शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

एसटीचा श्रावणात शिमगा; पाच हजार कर्मचाऱ्यांचे पगार दोन महिन्यांपासून लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : एस. टी. महामंडळाच्या सांगली विभागातील चार हजार ९६४ कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिना निम्मा संपला तरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : एस. टी. महामंडळाच्या सांगली विभागातील चार हजार ९६४ कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिना निम्मा संपला तरी पगार झालेला नाही. यामुळे या कर्मचाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुला-मुलींचे शिक्षण, लग्नाचा खर्च करायचा कसा, असे प्रश्न अनेक चालक, वाहकांना भेडसावत आहेत. शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न कायमचा सोडवावा, अशी एस. टी. संघटनांची मागणी आहे.

गेल्या दोन वर्षांपासून एस. टी. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. रोजंदारीवरील २८५ चालक-वाहकांना तर कामावर बोलावले तरच पगार मिळतो. उर्वरित दिवसाचा पगारही मिळत नाही. यामुळे रोजंदारीवरील चालक व वाहकांवर बेरोजगारीचीच वेळ आली आहे. अन्य कर्मचाऱ्यांनाही जुलै महिन्याचा पगार मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांनी पगाराबद्दल अधिकाऱ्यांना विचारले तर पैसेच नाहीत तर पगार कुठून देणार, अशी उत्तरे मिळत आहेत. यामुळे एस. टी.चे कर्मचारी प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत.

चौकट

आकडे काय सांगतात

आगार कर्मचारी संख्या

सांगली ५७७

मिरज ४५९

इस्लामपूर ४३०

तासगाव ३८६

विटा ३५६

जत ३७५

आटपाडी २७३

क. महांकाळ ३०३

शिराळा ३९४

पलूस २१७

वर्कशॉप ८८५

इतर कर्मचारी ३०९

एकूण ४९६४

चौकट

उसनवारी तरी किती दिवस करायची?

कोट

अनेक कर्मचाऱ्यांचे हातावरचे पोट असून, पगार झाला तरच त्यांचा संसार चालतो. अशावेळी दोन ते तीन महिने पगार नाही, तर कर्मचाऱ्यांचा संसार कसा चालणार आहे. पैसे उसने घेऊन किती दिवस संसार चालवायचा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

-नारायण सूर्यवंशी, विभागीय सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

कोट

प्रामाणिक काम करूनही एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. घराचा संसार चालविणे कठीण झाले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने महिन्याच महिन्याला पगार केला पाहिजे.

-विलास जाधव, कर्मचारी

चौकट

उत्पन्न कमी; खर्च जास्त

-एसटी महामंडळाच्या सांगली विभागाचा महिन्याचा खर्च सध्या ७५ लाख रुपये आहे. उत्पन्न मात्र ३७ लाख रुपये मिळत आहे. महिन्याला ३८ लाखांचा तोटा असून, तो कसा भरून काढायचा, असा आमच्यासमोर प्रश्न पडला आहे. कोरोनामुळे एसटीच्या उत्पन्नाचे गणिक कोलमडले आहे, अशी खंत विभाग नियंत्रक अरुण वाघाटे यांनी व्यक्त केले.

-एसटीचे उत्पन्न सुरळीत होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होणे कठीणच आहे, असेही काही अधिकारी खासगीत सांगत आहेत.

कोट

एसटी महामंडळाच्या सांगली विभागातील कर्मचाऱ्यांचा जूनचा पगार झाला आहे. पण, जुलै महिन्याच्या पगार झाला नाही. पगारासाठी वरिष्ठ कार्यालयांकडे निधीची मागणी केली आहे. निधी मिळताच सर्व कर्मचाऱ्यांचे पगार केले जाणार आहे.

-अरुण वाघाटे, विभाग नियंत्रक, सांगली विभागीय कार्यालय, एसटी महामंडळ