शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

युती तुटण्यास सर्वस्वी शिवसेनाच जबाबदार

By admin | Updated: October 12, 2014 00:53 IST

उमा भारती : खानापूर येथे प्रचार सभा, शिवसेनेवर हल्लाबोल

खानापूर : राष्ट्रवादीचे पैशावर, कॉँग्रेसचे भ्रष्टाचारावर, तर शिवसेनेचे राजकारण धमकीवर चालते. अशा राजकारणाला भाजपचा प्रखर विरोध आहे. महाराष्ट्रात शिवसेनेशी युती आम्ही तोडली नाही. तसे असते तर अजून शिवसेनेचे अनंत गीते केंद्र सरकारमध्ये राहिले नसते. त्यामुळे महाराष्ट्रात सेना-भाजपची युती तुटण्यास शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी आज (शनिवारी) खानापूर येथे केला. उमा भारती म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे हे माझ्या वडिलांसमान होते. त्यांच्या कुटुंबाबद्दल मला आदर आहे. परंतु, युती तुटण्यास भाजप कारणीभूत नसून, शिवसेनाच कारणीभूत आहे. वाजपेयी, अडवाणी हे जिथे वाद असेल व प्रश्न अवघड असेल तेथे मला पाठवत. मी माझी जबाबदारी यशस्वी पार पाडत होते. त्यामुळे मला ‘फायर ब्रॅण्ड’ म्हणून ओळखले जाते. मात्र पंतप्रधान मोदी यांनी मला जलसंधारण मंत्रालय दिले. त्यामुळे मी ‘वॉटर ब्रॅण्ड’ बनले. यापूर्वी जलसंधारणाची कामे राज्य शासन करीत होते. यात दिरंगाई होत आहे. कामे अपुरी रहात आहेत. हे केंद्राच्या लक्षात येत असून, अपुरी कामे पूर्ण करण्यास केंद्र विशेष उपाययोजना करणार आहे. यामध्ये टेंभू योजनेचा प्रश्न सोडविण्यात येईल. या योजनांना केंद्र पैसे देणार, परंतु त्याचा हिशेबही घेणार आहे. अग्रणीसारख्या हंगामी नद्या बारमाही करण्याचा उपक्रम भाजप राबवेल. खा. संजय पाटील म्हणाले की, आतून एक आणि बाहेरून एक या संस्कृतीचा मी कार्यकर्ता नाही. विसापूर सर्कलमधील २१ गावांतील ५० टक्के मते मी भाजपला देणार असल्याचे दाखविणार आहे. टेंभूच्या नावाने २० वर्षे मते मागितली. परंतु, आघाडी शासनास योजना पूर्ण करता आली नाही. यावेळी रमेश शेंडगे, गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, बंडोपंत देशमुख, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. गणेश देसाई, सौ. शुभांगी सुर्वे, अनिल म. बाबर, दिलीप आमणे उपस्थित होते. (वार्ताहर)