शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शंभुराज देसाई यांनी कोयनेच्या पाण्यात कपात करू नये, कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मागणी 

By अशोक डोंबाळे | Updated: November 29, 2023 16:49 IST

सांगली : कोयना धरणात आजही ८० टीएमसी पाणीसाठा आहे. धरणात पाणीसाठा कमी असल्याचे सांगून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई ...

सांगली : कोयना धरणात आजही ८० टीएमसी पाणीसाठा आहे. धरणात पाणीसाठा कमी असल्याचे सांगून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी पाणी कपातीचा निर्णय घेण्याची गरज आहे. त्यांनी मंत्रिपदाचा वापर करून प्रशासनावर दबाव आणणे थांबवावे, अन्यथा सांगलीची जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, सांगली जिल्ह्याच्या हक्काचे पाणी देण्यासाठी शंभुराज देसाई यांच्या भूलथापा खपवून घेणार नाही. सातारा येथे झालेल्या बैठकीमध्ये पाणी कपात प्रस्तावित केली आहे. पिण्याच्या पाणी वापरात २.८६ टीएमसी तर वीज निर्मितीच्या पाणी वापरात ८.८५ टीएमसी पाणी कपात प्रस्तावित आहे. ही कपात मान्य झाली आणि उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली तर राज्याला भारनियमनाला सामोरे जावे लागणार आहे.

१९६३ पासून सांगली जिल्ह्याचा कृष्णा नदीवरील ३७.५० टीएमसी पाण्यावर हक्क आहे. असे असतानाही पाणी कपात कशासाठी? अजूनही धरणामध्ये १३.५० टीएमसी पाणीसाठा अतिरिक्त आहे. असे असतांना पाणी कपात करू नये. सांगली पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे कृष्णा नदी कोरडी पडत आहे. जलसंपदा विभागाने बरगे न घातल्यामुळेही पाणी वाया जात आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

सांगलीकरांना वेठीस धरु नयेसिंचन, बिगर सिंचन औद्योगिक, पिण्यासाठी सांगली जिल्ह्याला ३७.५० टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. ते देणे प्रशासनाला बंधनकारकच आहे. असे असताना चुकीची माहिती देत मुख्य अभियंता ही लोकांची दिशाभूल करत आहेत. वीज निर्मितीसाठी दहा टीएमसी पाणी कमी पडेल, त्यासाठी २२६ कोटींची तरतूद शासनाने करण्याची गरज आहे. त्यासाठी मुख्य अभियंता यांनी आग्रह धरण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष करून सांगलीकरांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबवावेत, अन्यथा शेतकरी आंदोलन करतील, असा इशाराही सर्जेराव पाटील यांनी दिला.

मंत्री म्हणतात पाणी वापर मर्यादित करासाताराचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाणी वापराच्या नियोजनाबाबत बैठक झाली आहे. या बैठकीत कोयना धरणातून रब्बी व उन्हाळ्यात सिंचन व वीज निर्मितीसाठी पाण्याचा वापर मर्यादित करा, असे आदेश दिल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाचे अधिकारी सांगत आहेत. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यावर अन्याय होणार असल्याचे सर्जेराव पाटील म्हणाले

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणShambhuraj Desaiशंभूराज देसाई