शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

जयंतरावांची उंची अन् शरद पवारांचा अनुभवाचा डोस; सांगलीच्या कार्यक्रमातील उपदेश पक्षातील पडझड रोखणार ?

By अविनाश कोळी | Updated: January 18, 2024 17:10 IST

अविनाश कोळी सांगली : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बुरुज हलत असल्याचे जाणवल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्यात वाक्यात नेते व ...

अविनाश कोळीसांगली : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बुरुज हलत असल्याचे जाणवल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्यात वाक्यात नेते व कार्यकर्त्यांना अनुभवाचे डोस दिले. सत्तेच्या पटाकडे खेचल्या जाणाऱ्यांना लोकनेते राजारामबापूंच्या कार्याची आठवण करून देत विरोधात राहूनही कामे करता येतात, याचा इतिहास मांडला. जयंत पाटील यांची उंची किती मोठी आहे, हे सांगत त्यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहनही केले. पवारांचा हा डोस जिल्ह्यात कामी येणार की, तो निकामी होणार हे पुढील काळात स्पष्ट होईल.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वर्चस्व असलेल्या सांगली जिल्ह्यात पक्षाची पडझड होण्याची चिन्हे दिसत आहेत. माजी महापौर, नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जयंतरावांच्या गडाला हादरे बसू लागले आहेत. संभाव्य पडझड रोखण्यासाठी शरद पवारांनी सांगलीतील कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना अनुभवाचे बाेल सांगितले. राज्याच्या राजकारणात जयंतरावांची उंची मोठी आहे, असे सांगून राजारामबापूंप्रमाणे त्यांच्याही पाठीशी राहण्याचे आवाहन त्यांना करावे लागले.सत्तेच्या पटावर राहूनच कामे करता येतात, हा अनेकांच्या मनातील ग्रह काढून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राजारामबापू बहुतांश काळ विरोधात राहिले. तरीही त्यांनी त्या काळात विकासकामे कशी केली, मतदारसंघाचा कायापालट कशापद्धतीने केला, याचा इतिहास मांडला. कामे होत नसल्याचे कारण सांगूनच अनेकांनी पक्षत्याग केला, पण ही पावले कशी चुकीची आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांचा हा अल्पसा प्रयत्न पक्षाची पडझड रोखण्यास उपयोगी ठरणार का हा उत्सुकतेचा विषय बनला आहे.

पुतण्याशी चर्चा अन् काकांचे स्वागतअजित पवारांची भेट घेऊन आलेले सांगली, मिरज व कुपवाडमधील अनेक माजी नगरसेवक शरद पवारांच्या स्वागतासाठी सांगलीत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नियोजनातही होते. त्यामुळेच शरद पवारांनी त्यांना हे अनुभवाचे बोल सांगितले असावेत, अशीही चर्चा रंगली आहे.

जयंतरावांकडून निष्ठेचा मंत्रराजारामबापूंशी निष्ठा असणाऱ्या लोकांचा नावानिशी उल्लेख करून जयंतरावांनी निष्ठेला सलाम केला. बापूंवर प्रेम करणारे लोक कुठेही जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी गड मजबूत असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटील