शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

घोटाळेबहाद्दरांच्या तावडीतून सांगली जिल्हा बँक वाचवा, शेतकरी संघटनांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी 

By अशोक डोंबाळे | Updated: May 27, 2024 17:24 IST

शासकीय अधिकाऱ्यांचेही दुष्काळ निधीच्या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष का?

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेच एकमेव आधार आहे. या बँकेला घोटाळेबहाद्दर कर्मचारी, अधिकाऱ्यापासून वाचवा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच शासकीय निधीचा अपहार झाल्यानंतरही जिल्हा प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष का ? असा सवालही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.दुष्काळ, अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईसाठी शासनाकडून निधी मिळतो; पण शेतकऱ्यापर्यंत भरपाई जाण्यापूर्वीच त्यावर बँकेतील अधिकारी, कर्मचारीच डल्ला मारत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जिल्हा बँकेतील हा घोटाळा उघडकीस आला, म्हणून दिसत आहे; पण जिल्हा बँकेबरोबरच अन्य राष्ट्रीयीकृत बँकांमधील शासकीय निधीची शासनाकडूनच चौकशी केली तर कोट्यवधी रुपयांचे घोटाळे उजेडात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने या घोटाळ्यात लक्ष घालण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

एटीएमचाही गैरवापरजिल्हा बँकेच्या नियमानुसार एका एटीएमवरुन दिवसाला ३० हजार रुपये काढणे अपेक्षित आहे. तासगावमध्ये एका कर्मचाऱ्यानेच एटीएमवरुन ३० हजार रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम काढली आहे. या बँकेच्या नियमाचा भंग झाल्यानंतर तातडीने शाखाधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही तरी निर्णय घेणे अपेक्षित होते. मुख्य कार्यालयाकडे तक्रार करणे अपेक्षित होते; पण याकडे शाखाधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे दोन कोटी ४३ लाख रुपयांचा अपहार झाला आहे.

निमणी शाखेतून नांद्रेच्या शाखेत पैसे वर्गजिल्हा बँकेच्या निमणी (ता. तासगाव) येथील शाखेतील लिपिक प्रमोद कुंभार यांनी नांद्रे (ता. मिरज) शाखेत वर्ग करुन रोखीने पैसे काढल्याचे चौकशीत दिसून आले आहे. याप्रमाणे कुंभार यांनी आठ लाख ३२ हजार रुपयांचा अपहार केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वर्ग होऊनही शाखाधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा घोटाळा कसा आला नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.कर्मचाऱ्यांकडून संगनमताने अपहारशेतकऱ्यांना शासनाकडून शेतीच्या नुकसानभरपाई मिळते. या भरपाईच्या कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संगनमताने परस्पर हडप केला आहे. यासंदर्भात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी अपहारातील कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले पाहिजे. सदरची रक्कम अपहार केलेल्या दिवसापासून व्याजासहित वसूल करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केली.

राज्य शासनाने बँकेची चौकशी करावी : सुनील फराटेराज्य शासनाने जिल्हा बँकेच्या सर्व शाखांची सखोल चौकशी केली तर शासकीय अनुदानाचा मोठा घोटाळा उजेडात येणार आहे. म्हणून शासनाकडे जिल्हा बँकेच्या चौकशीसाठी मागणी केली आहे. शासनाने चौकशी सुरु केली नाही तर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलनाचा लढा उभारण्यात येईल, असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकFarmerशेतकरी