शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पपईच्या भरपाईसाठी आत्मदहनाचा इशारा, पोलीस बंदोबस्त तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 15:50 IST

शेतकऱ्यांना पपईची खराब रोपे देऊन फसवणूक करणाऱ्या कंपनीविरोधात कारवाई व्हावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देसांगलीत पपईच्या भरपाईसाठी आत्मदहनाचा इशारापपईची खराब रोपे देऊन फसवणूक

सांगली : शेतकऱ्यांना पपईची खराब रोपे देऊन फसवणूक करणाऱ्या कंपनीविरोधात कारवाई व्हावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

यासाठी शुक्रवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन आत्महत्येचा इशारा दिला होता. त्यामुळे कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.दरम्यान, प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. पुणे येथील एका कंपनीने पलूस, खानापूर व कडेगाव तालुक्यातील २२ शेतकऱ्यांना खराब पपईची रोपे दिल्याचा व त्यामुळे शेतकऱ्यांचे ३ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी इंटरनॅशनल ह्युमन राईटस् जस्टीस असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा व त्यापासून अडविल्यास कार्यालयाशेजारी असणाऱ्या पाण्याच्या टाकीवरून उड्या घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.

त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच अग्निशमन दलाचे वाहन व जवानही हजर होते. पाण्याच्या टाकीजवळही बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दरम्यान, जाधव व उपस्थित शेतकऱ्यांशी प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी संवाद साधला. मात्र, येत्या दहा दिवसात न्याय न मिळाल्यास १५ मे रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला.तीन कोटीचा फटकाशेतकऱ्यांनी सांगितले की, पुण्यातील कंपनीने २२ शेतकऱ्यांना ४८ हजार पपईची रोपे दिली होती. ही रोपे खराब असल्याने त्याला फळच आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे ३ कोटींचे नुकसान झाले आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही लक्ष दिले जात नसल्यानेच आंदोलन करण्याची वेळ आली आहे.पोलीस, प्रशासनाची सतर्कताआंदोलनाची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांचे पथक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. पाठोपाठ अग्नीशमन दलाची यंत्रणाही पोहोचली. प्रशासनानेही आंदोलकांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आंदोलकांनी सामंजस्याची भूमिका घेत आंदोलन थांबविले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी