शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

शंभुराज देसाई यांनी कोयनेच्या पाण्यात कपात करू नये, कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मागणी 

By अशोक डोंबाळे | Updated: November 29, 2023 16:49 IST

सांगली : कोयना धरणात आजही ८० टीएमसी पाणीसाठा आहे. धरणात पाणीसाठा कमी असल्याचे सांगून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई ...

सांगली : कोयना धरणात आजही ८० टीएमसी पाणीसाठा आहे. धरणात पाणीसाठा कमी असल्याचे सांगून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी पाणी कपातीचा निर्णय घेण्याची गरज आहे. त्यांनी मंत्रिपदाचा वापर करून प्रशासनावर दबाव आणणे थांबवावे, अन्यथा सांगलीची जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, सांगली जिल्ह्याच्या हक्काचे पाणी देण्यासाठी शंभुराज देसाई यांच्या भूलथापा खपवून घेणार नाही. सातारा येथे झालेल्या बैठकीमध्ये पाणी कपात प्रस्तावित केली आहे. पिण्याच्या पाणी वापरात २.८६ टीएमसी तर वीज निर्मितीच्या पाणी वापरात ८.८५ टीएमसी पाणी कपात प्रस्तावित आहे. ही कपात मान्य झाली आणि उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली तर राज्याला भारनियमनाला सामोरे जावे लागणार आहे.

१९६३ पासून सांगली जिल्ह्याचा कृष्णा नदीवरील ३७.५० टीएमसी पाण्यावर हक्क आहे. असे असतानाही पाणी कपात कशासाठी? अजूनही धरणामध्ये १३.५० टीएमसी पाणीसाठा अतिरिक्त आहे. असे असतांना पाणी कपात करू नये. सांगली पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे कृष्णा नदी कोरडी पडत आहे. जलसंपदा विभागाने बरगे न घातल्यामुळेही पाणी वाया जात आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

सांगलीकरांना वेठीस धरु नयेसिंचन, बिगर सिंचन औद्योगिक, पिण्यासाठी सांगली जिल्ह्याला ३७.५० टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. ते देणे प्रशासनाला बंधनकारकच आहे. असे असताना चुकीची माहिती देत मुख्य अभियंता ही लोकांची दिशाभूल करत आहेत. वीज निर्मितीसाठी दहा टीएमसी पाणी कमी पडेल, त्यासाठी २२६ कोटींची तरतूद शासनाने करण्याची गरज आहे. त्यासाठी मुख्य अभियंता यांनी आग्रह धरण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष करून सांगलीकरांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबवावेत, अन्यथा शेतकरी आंदोलन करतील, असा इशाराही सर्जेराव पाटील यांनी दिला.

मंत्री म्हणतात पाणी वापर मर्यादित करासाताराचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाणी वापराच्या नियोजनाबाबत बैठक झाली आहे. या बैठकीत कोयना धरणातून रब्बी व उन्हाळ्यात सिंचन व वीज निर्मितीसाठी पाण्याचा वापर मर्यादित करा, असे आदेश दिल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाचे अधिकारी सांगत आहेत. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यावर अन्याय होणार असल्याचे सर्जेराव पाटील म्हणाले

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणShambhuraj Desaiशंभूराज देसाई