शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

सातारकरांनी ओलांडली भीमा नदी मुख्यमंत्री देणार खेड गावाला भेट : गावकुसाबाहेरच्या २४ कुटुंबांना मिळालं हक्काचं घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:02 IST

स्वप्निल शिंदे।सातारा : वेण्णा नदीवर गावकुसाबाहेर राहणाºया कातकरी समाजाच्या तब्बल २४ कुटुंबीयांना सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीने आपले हक्काचे घर बांधून दिले. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील भीमा नदी ओलांडून घोडेगावच्या आदिवासी केंद्रातून पदाधिकाºयांनी दुर्मीळ दाखलेही आणले.एकाच गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात शबरी आदिवासी घरकूल योजना प्रभावी राबवल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली ...

स्वप्निल शिंदे।सातारा : वेण्णा नदीवर गावकुसाबाहेर राहणाºया कातकरी समाजाच्या तब्बल २४ कुटुंबीयांना सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीने आपले हक्काचे घर बांधून दिले. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील भीमा नदी ओलांडून घोडेगावच्या आदिवासी केंद्रातून पदाधिकाºयांनी दुर्मीळ दाखलेही आणले.

एकाच गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात शबरी आदिवासी घरकूल योजना प्रभावी राबवल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, लवकरच ते या गावाला भेट देऊन पाहणी करणार आहेत. सातारा शहरालगतच असलेले खेड हे गाव वेण्णा नदीच्या काठी वसले आहे. शहरालगत गाव असल्याने औद्योगिकीकरण आणि दिवसेंदिवस इमारतीची संख्या वाढत आहे.

शहरीकरणामुळे गावचा विकास होत असताना गावात असणारा कातकरी समाज आजही या विकासापासून कोसोदूर होता. वेण्णा नदीत मासेमारी करून आजही आपला उदरनिर्वाह करत आहे. गावाच्या एका बाजूला असलेला कातकरी समाज आपल्या पालात राहत होता. हे पाल म्हणजे एक झोपडीच.

गावातील तब्बल ५६० जणांना ऊन, वारा आणि पाऊस या तिन्ही ऋतुंमध्ये याच ठिकाणी राहावे लागत होते. त्यामुळे त्यांना हक्काचे पक्के घर मिळावे, यासाठी खेड ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच मिलिंद कदम यांनी पुढाकार घेतला. योजनेचा लाभ घ्यायचा तर कागदपत्रे, घर बांधण्यासाठी जागा आदी प्रश्न होतेच. या कातकरी समाज अशिक्षित असल्याने त्यांच्याकडे कोणत्याही स्वरुपाची कागदपत्रे नव्हती, त्यामुळे त्यांना त्यापासून वंचित राहावे लागणार होते. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

मग ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वखर्चातून त्यांचे जातीचे दाखले व इतर कागदपत्रे मिळवले. तसेच जिल्हाधिकाºयांच्या मालकीची जागा उपलब्ध करून शबरी योजनेचे आवश्यक ते प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवले. त्यापैकी शासनाने २४ प्रस्ताव मंजूर केले. ग्रामपंचायतीच्या मदतीने १ लाख ३२ हजार रुपयांचा निधी खर्चून शौचालयसह मोफत पक्के घर बांधून देण्यात आले. आज कातकरी वस्तीमध्ये २४ जणांची सुसज्ज अशी पक्की घरे दिमाखात उभी आहेत.

मुख्यमंत्र्यांची घेणार भेटग्रामपंचायतीने फक्त घरं दिली नाहीत तर घरासोबत सिमेंटचे रस्ते, नळ पुरवठा योजनेतून पाणी तसेच वीजही उपलब्ध करून दिली आहे. वस्तीच्या बाजूने संरक्षित भिंत, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृह आणि मुलांसाठी जिल्हा परिषदेची शाळा अशा सोयीसुविधा उभारून खºया अर्थाने त्यांच्या २४ जणांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे. त्यामुळे या वस्तीतील लोकही होय, मी लाभार्थी असे म्हणून लागले आहेत.खेड ग्रामपंचायतीने योजना राबवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, १८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत. 

गावातील बहुसंख्य लोकांना हक्काचे घर मिळवून दिले आहे. त्यापैकी १३ जण अजून वंचित आहेत. त्यांचे आदिवासी दाखले नसल्याने अडचण आहे; पण लवकरच त्यांनाही हक्काचे घर मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.-मिलिंद कदम, सभापती, सातारा पंचायत समितीकातकरी समाजाकडे घरासाठी जागा, उत्पन्नाचे दाखले, आदिवासी दाखले, वारस नोंद नव्हती. यासाठी ग्रामपंचायतीने सकारात्मक भूमिका घेत कागदपत्रे स्वत: गोळा केली. त्यानंतर चोवीस कुटुंबांची योजना पर्ू्ण केली. लवकरच उर्वरित तेरा जणांना पक्के घर बांधूून देऊन शंभर टक्के योजना राबविण्याचा प्रयत्न आहे.- ज्ञानेश्वर गायकवाड, ग्रामसेवकआम्ही अनेक वर्षांपासून झोपडीत राहत होतो. आम्हाला वाटलेही नव्हते कधी आम्ही हक्काच्या घरात जाऊ; पण शबरी योजनेतून आम्हाला घराचे घर मिळाले.- नंदू अंतू पवार,लाभार्थी