शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील शंभरावर गावात सौरउर्जेने फुलणार शिवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 16:49 IST

विजेच्या मागणीत वाढ होत असताना, त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने सर्वसामान्यांना दरवाढीचा, भारनियमनाचा झटका सहन करावा लागत आहे. यास समर्थ पर्याय म्हणून जिल्ह्यात सौरऊर्जेच्या माध्यमातून २५ प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असून, त्याव्दारे ४० मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. ही वीज शेतकºयांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने त्यांना दिवसा विजेची उपलब्धता होणार आहे.

ठळक मुद्दे४0 मेगॉवॅट वीजेची निर्मिती शक्यशेतकऱ्यांना दिवसाही मिळणार वीज

शरद जाधव

सांगली : विजेच्या मागणीत वाढ होत असताना, त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने सर्वसामान्यांना दरवाढीचा, भारनियमनाचा झटका सहन करावा लागत आहे. यास समर्थ पर्याय म्हणून जिल्ह्यात सौरऊर्जेच्या माध्यमातून २५ प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असून, त्याव्दारे ४० मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. ही वीज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने त्यांना दिवसा विजेची उपलब्धता होणार आहे.विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील अडचणींमुळे भारनियमनाचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर उद्योगांनाही कमी विजेमुळे त्रास सहन करावा लागतो. यासाठी शासन स्तरावरून अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांच्या वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार सौरऊर्जेचा पर्याय समोर आला आहे.राज्यात ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषीसाठी ३० टक्के विजेचा वापर होतो. शेतकऱ्यांना वीज देण्याबरोबरच माफक दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे अनुदानही दिले जाते. शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता करून देण्यासाठी गेल्या वर्षापासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. याच योजनेनुसार जिल्ह्यात २५ ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. सध्या ३६ मेगावॅट वीज निर्माण होईल इतकी जागा उपलब्ध झाली असून, अजून ४ मेगावॅटसाठीचे नियोजन होणार आहे.जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी प्राधान्य दिले असून, विविध ठिकाणी प्रकल्पाच्या उभारणीसाठी जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील २४६ हेक्टरवर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पीपीपी म्हणजेच जनतेच्या सहभागातून प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी विकासकाच्या नेमणुकीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. या प्रकल्पात गुंतवणूक करणाऱ्यांनाही शासनाकडून सोयी-सवलती मिळणार आहेत.सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत : मिळणार अखंडीत वीजसध्या शेतीसाठी वीज देताना ती रात्री दिली जाते, तर दिवसभर कमी दाबाने वीजपुरवठा असतो. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. शेतीबरोबरच पाणी योजनांसाठीही सौर ऊर्जेचा वापर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

सध्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध होत असल्याने अडचणीचा सामना करावा लागतो. दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याने यातून त्यांची सुटका होणार आहे. शेतकऱ्यांना सौर ऊर्जेची वीज दिल्यानंतर शिल्लक वीज उद्योगांना पुरविण्यात येणार असल्याने त्यांचीही विजेची मागणी काहीअंशी पूर्ण होणार आहे. 

सौर ऊर्जा निर्मितीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. पूर्वभागात तर यासाठीचे सर्वोत्कृष्ट स्थान असल्याने प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी २१० एकरहून अधिक जागा उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांची विजेची मागणी लक्षात घेऊन प्रकल्पाची उभारणी करणार असल्याने त्यांना फायदा होणार आहे.-विजयकुमार काळम-पाटील, जिल्हाधिकारी

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली