शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

युती तुटण्यास सर्वस्वी शिवसेनाच जबाबदार

By admin | Updated: October 12, 2014 00:53 IST

उमा भारती : खानापूर येथे प्रचार सभा, शिवसेनेवर हल्लाबोल

खानापूर : राष्ट्रवादीचे पैशावर, कॉँग्रेसचे भ्रष्टाचारावर, तर शिवसेनेचे राजकारण धमकीवर चालते. अशा राजकारणाला भाजपचा प्रखर विरोध आहे. महाराष्ट्रात शिवसेनेशी युती आम्ही तोडली नाही. तसे असते तर अजून शिवसेनेचे अनंत गीते केंद्र सरकारमध्ये राहिले नसते. त्यामुळे महाराष्ट्रात सेना-भाजपची युती तुटण्यास शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी आज (शनिवारी) खानापूर येथे केला. उमा भारती म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे हे माझ्या वडिलांसमान होते. त्यांच्या कुटुंबाबद्दल मला आदर आहे. परंतु, युती तुटण्यास भाजप कारणीभूत नसून, शिवसेनाच कारणीभूत आहे. वाजपेयी, अडवाणी हे जिथे वाद असेल व प्रश्न अवघड असेल तेथे मला पाठवत. मी माझी जबाबदारी यशस्वी पार पाडत होते. त्यामुळे मला ‘फायर ब्रॅण्ड’ म्हणून ओळखले जाते. मात्र पंतप्रधान मोदी यांनी मला जलसंधारण मंत्रालय दिले. त्यामुळे मी ‘वॉटर ब्रॅण्ड’ बनले. यापूर्वी जलसंधारणाची कामे राज्य शासन करीत होते. यात दिरंगाई होत आहे. कामे अपुरी रहात आहेत. हे केंद्राच्या लक्षात येत असून, अपुरी कामे पूर्ण करण्यास केंद्र विशेष उपाययोजना करणार आहे. यामध्ये टेंभू योजनेचा प्रश्न सोडविण्यात येईल. या योजनांना केंद्र पैसे देणार, परंतु त्याचा हिशेबही घेणार आहे. अग्रणीसारख्या हंगामी नद्या बारमाही करण्याचा उपक्रम भाजप राबवेल. खा. संजय पाटील म्हणाले की, आतून एक आणि बाहेरून एक या संस्कृतीचा मी कार्यकर्ता नाही. विसापूर सर्कलमधील २१ गावांतील ५० टक्के मते मी भाजपला देणार असल्याचे दाखविणार आहे. टेंभूच्या नावाने २० वर्षे मते मागितली. परंतु, आघाडी शासनास योजना पूर्ण करता आली नाही. यावेळी रमेश शेंडगे, गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, बंडोपंत देशमुख, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. गणेश देसाई, सौ. शुभांगी सुर्वे, अनिल म. बाबर, दिलीप आमणे उपस्थित होते. (वार्ताहर)