शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

Sangli- दुष्काळाने शेतकरी धास्तावला.. नेत्यांचा मात्र श्रेयवाद रंगला; जत तालुक्यातील चित्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 16:22 IST

लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेने शेतकरी निराश

दरीबडची : मान्सूनच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जत तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे. शासनाच्या कागदी घोड्यांमुळे दुष्काळाचे भयावह चित्र जाहीर झाले नाही. दुष्काळाच्या दाहकतेमुळे शेतकरी धास्तावला आहे. दुष्काळी झळा जाणवत असताना, नेत्यांमध्ये मात्र म्हैसाळचे पाणी तलावात सोडल्याच्या श्रेयवादाची स्पर्धा लागली आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे शेतकऱ्यांवर निराशेचे ढग दाटले आहेत.पूर्व भागात दुष्काळाची परिस्थिती भीषण आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे सरासरी क्षेत्रापैकी केवळ ५१.६ टक्के क्षेत्रावरच पेरा झाला आहे. उगवण झालेले कोंब वाळून गेले. तालुक्यात गाई, बैल, म्हैशी, शेळ्या-मेंढ्या अशा एकूण ३ लाख ४९ हजार ८९५ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट आहे. सध्या तीन हजार २०० रुपये टनने ऊस विकत घेऊन पशुधन जगविले जात आहे. पशुधन जगविण्याची चिंता लागून राहिली आहे.तालुक्यात ८७.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. ओढे, विहिरी, तलावांतील पाणी पातळीने तळ गाठला आहे. २७ तलावांपैकी १७ तलाव कोरडे आहेत. सध्या ४१९.०२ द.ल.घ.फू. पाणीसाठा म्हणजे फक्त ३ टक्के पाणीसाठा आहे. पाऊस पडला नाही, तर द्राक्ष बागांची छाटणी घ्यायची कशी? या प्रश्नाने शेतकरी धास्तावला आहे.खासदार, आमदार, विरोधी पक्ष शासन दरबारी दबाव आणण्यात व वस्तुस्थिती मांडण्यात कमी पडले आहेत. याउलट लहान, मोठ्या कामांत फोटोसेशन करून श्रेयवाद लाटण्यासाठी नेत्यांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर स्पर्धा सुरू आहे. लोकप्रतिनिधींचे दुष्काळाकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे. याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.विस्तारित जत पूर्व भागात म्हैसाळ योजना मार्गी लावण्यासाठी, तुबची बबलेश्वर योजनेचे राज्य करार करण्यासाठी व दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे.

२५ गावात टँकरने पाणीसध्या २५ गावांना २९ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याची गंभीर परिस्थिती आहे. १९७२ पेक्षा भीषण अशी दुष्काळी परिस्थिती आहे. सत्ताधारी, विरोधी पक्षांनी दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको, उपोषण केले आहे. परंतु, अद्याप दुष्काळी परिस्थितीवर शिक्कामोर्तब झालेले नाही.

‘प्रशासनाने तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठवावा. जनता रस्त्यावर येण्याआधी जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी, रोजगाराचा प्रश्न मार्गी लावा. वीजबिले माफ करावीत. चारा छावण्या सुरू कराव्यात.’ - प्रवीण आवरादी, जत विधानसभा अध्यक्ष, शिवसेना (शिंदे गट)

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटPoliticsराजकारण