोलिस बंदोबस्त घेऊन फिरण्याची कधीही वेळ आली नाही, असा घणाघात शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी खा. संजयकाका पाटील यांच्यासह विरोधकांवर येथे पत्रकार परिषदेत केला. आटपाडीच्या नेत्यांना मी मदत केली असल्याने, त्यांच्या सर्व भानगडी माहीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

माझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत. त्यामुळे मला मस्ती नाही. खानापूर मतदारसंघात जनतेने नाकारलेले सर्वजण एकत्रित येऊन, माझ्याबद्दल अधिकाऱ्यांवर दहशत माजविणाऱ्यांची मस्ती उतरविण्याची भाषा बोलत आहेत. परंतु, खासदारांच्या तोंडी मस्तीची भाषा शोभत नाही.

खानापूर मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून खा. संजयकाका पाटील, माजी आ. सदाशिवराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, भाजपचे गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी एका व्यासपीठावर एकत्रित येऊन आ. बाबर यांना लक्ष्य केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आ. बाबर यांनी प्रत्युत्तर दिले.

ते म्हणाले, सध्या तालुक्यात कोणतीही निवडणूक नसतानाही विविध पक्षांतील नेते एकत्र येऊन माझ्याविषयी संघर्षाची भाषा करीत आहेत. परंतु, जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे, तोपर्यंत जनतेने नाकारलेले अनेक नेते एकसंध झाले तरी मला काही फरक पडत नाही.

प्रशासकीय अधिकाऱ्यांवर माझी दहशत असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. परंतु, मी केलेली विकास कामे पाहून विरोधकांना माझी दहशत वाटू लागल्याने, ते एकत्रित येऊन माझी मस्ती काढायची भाषा वापरत आहेत. खासदारांच्या तोंडी मस्तीची भाषा अशोभनीय आहे. त्यामुळे त्यांना तसे वाटत असले तरी, त्यांनी मला वेळ व ठिकाण सांगावे, त्याठिकाणी मी एकटा येण्यास तयार आहे.

शिवसेना व भाजपचे सरकार सत्तेत आहे. विकास कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री मला मदत करतात. ते मी जाहीरपणे सांगतो. त्याचे सर्व श्रेय मी भाजपलाच देतो. त्याचा पोटशूळ भाजपच्याच खासदारांना कशासाठी?

विरोधकांना टेंभूचे पाणी घाटमाथ्यावर येऊ नये व मी विधानसभेला उभा राहू नये, असे वाटत असावे. खासदारांनी किमान भाजप पक्षवाढीचे काम करावे. खानापूर तालुक्यात ज्यांना तुम्ही तुमच्यासोबत घेऊन फिरताय त्यांना (सदाशिवराव पाटील) एकदा तुमच्या पक्षात तरी घेऊन टाका, असा टोलाही अनिल बाबर यांनी यावेळी लगावला.

मी माझ्या मतदारसंघाच्या बाहेर जाऊन कधी राजकारण केले नाही. अजून तासगाव तालुक्यात राजकारणासाठी गेलो नाही. आटपाडीच्या नेत्यांना मी वेळोवेळी मदत केली आहे. त्यांच्या सर्व भानगडी मला माहीत आहेत. परंतु, आम्ही त्यात लक्ष घालत नाही. तुमची तयारी असेल तर सर्व प्रश्न घेऊन जनतेसमोर जाऊया. या सर्व प्रकरणात खासदारांचा बोलवता धनी वेगळाच असल्याची मला शंका आहे, असा टोला अमरसिंह देशमुख यांना आ. बाबर यांनी लगावला.

खासदारांनी एफआरपीचे पैसे द्यावेतविरोधकांनी दिशाभुलीचे राजकारण करू नये. सहकारी संस्थांना राजकारणातून त्रास होऊ नये, ही आपली भूमिका आहे. नागेवाडीच्या यशवंत साखर कारखान्याबाबत खासदार संजयकाका पाटील यांनी दिशाभूल करणारी वक्तव्ये सुरू केली आहेत. त्यामुळे अशी दिशाभुलीची वक्तव्ये करण्यापेक्षा त्यांनी उसाची एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, असेही आ. अनिल बाबर यावेळी म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीAnil Baburअनिल बाबर