शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकऱ्यांचा नाद सोडा--चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 23:11 IST

लोकसंख्यावाढ व संगणकीकरणामुळे सरकारी नोकºया कमी झाल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारांनी सरकारी नोकºयांचा नाद सोडून स्वत:चा व्यवसाय उभारावा

ठळक मुद्देसांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्यावतीने रोजगार मेळावा

सांगली : लोकसंख्यावाढ व संगणकीकरणामुळे सरकारी नोकºया कमी झाल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारांनी सरकारी नोकºयांचा नाद सोडून स्वत:चा व्यवसाय उभारावा, असा सल्ला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगलीत दिला.

महापालिकेच्यावतीने आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नीता केळकर आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, शहरात एकूण लोकसंख्येच्या ४५ टक्के लोक राहतात. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कारखाने, व्यापार, उद्योग वाढले पाहिजेत. तसा प्रयत्न शासन करीत आहे. आज तरुणांना सरकारी नोकºया हव्या आहेत. वर्षाला केवळ २० हजार नोकºया निर्माण होऊ शकतात. पण संगणकामुळे सरकारी नोकºया कमी झाल्या आहेत. त्यामुळे ही संकल्पना डोक्यातून काढून टाका. खासगी कंपन्यांतही चांगले पगार मिळू लागले आहेत. त्यात सरकारने कायदेही कडक करीत नोकरदारांना संरक्षण दिले आहे. अटल पेन्शनसारख्या अनेक योजना आणून निवृत्तीनंतर नोकरदारांना सारे लाभ मिळवून दिले जात आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १० लाखापर्यंतचे कर्ज दिले जात आहे. अशा विविध योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी स्वत:च उद्योजक बनून दुसºयांना नोकरी देणारे बनले पाहिजे.

या रोजगार मेळाव्यात ५०० तरुणांना नोकरी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी आ. गाडगीळ, महापौर संगीता खोत, नीता केळकर, माजी आमदार दिनकर पाटील यांचीही भाषणे झाली. प्रारंभी नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांनी स्वागत, तर उपायुक्त स्मृती पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास नगरसेवक शेखर इनामदार, योगेंद्र थोरात, माजी नगरसेवक सुरेश आवटी, मकरंद देशपांडे, भारती दिगडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

टीकेकडे दुर्लक्ष करा : पाटीलमहापालिकेत काम करताना विरोधकांकडून टीका होतच असते. पण त्याकडे दुर्लक्ष करा, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला. गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर किती तरी टीका झाली. पण ते शांत राहिले. म्हणून ते असंवेदनशील नाहीत. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी संवेदनशीलता दाखविली आहे. येत्या आठ दिवसात ते काही तरी करून दाखवतील, असेही ते म्हणाले.

सांगलीतील रोजगार मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रवींद्र खेबूडकर, दिनकर पाटील, संगीता खोत, आ. सुधीर गाडगीळ उपस्थित होते.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSangliसांगलीjobनोकरी