शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

Sangli: शिवशाही घेणार निरोप; येणार शिवनेरी, शिवाई आणि हिरकणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 18:35 IST

शिवाईसाठी सांगली, मिरज, इस्लामपुरात चार्जिंग स्टेशन

सांगली : सांगली, मिरज आगारांतील शिवशाही गाड्या १ जूनपासून कायमस्वरूपी विश्रांती घेणार आहेत. गेली आठ वर्षे प्रवाशांना गारेगार प्रवासाचा आनंददायी अनुभव देणाऱ्या या गाड्या आता कालानुरूप भंगारात निघणार आहेत. त्यांची जागा आता शिवनेरी, हिरकणी आणि शिवाई गाड्या घेणार आहेत.सांगली आगारात नऊ आणि मिरजेत १२ शिवशाही गाड्या आहेत. त्या पुणे मार्गावर धावतात. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्यांच्या नादुरुस्तीचे प्रमाण खूपच वाढले आहे. प्रवासांसोबतच चालक आणि वाहकांसाठीही त्या डोकेदुखी बनल्या आहेत. राज्यभरातच कमी-अधिक प्रमाणात असे चित्र आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने शिवशाही गाड्यांचे रूपांतर हिरकणीमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १०० शिवशाही बसचे रूपांतर हिरकणी बसमध्ये केले जाईल. शिवशाहीमधील वातानुकूलित यंत्रणा काढून टाकण्यात येईल. या बदलांमुळे तिकीट दरातही काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे.मिरज-सांगली-पुणे तसेच कोल्हापूर-पुणे मार्गावरील शिवशाही गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाडांचे प्रमाण मोठे आहे. अपघातांची वाढती संख्या, कमी वेग, वातानुकूलन व्यवस्था काम न करणे, खडखड आवाज, रस्त्यात बंद पडणे अशा विविध समस्यांमुळे प्रवासी हैराण आहेत. आता त्याऐवजी हिरकणी, शिवाई आणि शिवनेरी गाड्या येणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

सांगली, मिरज, इस्लामपुरात चार्जिंग स्टेशनशिवाई गाड्या खासगी मालकीच्या असू,न त्या विजेवर धावतात. त्यासाठी इस्लामपूर स्थानकात चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. सांगलीत माधवनगर रस्त्यावर एसटीच्या जागेत आणि मिरजेत दिंडीवेस परिसरातील एसटीच्या जागेत चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवाई गाड्यांसाठी चार्जिंगची सोय होणार आहे. या गाड्यांना पूर्ण चार्जिंग होण्यासाठी सुमारे साडेतीन तासांचा वेळ लागतो. एकदा पूर्ण चार्जिंग झाल्यावर त्या सुमारे ५०० किलोमीटर धावतात. हिरकणी गाड्या जुन्या एशियाड स्वरूपाच्या आहेत. त्याशिवाय शिवनेरी गाड्याही अत्याधुनिक तंत्रांनी युक्त व प्रवाशांसाठी आरामदायी आहेत.

शिवशाहीत एसटीचे वाहकगेल्या जानेवारीपासून सांगली, मिरजेतील शिवशाही गाड्या विनावाहक धावत होत्या. मात्र, १५ मेपासून त्यावर वाहकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विनावाहक गाड्या धावत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शिवशाही नादुरुस्त झाल्यानंतर किरकोळ दुरुस्ती व सुट्या भागासाठी चालकाकडे पैसे नसायचे. शिवाय प्रवासी संख्येवरही परिणाम झाला होता.

टॅग्स :Sangliसांगली