शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्ग विरोधकांनी सांगलीत पालकमंत्र्यांची गाडी अडवली, सरकारविरोधात जोरदार घोषणा 

By अशोक डोंबाळे | Updated: June 22, 2024 17:36 IST

सुरेश खाडे यांनी शासनाकडून शेतकऱ्यांच्या भावना मांडण्याचे आश्वासन

सांगली : शेतकऱ्यांना भूमिहीन करून महापुराचा धोका वाढविणारा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावेळी शनिवारी पालकमंत्री सुरेश खाडे यांची गाडी अडवण्यात आली. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृतीच्या पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचे खासदार, आमदारासंह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी झालेल्या आंदोलनात खासदार विशाल पाटील, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, माजी मंत्री प्रतीक पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख, नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर, डॉ. जितेश कदम, भाजपचे नेते पृथ्वीराज पवार, महेश साळुंखे, संजय हजारे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

महामार्ग स्थगित करण्याऐवजी सरकारने रद्द करावा, अशी आग्रही मागणी केली. पालकमंत्री खाडे नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असताना अडवण्यात आले. मंत्री खाडे यांनी मोटारीतून उतरून निवेदन स्वीकारले. दरम्यान, घडलेल्या या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली.महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतून प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावांतून जात आहे. शेटफळे, घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी, सावळज, सिद्धेवाडी, अंजनी, सावर्डे, गव्हाण, वज्रचौंडे, मनेराजुरी, मतकुणकी, नागाव कवठे, कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलवाडी इत्यादी गावांतील पाच हजार शेतकरी बाधित होत आहेत. ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, त्यांना जमिनीचा मोबदला अत्यंत कमी मिळणार आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्गच रद्द झाला पाहिजे, अशी शेतकऱ्यांसह सर्वच आंदोलकांनी पालकमंत्री खाडे यांच्याकडे भूमिका मांडली.

देवही माफ करणार नाही : धैर्यशील मानेपरमेश्वराच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनीवर कोणी नांगर फिरवत असेल, तर त्यांना देवदेखील माफ करणार नाही, अशी टीका करून खासदार धैर्यशील माने यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेसने काढलेल्या मोर्चात सहभागी होत माने यांनी सरकारविरोधात जोरदार टीका केली. जेव्हा शेतकऱ्यांचा विषय येईल, तेव्हा सरकार विरोधात उभे राहू. शक्तिपीठ महामार्गविरोधात लोकसभेत विशाल पाटील यांच्यासोबत आवाज उठविणार, असे आश्वासनही माने यांनी शेतकऱ्यांना दिले.

महामार्ग शेतकऱ्यांवर लादू देणार नाही : विश्वजित कदमशासनाने गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन संपादन करण्याची भूमिका घेतली आहे. हा महामार्ग जाणाऱ्या १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कोणतीच कल्पना न देता हुकूमशाही पद्धतीने हा निर्णय लादला गेला असून, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. पर्यायी रस्ते उपलब्ध असताना ८५ हजार कोटी रुपये खर्च करून कंत्राटदारांचे खिसे भरणारा हा महामार्ग शेतकऱ्यांवर आम्ही लादू देणार नाही, असा इशारा माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीguardian ministerपालक मंत्रीhighwayमहामार्ग