शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

शक्तिपीठ महामार्ग विरोधकांनी सांगलीत पालकमंत्र्यांची गाडी अडवली, सरकारविरोधात जोरदार घोषणा 

By अशोक डोंबाळे | Updated: June 22, 2024 17:36 IST

सुरेश खाडे यांनी शासनाकडून शेतकऱ्यांच्या भावना मांडण्याचे आश्वासन

सांगली : शेतकऱ्यांना भूमिहीन करून महापुराचा धोका वाढविणारा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावेळी शनिवारी पालकमंत्री सुरेश खाडे यांची गाडी अडवण्यात आली. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृतीच्या पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचे खासदार, आमदारासंह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी झालेल्या आंदोलनात खासदार विशाल पाटील, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, माजी मंत्री प्रतीक पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख, नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर, डॉ. जितेश कदम, भाजपचे नेते पृथ्वीराज पवार, महेश साळुंखे, संजय हजारे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

महामार्ग स्थगित करण्याऐवजी सरकारने रद्द करावा, अशी आग्रही मागणी केली. पालकमंत्री खाडे नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असताना अडवण्यात आले. मंत्री खाडे यांनी मोटारीतून उतरून निवेदन स्वीकारले. दरम्यान, घडलेल्या या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली.महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतून प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावांतून जात आहे. शेटफळे, घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी, सावळज, सिद्धेवाडी, अंजनी, सावर्डे, गव्हाण, वज्रचौंडे, मनेराजुरी, मतकुणकी, नागाव कवठे, कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलवाडी इत्यादी गावांतील पाच हजार शेतकरी बाधित होत आहेत. ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, त्यांना जमिनीचा मोबदला अत्यंत कमी मिळणार आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्गच रद्द झाला पाहिजे, अशी शेतकऱ्यांसह सर्वच आंदोलकांनी पालकमंत्री खाडे यांच्याकडे भूमिका मांडली.

देवही माफ करणार नाही : धैर्यशील मानेपरमेश्वराच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनीवर कोणी नांगर फिरवत असेल, तर त्यांना देवदेखील माफ करणार नाही, अशी टीका करून खासदार धैर्यशील माने यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेसने काढलेल्या मोर्चात सहभागी होत माने यांनी सरकारविरोधात जोरदार टीका केली. जेव्हा शेतकऱ्यांचा विषय येईल, तेव्हा सरकार विरोधात उभे राहू. शक्तिपीठ महामार्गविरोधात लोकसभेत विशाल पाटील यांच्यासोबत आवाज उठविणार, असे आश्वासनही माने यांनी शेतकऱ्यांना दिले.

महामार्ग शेतकऱ्यांवर लादू देणार नाही : विश्वजित कदमशासनाने गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन संपादन करण्याची भूमिका घेतली आहे. हा महामार्ग जाणाऱ्या १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कोणतीच कल्पना न देता हुकूमशाही पद्धतीने हा निर्णय लादला गेला असून, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. पर्यायी रस्ते उपलब्ध असताना ८५ हजार कोटी रुपये खर्च करून कंत्राटदारांचे खिसे भरणारा हा महामार्ग शेतकऱ्यांवर आम्ही लादू देणार नाही, असा इशारा माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीguardian ministerपालक मंत्रीhighwayमहामार्ग