शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

महायुतीमध्ये नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 19:38 IST

दोन्ही पक्षांचे, नेत्यांचे सांगलीशी जवळचे संबंध असल्यामुळे जिल्ह्यातील एखादी जागा मिळावी, म्हणून ते प्रयत्नशील आहेत. शिवसेना, भाजपमध्येच जिल्ह्यातील जागावाटप झाले, तर घटकपक्षांच्या नाराजीचा सामना युतीला करावा लागू शकतो.

ठळक मुद्देदोन्ही पक्षांना किमान एका तरी जागेची अपेक्षा आहे.

अविनाश कोळी ।सांगली : गेल्या पाच वर्षात भाजप, शिवसेनेत झालेली मोठी भरती, घटकपक्षांकडून जागेसाठी होत असलेला आग्रह आणि इच्छुकांची प्रचंड गर्दी यामुळे उमेदवारी वाटपावेळी महायुतीत नाराजीनाट्य रंगण्याची दाट शक्यता आहे. गत विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढूनही प्रत्येक पक्षाने बंडखोरीचा अनुभव घेतला होता. आता आघाडी, महायुतीमुळे नाराजीचा सामना मोठ्या प्रमाणावर करावा लागू शकतो.

सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील लढती लक्षवेधी होणार आहेत. बहुतांश मतदारसंघात तिरंगी व काही ठिकाणी नाराजीतून चौरंगी, पंचरंगी निवडणुकाही होण्याची शक्यता आहे. २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्व मोठ्या पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविली होती. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी, मनसे व अपक्षांच्या गर्दीत बहुरंगी लढती झाल्या होत्या. यंदा तशी परिस्थिती नाही. आघाडी आणि महायुतीचा सामना रंगत असताना, काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे.

मात्र महायुतीला सर्वाधिक नाराजीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आठपैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले आहेत. या जागांमध्ये आणखी काही जागांची भर घालण्याची भाजप नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील आणखी एखादी जागा पदरात पडावी, म्हणून त्यांच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे शिवसेना आक्रमकपणे भाजपच्या काही जागांवर दावेदारी करू लागली आहे. जिल्ह्यातील पाच जागांसाठी त्यांचा दावा असून किमान चार विधानसभा मतदारसंघात तरी शिवसेनेला तिकीट मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी बाळगली आहे.

शिवसेनेशिवाय राष्टÑीय समाज पक्ष  व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) या दोन पक्षांनीही महायुतीकडे जिल्ह्यातील जागांसाठी दावा केला आहे. दोन्ही पक्षांना किमान एका तरी जागेची अपेक्षा आहे. दोन्ही पक्षाांना दोन जागा दिल्यास भाजपच्या आमदारांची संख्या वाढविण्याच्या इच्छेला दणका बसणार आहे. त्यामुळे या दोन्ही घटकपक्षांबाबत तूर्त विचार केला गेला नाही. दोन्ही पक्षांचे, नेत्यांचे सांगलीशी जवळचे संबंध असल्यामुळे जिल्ह्यातील एखादी जागा मिळावी, म्हणून ते प्रयत्नशील आहेत. शिवसेना, भाजपमध्येच जिल्ह्यातील जागावाटप झाले, तर घटकपक्षांच्या नाराजीचा सामना युतीला करावा लागू शकतो.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकSangliसांगली