शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
7
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
8
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
9
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
10
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
11
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
12
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
13
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
14
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
15
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
16
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
17
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
18
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

सांगली जिल्ह्यातील शंभरावर गावात सौरउर्जेने फुलणार शिवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 16:49 IST

विजेच्या मागणीत वाढ होत असताना, त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने सर्वसामान्यांना दरवाढीचा, भारनियमनाचा झटका सहन करावा लागत आहे. यास समर्थ पर्याय म्हणून जिल्ह्यात सौरऊर्जेच्या माध्यमातून २५ प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असून, त्याव्दारे ४० मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. ही वीज शेतकºयांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने त्यांना दिवसा विजेची उपलब्धता होणार आहे.

ठळक मुद्दे४0 मेगॉवॅट वीजेची निर्मिती शक्यशेतकऱ्यांना दिवसाही मिळणार वीज

शरद जाधव

सांगली : विजेच्या मागणीत वाढ होत असताना, त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने सर्वसामान्यांना दरवाढीचा, भारनियमनाचा झटका सहन करावा लागत आहे. यास समर्थ पर्याय म्हणून जिल्ह्यात सौरऊर्जेच्या माध्यमातून २५ प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असून, त्याव्दारे ४० मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. ही वीज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने त्यांना दिवसा विजेची उपलब्धता होणार आहे.विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील अडचणींमुळे भारनियमनाचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर उद्योगांनाही कमी विजेमुळे त्रास सहन करावा लागतो. यासाठी शासन स्तरावरून अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांच्या वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार सौरऊर्जेचा पर्याय समोर आला आहे.राज्यात ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषीसाठी ३० टक्के विजेचा वापर होतो. शेतकऱ्यांना वीज देण्याबरोबरच माफक दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे अनुदानही दिले जाते. शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता करून देण्यासाठी गेल्या वर्षापासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. याच योजनेनुसार जिल्ह्यात २५ ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. सध्या ३६ मेगावॅट वीज निर्माण होईल इतकी जागा उपलब्ध झाली असून, अजून ४ मेगावॅटसाठीचे नियोजन होणार आहे.जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी प्राधान्य दिले असून, विविध ठिकाणी प्रकल्पाच्या उभारणीसाठी जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील २४६ हेक्टरवर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पीपीपी म्हणजेच जनतेच्या सहभागातून प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी विकासकाच्या नेमणुकीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. या प्रकल्पात गुंतवणूक करणाऱ्यांनाही शासनाकडून सोयी-सवलती मिळणार आहेत.सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत : मिळणार अखंडीत वीजसध्या शेतीसाठी वीज देताना ती रात्री दिली जाते, तर दिवसभर कमी दाबाने वीजपुरवठा असतो. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. शेतीबरोबरच पाणी योजनांसाठीही सौर ऊर्जेचा वापर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

सध्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध होत असल्याने अडचणीचा सामना करावा लागतो. दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याने यातून त्यांची सुटका होणार आहे. शेतकऱ्यांना सौर ऊर्जेची वीज दिल्यानंतर शिल्लक वीज उद्योगांना पुरविण्यात येणार असल्याने त्यांचीही विजेची मागणी काहीअंशी पूर्ण होणार आहे. 

सौर ऊर्जा निर्मितीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. पूर्वभागात तर यासाठीचे सर्वोत्कृष्ट स्थान असल्याने प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी २१० एकरहून अधिक जागा उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांची विजेची मागणी लक्षात घेऊन प्रकल्पाची उभारणी करणार असल्याने त्यांना फायदा होणार आहे.-विजयकुमार काळम-पाटील, जिल्हाधिकारी

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली