शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

शिराळा विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या नेत्यांनी मताधिक्य राखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 17:27 IST

लोकसभा निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या गावांमध्ये राजू शेट्टींना मताधिक्य दिले, तर शिराळा शहरातून धैर्यशील माने यांना मताधिक्य देण्यात आमदार नाईक गटाला यश आले. शिराळा शहर वगळता बहुतांश ग्रामीण भागात शेट्टी यांना मताधिक्य मिळाले आहे.

ठळक मुद्देशिराळा विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या नेत्यांनी मताधिक्य राखलेआमदार नाईक गट, कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले मताधिक्य

विकास शहाशिराळा : लोकसभा निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या गावांमध्ये राजू शेट्टींना मताधिक्य दिले, तर शिराळा शहरातून धैर्यशील माने यांना मताधिक्य देण्यात आमदार नाईक गटाला यश आले. शिराळा शहर वगळता बहुतांश ग्रामीण भागात शेट्टी यांना मताधिक्य मिळाले आहे.शिराळा मतदारसंघात शिराळा तालुक्यासह वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सम्राट महाडिक, अभिजित पाटील हे वाळवा तालुक्यातील नेते, तर आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख या नेत्यांत अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड सुरू होती.राज्याचे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर या गावाचाही या मतदारसंघात समावेश आहे. या गावात धैर्यशील माने यांना आघाडी मिळाली. त्यांना ४५६ मते मिळाली, तर राजू शेट्टी यांना १९८ मते मिळाली.चिखली हे आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे गाव. येथे माजी आमदार नाईक गटाने बाजी मारली. राजू शेट्टी यांनी ३६८ मतांचे मताधिक्य घेतले आहे, तर कोकरूड या सत्यजित देशमुख यांच्या गावात १२५१ मतांचे मताधिक्य राजू शेट्टी यांना मिळाले आहे.शिराळा शहरात माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची ताकद आहे; मात्र यावेळी आमदार नाईक गटाने धैर्यशील माने यांना ५५९ मतांचे मताधिक्य दिले आहे. याला कारणीभूत शिराळा नागपंचमी विषय ठरला आहे.नागपंचमीबाबत येथील नागरिकांचे शिष्टमंडळ राजू शेट्टी यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. यावेळी शेट्टी यांनी शिष्टमंडळाला चांगली वागणूक दिली नाही, अशी व्हीडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. याचा फटका बसल्याने येथे माने यांना मताधिक्य मिळाले.बिऊर हे भाजपचे तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील यांचे गाव आहे. येथे त्यांच्या गटाची सत्ता आहे. मात्र येथे राजू शेट्टी यांना ४१७ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. वाळवा तालुक्यातील कासेगाव हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे गाव आहे. येथे शेट्टी यांना २२५२ मताधिक्य मिळाले आहे.

पेठ येथे नानासाहेब महाडिक यांचे वर्चस्व आहे. येथे चुरशीने प्रचार केल्याने फक्त १०८ मते शेट्टी यांना जास्त मिळाली. येलूर हे सम्राट महाडिक यांचे गाव आहे. याठिकाणी माने यांना ६१६ मतांचे मताधिक्य मिळाले. चिकुर्डे हे शिवसेनेचे अभिजित पाटील यांचे गाव आहे. येथे शेट्टी यांना १९२ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. कुरळप हे राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांचे गाव आहे. येथे राजू शेट्टी यांना ८८२ इतके मताधिक्य मिळाले.शिराळा तालुक्याने ११ हजार ५३३, तर वाळवा तालुक्याने ९५०९ असे २१ हजार ४२ मतांचे मताधिक्य राजू शेट्टी यांना मिळाले आहे. तर वंचित आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद यांना १० हजार २२२, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांना ६०७ मते मिळाली आहेत. 

टॅग्स :sangli-pcसांगलीJayant Patilजयंत पाटीलSadabhau Khotसदाभाउ खोत Sangliसांगली