शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

सहा निवडणुका लढलो, पण बंदोबस्तात फिरावे लागले नाही, बाबर यांचा संजयकाकांसह विरोधकांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 17:37 IST

खानापूर मतदारसंघात मी सहावेळा निवडणूक लढविली. परंतु, मला पोलिस बंदोबस्त घेऊन फिरण्याची कधीही वेळ आली नाही, असा घणाघात शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी खा. संजयकाका पाटील यांच्यासह विरोधकांवर येथे पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देजनतेने नाकारलेले एका व्यासपीठावरआटपाडीच्या नेत्यांना मदत केली असल्याने, त्यांच्या सर्व भानगडी माहीत खासदारांनी एफआरपीचे पैसे द्यावेत

विटा : खानापूर मतदारसंघात मी सहावेळा निवडणूक लढविली. परंतु, मला पोलिस बंदोबस्त घेऊन फिरण्याची कधीही वेळ आली नाही, असा घणाघात शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी खा. संजयकाका पाटील यांच्यासह विरोधकांवर येथे पत्रकार परिषदेत केला. आटपाडीच्या नेत्यांना मी मदत केली असल्याने, त्यांच्या सर्व भानगडी माहीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

माझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत. त्यामुळे मला मस्ती नाही. खानापूर मतदारसंघात जनतेने नाकारलेले सर्वजण एकत्रित येऊन, माझ्याबद्दल अधिकाऱ्यांवर दहशत माजविणाऱ्यांची मस्ती उतरविण्याची भाषा बोलत आहेत. परंतु, खासदारांच्या तोंडी मस्तीची भाषा शोभत नाही.

खानापूर मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून खा. संजयकाका पाटील, माजी आ. सदाशिवराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, भाजपचे गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी एका व्यासपीठावर एकत्रित येऊन आ. बाबर यांना लक्ष्य केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आ. बाबर यांनी प्रत्युत्तर दिले.

ते म्हणाले, सध्या तालुक्यात कोणतीही निवडणूक नसतानाही विविध पक्षांतील नेते एकत्र येऊन माझ्याविषयी संघर्षाची भाषा करीत आहेत. परंतु, जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे, तोपर्यंत जनतेने नाकारलेले अनेक नेते एकसंध झाले तरी मला काही फरक पडत नाही.

प्रशासकीय अधिकाऱ्यांवर माझी दहशत असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. परंतु, मी केलेली विकास कामे पाहून विरोधकांना माझी दहशत वाटू लागल्याने, ते एकत्रित येऊन माझी मस्ती काढायची भाषा वापरत आहेत. खासदारांच्या तोंडी मस्तीची भाषा अशोभनीय आहे. त्यामुळे त्यांना तसे वाटत असले तरी, त्यांनी मला वेळ व ठिकाण सांगावे, त्याठिकाणी मी एकटा येण्यास तयार आहे.

शिवसेना व भाजपचे सरकार सत्तेत आहे. विकास कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री मला मदत करतात. ते मी जाहीरपणे सांगतो. त्याचे सर्व श्रेय मी भाजपलाच देतो. त्याचा पोटशूळ भाजपच्याच खासदारांना कशासाठी?

विरोधकांना टेंभूचे पाणी घाटमाथ्यावर येऊ नये व मी विधानसभेला उभा राहू नये, असे वाटत असावे. खासदारांनी किमान भाजप पक्षवाढीचे काम करावे. खानापूर तालुक्यात ज्यांना तुम्ही तुमच्यासोबत घेऊन फिरताय त्यांना (सदाशिवराव पाटील) एकदा तुमच्या पक्षात तरी घेऊन टाका, असा टोलाही अनिल बाबर यांनी यावेळी लगावला.

मी माझ्या मतदारसंघाच्या बाहेर जाऊन कधी राजकारण केले नाही. अजून तासगाव तालुक्यात राजकारणासाठी गेलो नाही. आटपाडीच्या नेत्यांना मी वेळोवेळी मदत केली आहे. त्यांच्या सर्व भानगडी मला माहीत आहेत. परंतु, आम्ही त्यात लक्ष घालत नाही. तुमची तयारी असेल तर सर्व प्रश्न घेऊन जनतेसमोर जाऊया. या सर्व प्रकरणात खासदारांचा बोलवता धनी वेगळाच असल्याची मला शंका आहे, असा टोला अमरसिंह देशमुख यांना आ. बाबर यांनी लगावला.

खासदारांनी एफआरपीचे पैसे द्यावेतविरोधकांनी दिशाभुलीचे राजकारण करू नये. सहकारी संस्थांना राजकारणातून त्रास होऊ नये, ही आपली भूमिका आहे. नागेवाडीच्या यशवंत साखर कारखान्याबाबत खासदार संजयकाका पाटील यांनी दिशाभूल करणारी वक्तव्ये सुरू केली आहेत. त्यामुळे अशी दिशाभुलीची वक्तव्ये करण्यापेक्षा त्यांनी उसाची एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, असेही आ. अनिल बाबर यावेळी म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीAnil Baburअनिल बाबर