शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पपईच्या भरपाईसाठी आत्मदहनाचा इशारा, पोलीस बंदोबस्त तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 15:50 IST

शेतकऱ्यांना पपईची खराब रोपे देऊन फसवणूक करणाऱ्या कंपनीविरोधात कारवाई व्हावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देसांगलीत पपईच्या भरपाईसाठी आत्मदहनाचा इशारापपईची खराब रोपे देऊन फसवणूक

सांगली : शेतकऱ्यांना पपईची खराब रोपे देऊन फसवणूक करणाऱ्या कंपनीविरोधात कारवाई व्हावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

यासाठी शुक्रवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन आत्महत्येचा इशारा दिला होता. त्यामुळे कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.दरम्यान, प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. पुणे येथील एका कंपनीने पलूस, खानापूर व कडेगाव तालुक्यातील २२ शेतकऱ्यांना खराब पपईची रोपे दिल्याचा व त्यामुळे शेतकऱ्यांचे ३ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी इंटरनॅशनल ह्युमन राईटस् जस्टीस असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा व त्यापासून अडविल्यास कार्यालयाशेजारी असणाऱ्या पाण्याच्या टाकीवरून उड्या घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.

त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच अग्निशमन दलाचे वाहन व जवानही हजर होते. पाण्याच्या टाकीजवळही बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दरम्यान, जाधव व उपस्थित शेतकऱ्यांशी प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी संवाद साधला. मात्र, येत्या दहा दिवसात न्याय न मिळाल्यास १५ मे रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला.तीन कोटीचा फटकाशेतकऱ्यांनी सांगितले की, पुण्यातील कंपनीने २२ शेतकऱ्यांना ४८ हजार पपईची रोपे दिली होती. ही रोपे खराब असल्याने त्याला फळच आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे ३ कोटींचे नुकसान झाले आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही लक्ष दिले जात नसल्यानेच आंदोलन करण्याची वेळ आली आहे.पोलीस, प्रशासनाची सतर्कताआंदोलनाची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांचे पथक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. पाठोपाठ अग्नीशमन दलाची यंत्रणाही पोहोचली. प्रशासनानेही आंदोलकांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आंदोलकांनी सामंजस्याची भूमिका घेत आंदोलन थांबविले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी