शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

घोटाळेबहाद्दरांच्या तावडीतून सांगली जिल्हा बँक वाचवा, शेतकरी संघटनांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी 

By अशोक डोंबाळे | Updated: May 27, 2024 17:24 IST

शासकीय अधिकाऱ्यांचेही दुष्काळ निधीच्या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष का?

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेच एकमेव आधार आहे. या बँकेला घोटाळेबहाद्दर कर्मचारी, अधिकाऱ्यापासून वाचवा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच शासकीय निधीचा अपहार झाल्यानंतरही जिल्हा प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष का ? असा सवालही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.दुष्काळ, अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईसाठी शासनाकडून निधी मिळतो; पण शेतकऱ्यापर्यंत भरपाई जाण्यापूर्वीच त्यावर बँकेतील अधिकारी, कर्मचारीच डल्ला मारत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जिल्हा बँकेतील हा घोटाळा उघडकीस आला, म्हणून दिसत आहे; पण जिल्हा बँकेबरोबरच अन्य राष्ट्रीयीकृत बँकांमधील शासकीय निधीची शासनाकडूनच चौकशी केली तर कोट्यवधी रुपयांचे घोटाळे उजेडात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने या घोटाळ्यात लक्ष घालण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

एटीएमचाही गैरवापरजिल्हा बँकेच्या नियमानुसार एका एटीएमवरुन दिवसाला ३० हजार रुपये काढणे अपेक्षित आहे. तासगावमध्ये एका कर्मचाऱ्यानेच एटीएमवरुन ३० हजार रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम काढली आहे. या बँकेच्या नियमाचा भंग झाल्यानंतर तातडीने शाखाधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही तरी निर्णय घेणे अपेक्षित होते. मुख्य कार्यालयाकडे तक्रार करणे अपेक्षित होते; पण याकडे शाखाधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे दोन कोटी ४३ लाख रुपयांचा अपहार झाला आहे.

निमणी शाखेतून नांद्रेच्या शाखेत पैसे वर्गजिल्हा बँकेच्या निमणी (ता. तासगाव) येथील शाखेतील लिपिक प्रमोद कुंभार यांनी नांद्रे (ता. मिरज) शाखेत वर्ग करुन रोखीने पैसे काढल्याचे चौकशीत दिसून आले आहे. याप्रमाणे कुंभार यांनी आठ लाख ३२ हजार रुपयांचा अपहार केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वर्ग होऊनही शाखाधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा घोटाळा कसा आला नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.कर्मचाऱ्यांकडून संगनमताने अपहारशेतकऱ्यांना शासनाकडून शेतीच्या नुकसानभरपाई मिळते. या भरपाईच्या कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संगनमताने परस्पर हडप केला आहे. यासंदर्भात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी अपहारातील कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले पाहिजे. सदरची रक्कम अपहार केलेल्या दिवसापासून व्याजासहित वसूल करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केली.

राज्य शासनाने बँकेची चौकशी करावी : सुनील फराटेराज्य शासनाने जिल्हा बँकेच्या सर्व शाखांची सखोल चौकशी केली तर शासकीय अनुदानाचा मोठा घोटाळा उजेडात येणार आहे. म्हणून शासनाकडे जिल्हा बँकेच्या चौकशीसाठी मागणी केली आहे. शासनाने चौकशी सुरु केली नाही तर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलनाचा लढा उभारण्यात येईल, असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकFarmerशेतकरी