शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

सरकारी नोकऱ्यांचा नाद सोडा--चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 23:11 IST

लोकसंख्यावाढ व संगणकीकरणामुळे सरकारी नोकºया कमी झाल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारांनी सरकारी नोकºयांचा नाद सोडून स्वत:चा व्यवसाय उभारावा

ठळक मुद्देसांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्यावतीने रोजगार मेळावा

सांगली : लोकसंख्यावाढ व संगणकीकरणामुळे सरकारी नोकºया कमी झाल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारांनी सरकारी नोकºयांचा नाद सोडून स्वत:चा व्यवसाय उभारावा, असा सल्ला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगलीत दिला.

महापालिकेच्यावतीने आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नीता केळकर आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, शहरात एकूण लोकसंख्येच्या ४५ टक्के लोक राहतात. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कारखाने, व्यापार, उद्योग वाढले पाहिजेत. तसा प्रयत्न शासन करीत आहे. आज तरुणांना सरकारी नोकºया हव्या आहेत. वर्षाला केवळ २० हजार नोकºया निर्माण होऊ शकतात. पण संगणकामुळे सरकारी नोकºया कमी झाल्या आहेत. त्यामुळे ही संकल्पना डोक्यातून काढून टाका. खासगी कंपन्यांतही चांगले पगार मिळू लागले आहेत. त्यात सरकारने कायदेही कडक करीत नोकरदारांना संरक्षण दिले आहे. अटल पेन्शनसारख्या अनेक योजना आणून निवृत्तीनंतर नोकरदारांना सारे लाभ मिळवून दिले जात आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १० लाखापर्यंतचे कर्ज दिले जात आहे. अशा विविध योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी स्वत:च उद्योजक बनून दुसºयांना नोकरी देणारे बनले पाहिजे.

या रोजगार मेळाव्यात ५०० तरुणांना नोकरी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी आ. गाडगीळ, महापौर संगीता खोत, नीता केळकर, माजी आमदार दिनकर पाटील यांचीही भाषणे झाली. प्रारंभी नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांनी स्वागत, तर उपायुक्त स्मृती पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास नगरसेवक शेखर इनामदार, योगेंद्र थोरात, माजी नगरसेवक सुरेश आवटी, मकरंद देशपांडे, भारती दिगडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

टीकेकडे दुर्लक्ष करा : पाटीलमहापालिकेत काम करताना विरोधकांकडून टीका होतच असते. पण त्याकडे दुर्लक्ष करा, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला. गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर किती तरी टीका झाली. पण ते शांत राहिले. म्हणून ते असंवेदनशील नाहीत. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी संवेदनशीलता दाखविली आहे. येत्या आठ दिवसात ते काही तरी करून दाखवतील, असेही ते म्हणाले.

सांगलीतील रोजगार मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रवींद्र खेबूडकर, दिनकर पाटील, संगीता खोत, आ. सुधीर गाडगीळ उपस्थित होते.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSangliसांगलीjobनोकरी