शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

शंभुराज देसाई यांनी कोयनेच्या पाण्यात कपात करू नये, कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मागणी 

By अशोक डोंबाळे | Updated: November 29, 2023 16:49 IST

सांगली : कोयना धरणात आजही ८० टीएमसी पाणीसाठा आहे. धरणात पाणीसाठा कमी असल्याचे सांगून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई ...

सांगली : कोयना धरणात आजही ८० टीएमसी पाणीसाठा आहे. धरणात पाणीसाठा कमी असल्याचे सांगून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी पाणी कपातीचा निर्णय घेण्याची गरज आहे. त्यांनी मंत्रिपदाचा वापर करून प्रशासनावर दबाव आणणे थांबवावे, अन्यथा सांगलीची जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, सांगली जिल्ह्याच्या हक्काचे पाणी देण्यासाठी शंभुराज देसाई यांच्या भूलथापा खपवून घेणार नाही. सातारा येथे झालेल्या बैठकीमध्ये पाणी कपात प्रस्तावित केली आहे. पिण्याच्या पाणी वापरात २.८६ टीएमसी तर वीज निर्मितीच्या पाणी वापरात ८.८५ टीएमसी पाणी कपात प्रस्तावित आहे. ही कपात मान्य झाली आणि उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली तर राज्याला भारनियमनाला सामोरे जावे लागणार आहे.

१९६३ पासून सांगली जिल्ह्याचा कृष्णा नदीवरील ३७.५० टीएमसी पाण्यावर हक्क आहे. असे असतानाही पाणी कपात कशासाठी? अजूनही धरणामध्ये १३.५० टीएमसी पाणीसाठा अतिरिक्त आहे. असे असतांना पाणी कपात करू नये. सांगली पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे कृष्णा नदी कोरडी पडत आहे. जलसंपदा विभागाने बरगे न घातल्यामुळेही पाणी वाया जात आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

सांगलीकरांना वेठीस धरु नयेसिंचन, बिगर सिंचन औद्योगिक, पिण्यासाठी सांगली जिल्ह्याला ३७.५० टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. ते देणे प्रशासनाला बंधनकारकच आहे. असे असताना चुकीची माहिती देत मुख्य अभियंता ही लोकांची दिशाभूल करत आहेत. वीज निर्मितीसाठी दहा टीएमसी पाणी कमी पडेल, त्यासाठी २२६ कोटींची तरतूद शासनाने करण्याची गरज आहे. त्यासाठी मुख्य अभियंता यांनी आग्रह धरण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष करून सांगलीकरांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबवावेत, अन्यथा शेतकरी आंदोलन करतील, असा इशाराही सर्जेराव पाटील यांनी दिला.

मंत्री म्हणतात पाणी वापर मर्यादित करासाताराचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाणी वापराच्या नियोजनाबाबत बैठक झाली आहे. या बैठकीत कोयना धरणातून रब्बी व उन्हाळ्यात सिंचन व वीज निर्मितीसाठी पाण्याचा वापर मर्यादित करा, असे आदेश दिल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाचे अधिकारी सांगत आहेत. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यावर अन्याय होणार असल्याचे सर्जेराव पाटील म्हणाले

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणShambhuraj Desaiशंभूराज देसाई