शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जयंतरावांची उंची अन् शरद पवारांचा अनुभवाचा डोस; सांगलीच्या कार्यक्रमातील उपदेश पक्षातील पडझड रोखणार ?

By अविनाश कोळी | Updated: January 18, 2024 17:10 IST

अविनाश कोळी सांगली : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बुरुज हलत असल्याचे जाणवल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्यात वाक्यात नेते व ...

अविनाश कोळीसांगली : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बुरुज हलत असल्याचे जाणवल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्यात वाक्यात नेते व कार्यकर्त्यांना अनुभवाचे डोस दिले. सत्तेच्या पटाकडे खेचल्या जाणाऱ्यांना लोकनेते राजारामबापूंच्या कार्याची आठवण करून देत विरोधात राहूनही कामे करता येतात, याचा इतिहास मांडला. जयंत पाटील यांची उंची किती मोठी आहे, हे सांगत त्यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहनही केले. पवारांचा हा डोस जिल्ह्यात कामी येणार की, तो निकामी होणार हे पुढील काळात स्पष्ट होईल.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वर्चस्व असलेल्या सांगली जिल्ह्यात पक्षाची पडझड होण्याची चिन्हे दिसत आहेत. माजी महापौर, नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जयंतरावांच्या गडाला हादरे बसू लागले आहेत. संभाव्य पडझड रोखण्यासाठी शरद पवारांनी सांगलीतील कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना अनुभवाचे बाेल सांगितले. राज्याच्या राजकारणात जयंतरावांची उंची मोठी आहे, असे सांगून राजारामबापूंप्रमाणे त्यांच्याही पाठीशी राहण्याचे आवाहन त्यांना करावे लागले.सत्तेच्या पटावर राहूनच कामे करता येतात, हा अनेकांच्या मनातील ग्रह काढून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राजारामबापू बहुतांश काळ विरोधात राहिले. तरीही त्यांनी त्या काळात विकासकामे कशी केली, मतदारसंघाचा कायापालट कशापद्धतीने केला, याचा इतिहास मांडला. कामे होत नसल्याचे कारण सांगूनच अनेकांनी पक्षत्याग केला, पण ही पावले कशी चुकीची आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांचा हा अल्पसा प्रयत्न पक्षाची पडझड रोखण्यास उपयोगी ठरणार का हा उत्सुकतेचा विषय बनला आहे.

पुतण्याशी चर्चा अन् काकांचे स्वागतअजित पवारांची भेट घेऊन आलेले सांगली, मिरज व कुपवाडमधील अनेक माजी नगरसेवक शरद पवारांच्या स्वागतासाठी सांगलीत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नियोजनातही होते. त्यामुळेच शरद पवारांनी त्यांना हे अनुभवाचे बोल सांगितले असावेत, अशीही चर्चा रंगली आहे.

जयंतरावांकडून निष्ठेचा मंत्रराजारामबापूंशी निष्ठा असणाऱ्या लोकांचा नावानिशी उल्लेख करून जयंतरावांनी निष्ठेला सलाम केला. बापूंवर प्रेम करणारे लोक कुठेही जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी गड मजबूत असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटील