शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

शिराळा विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या नेत्यांनी मताधिक्य राखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 17:27 IST

लोकसभा निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या गावांमध्ये राजू शेट्टींना मताधिक्य दिले, तर शिराळा शहरातून धैर्यशील माने यांना मताधिक्य देण्यात आमदार नाईक गटाला यश आले. शिराळा शहर वगळता बहुतांश ग्रामीण भागात शेट्टी यांना मताधिक्य मिळाले आहे.

ठळक मुद्देशिराळा विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या नेत्यांनी मताधिक्य राखलेआमदार नाईक गट, कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले मताधिक्य

विकास शहाशिराळा : लोकसभा निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या गावांमध्ये राजू शेट्टींना मताधिक्य दिले, तर शिराळा शहरातून धैर्यशील माने यांना मताधिक्य देण्यात आमदार नाईक गटाला यश आले. शिराळा शहर वगळता बहुतांश ग्रामीण भागात शेट्टी यांना मताधिक्य मिळाले आहे.शिराळा मतदारसंघात शिराळा तालुक्यासह वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सम्राट महाडिक, अभिजित पाटील हे वाळवा तालुक्यातील नेते, तर आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख या नेत्यांत अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड सुरू होती.राज्याचे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर या गावाचाही या मतदारसंघात समावेश आहे. या गावात धैर्यशील माने यांना आघाडी मिळाली. त्यांना ४५६ मते मिळाली, तर राजू शेट्टी यांना १९८ मते मिळाली.चिखली हे आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे गाव. येथे माजी आमदार नाईक गटाने बाजी मारली. राजू शेट्टी यांनी ३६८ मतांचे मताधिक्य घेतले आहे, तर कोकरूड या सत्यजित देशमुख यांच्या गावात १२५१ मतांचे मताधिक्य राजू शेट्टी यांना मिळाले आहे.शिराळा शहरात माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची ताकद आहे; मात्र यावेळी आमदार नाईक गटाने धैर्यशील माने यांना ५५९ मतांचे मताधिक्य दिले आहे. याला कारणीभूत शिराळा नागपंचमी विषय ठरला आहे.नागपंचमीबाबत येथील नागरिकांचे शिष्टमंडळ राजू शेट्टी यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. यावेळी शेट्टी यांनी शिष्टमंडळाला चांगली वागणूक दिली नाही, अशी व्हीडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. याचा फटका बसल्याने येथे माने यांना मताधिक्य मिळाले.बिऊर हे भाजपचे तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील यांचे गाव आहे. येथे त्यांच्या गटाची सत्ता आहे. मात्र येथे राजू शेट्टी यांना ४१७ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. वाळवा तालुक्यातील कासेगाव हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे गाव आहे. येथे शेट्टी यांना २२५२ मताधिक्य मिळाले आहे.

पेठ येथे नानासाहेब महाडिक यांचे वर्चस्व आहे. येथे चुरशीने प्रचार केल्याने फक्त १०८ मते शेट्टी यांना जास्त मिळाली. येलूर हे सम्राट महाडिक यांचे गाव आहे. याठिकाणी माने यांना ६१६ मतांचे मताधिक्य मिळाले. चिकुर्डे हे शिवसेनेचे अभिजित पाटील यांचे गाव आहे. येथे शेट्टी यांना १९२ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. कुरळप हे राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांचे गाव आहे. येथे राजू शेट्टी यांना ८८२ इतके मताधिक्य मिळाले.शिराळा तालुक्याने ११ हजार ५३३, तर वाळवा तालुक्याने ९५०९ असे २१ हजार ४२ मतांचे मताधिक्य राजू शेट्टी यांना मिळाले आहे. तर वंचित आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद यांना १० हजार २२२, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांना ६०७ मते मिळाली आहेत. 

टॅग्स :sangli-pcसांगलीJayant Patilजयंत पाटीलSadabhau Khotसदाभाउ खोत Sangliसांगली