शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

मतदान यंत्रामध्ये घोळ हा शरद पवारांचा जावईशोध : देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 14:45 IST

देशभरात महाआघाडीचे उमेदवार जेथे विजयी झाले, तेथील मतदान यंत्रे चांगली आणि जेथे पराभूत झाले तेथे गोलमाल, हा आरोप चुकीचा आहे. विरोधक आपले अपयश लपविण्यासाठी असा आरोप करत आहेत. जेथे पराभव झाला, त्या ठिकाणच्या यंत्रांमध्ये गोलमाल केला जात असल्याचा जावईशोध बारामतीकरांनीच लावला आहे, अशी मिश्किल टिप्पणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी सांगलीत केली.

ठळक मुद्देमतदान यंत्रामध्ये घोळ हा शरद पवारांचा जावईशोध सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी साधला पत्रकारांशी संवाद

सांगली : देशभरात महाआघाडीचे उमेदवार जेथे विजयी झाले, तेथील मतदान यंत्रे चांगली आणि जेथे पराभूत झाले तेथे गोलमाल, हा आरोप चुकीचा आहे. विरोधक आपले अपयश लपविण्यासाठी असा आरोप करत आहेत. जेथे पराभव झाला, त्या ठिकाणच्या यंत्रांमध्ये गोलमाल केला जात असल्याचा जावईशोध बारामतीकरांनीच लावला आहे, अशी मिश्किल टिप्पणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी सांगलीत केली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी देशमुख यांनी विरोधकांकडून सुरू असलेल्या ईव्हीएमबाबतच्या आरोपावर टीका केली.देशमुख म्हणाले की, देशातील मतदार भाजपच्या पाठीशी आहेत, हे निवडणुकीच्या निकालावरून सिध्द झाले आहे. लोकांचा सरकारवर विश्वास असल्यानेच पुन्हा भाजपला सत्ता मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विरोधकांनी यापूर्वी केलेला कारभार देशातील सर्वसामान्य मतदारांना माहीत आहे. त्यामुळे लोकांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला आहे, असे असताना आता विरोधकांकडून मतदान यंत्राचा विषय समोर आणला जात आहे.

मतदान यंत्राबाबत आक्षेप घेऊन संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वत:चे अपयश लपविण्यासाठी पराभवाचे खापर मतदान यंत्रावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. यापेक्षा विरोधकांनी आपला झालेला पराभव मान्य करावा. भाजपने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात देशभर केलेल्या विकासकामांची पोहोच म्हणून हा विक्रमी विजय मिळाला आहे.ज्या ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले, तेथील यंत्रे चांगली आहेत. ज्या मतदारसंघात पराभव झाला, तेथील यंत्रांमध्ये सेटिंग असल्याच्या तर्क लढवण्यात येत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाला, तर जनतेचा लोकशाहीवरील विश्वास संपेल, असे भाकित पवारांनी केले होते. परंतु बारामतीमध्ये राष्ट्रवादीने विजय मिळविला आहे. त्यामुळे सर्व यंत्रे चांगली आहेत, हे निकालावरून स्पष्ट झाले आहे. यावरून लोकशाही अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारकडून प्रशासनास सर्व त्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडूनही दुष्काळ निवारणाच्या कामांचे नेटके नियोजन करण्यात येत आहे. गरज असेल तेथे चारा छावण्या सुरू करण्याचे, तसेच पिण्याचे पाणी तातडीने पुरविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखSangliसांगली