शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

सांगलीत पपईच्या भरपाईसाठी आत्मदहनाचा इशारा, पोलीस बंदोबस्त तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 15:50 IST

शेतकऱ्यांना पपईची खराब रोपे देऊन फसवणूक करणाऱ्या कंपनीविरोधात कारवाई व्हावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देसांगलीत पपईच्या भरपाईसाठी आत्मदहनाचा इशारापपईची खराब रोपे देऊन फसवणूक

सांगली : शेतकऱ्यांना पपईची खराब रोपे देऊन फसवणूक करणाऱ्या कंपनीविरोधात कारवाई व्हावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

यासाठी शुक्रवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन आत्महत्येचा इशारा दिला होता. त्यामुळे कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.दरम्यान, प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. पुणे येथील एका कंपनीने पलूस, खानापूर व कडेगाव तालुक्यातील २२ शेतकऱ्यांना खराब पपईची रोपे दिल्याचा व त्यामुळे शेतकऱ्यांचे ३ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी इंटरनॅशनल ह्युमन राईटस् जस्टीस असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा व त्यापासून अडविल्यास कार्यालयाशेजारी असणाऱ्या पाण्याच्या टाकीवरून उड्या घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.

त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच अग्निशमन दलाचे वाहन व जवानही हजर होते. पाण्याच्या टाकीजवळही बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दरम्यान, जाधव व उपस्थित शेतकऱ्यांशी प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी संवाद साधला. मात्र, येत्या दहा दिवसात न्याय न मिळाल्यास १५ मे रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला.तीन कोटीचा फटकाशेतकऱ्यांनी सांगितले की, पुण्यातील कंपनीने २२ शेतकऱ्यांना ४८ हजार पपईची रोपे दिली होती. ही रोपे खराब असल्याने त्याला फळच आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे ३ कोटींचे नुकसान झाले आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही लक्ष दिले जात नसल्यानेच आंदोलन करण्याची वेळ आली आहे.पोलीस, प्रशासनाची सतर्कताआंदोलनाची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांचे पथक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. पाठोपाठ अग्नीशमन दलाची यंत्रणाही पोहोचली. प्रशासनानेही आंदोलकांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आंदोलकांनी सामंजस्याची भूमिका घेत आंदोलन थांबविले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी