शहरं
Join us  
Trending Stories
1
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
2
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
3
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
4
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
5
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
6
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
7
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
8
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
9
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
10
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
11
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
12
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
13
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
14
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
15
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
16
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
17
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
18
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
19
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
20
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका

सांगली जिल्ह्यातील ऊसतोडी बंद पाडल्या : स्वाभिमानीसह शेतकरी सेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:47 IST

ऊस दराच्या प्रश्नावर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील ऊसतोडी बंद पाडल्या, तर विटा परिसरात शेतकरी सेनेने ऊसतोडी ठप्प केल्या

ठळक मुद्देखानापूर, तासगाव, पलूस, वाळवा, शिराळा, मिरज तालुक्यामध्ये आंदोलनसागावमध्ये आंदोलन

सांगली : ऊस दराच्या प्रश्नावर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील ऊसतोडी बंद पाडल्या, तर विटा परिसरात शेतकरी सेनेने ऊसतोडी ठप्प केल्या. ऊस दराचा फैसला होईपर्यंत ऊस तोडीला घेऊ नये, असे आवाहनही संघटनांनी केले आहे. या आंदोलनास शेतकऱ्यांचा पाठींबा आहे.

कर्नाटकातील केंपवाड कारखान्याने मागील हंगामातील ४०० रुपयांचे बिल व यंदाचा ऊस दर जाहीर न करताच तोडणी सुरू केली होती. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही ऊसतोड मजुरांना फुले देऊन गांधीगिरी पध्दतीने बंद पाडली.यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य महादेव कोरे, शिवाजी पाटील, प्रदीप जाधव, शहर अध्यक्ष कमलेश्वर कांबळे, बाबू हारगे, किशोर महाजन, राजू झेंडे, अशोक पाटील, प्रकाश हक्के उपस्थित होते.उसासाठी पहिली उचल मान्य होईपर्यंत शेतकºयांनी तोडी घेऊ नयेत : सयाजी मोरेइस्लामपूर : सतराव्या ऊस परिषदेत स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी उसाच्या पहिल्या उचलीची केलेली मागणी जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत राज्यातील सहकारी व खासगी कारखाने सुरू करू नयेत, तसेच शेतकºयांनीही तोडी घेऊ नयेत, असे आवाहन स्वाभिमानीचे प्रदेश उपाध्यक्ष सयाजी मोरे यांनी पत्रकार बैठकीत केले.

ते म्हणाले, केंद्र व राज्य सरकारकडून शेतकºयांची पिळवणूक सुरू आहे. या चुकीच्या धोरणाविरुध्द खासदार शेट्टी सातत्याने आवाज उठवत आहेत. ऊस परिषदेत त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. ऊसतोडीही बंद केल्या आहेत. मात्र सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर जाहीर न करताच गळीत हंगाम सुरू करुन सहकाराला काळिमा फासला आहे. यावरुन कारखानदारांची बांधिलकी शेतकºयांशी आहे का? याची शंका वाटते.

मोरे म्हणाले, एफआरपीचा बेस बदलून शेतकºयाला मातीत घालण्याचा प्रयत्न होत आहे. जिल्ह्यातील कारखानदारीचे नेतृत्व करणाºया नेत्यांनी रस्त्यावर उतरुन शेतकºयांच्या बाजूने त्याचा जाब विचारायला हवा होता. मात्र याकडे दुर्लक्ष करुन कारखाने सुरु केले आहेत, याची खंत वाटते. स्वाभिमानी कुठल्याही कारखानदारांचा मित्र नाही आणि जाणीवपूर्वक कोणाचा वैरीही नाही. आमची बांधिलकी ही फक्त शेतकºयांशी आहे.

ते म्हणाले, ऊसतोड मजूर व टोळ्या आल्याने कारखाने सुरू ठेवणे भाग आहे, हे पी. आर. पाटील यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. एका कारखान्याचे ४ कारखाने केले, असे म्हणणाºया नेत्यांनी कधी तरी ऊस दरावर बोलावे. मागीलवेळी एफआरपी अधिक २०० असा तोडगा निघाला. मात्र त्यातील २०० रुपये अद्याप दिलेले नाहीत. मग हंगाम सुरू करण्याची घाई कशासाठी करत आहे, असा कारखानदारांना सवालही मोरे यांनी केला आहे.सागावमध्ये आंदोलनसागाव : चालूवर्षीच्या ऊस दरासंदर्भातील उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा निर्णय होत नाही, तोपर्यंत कारखानदारांनी कारखाने चालू करू नयेत, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राम पाटील यांनी केले. सागाव, नाटोली, लादेवाडी (ता. शिराळा) येथे सुरू असलेल्या ऊसतोडी गुरुवारी कार्यकर्त्यांनी बंद पाडल्या.

पाटील म्हणाले, प्रतिवर्षी ऊसदरासाठी ऊसदर आंदोलन, संघर्ष असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समीकरणच ठरले आहे. पाच-सहा दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथे ऊस परिषद घेऊन खा. राजू शेट्टी यांनी ऊसदर आंदोलनात आपल्या घामाच्या दामासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी शेतकºयांनीही आंदोलनात सहभागी होण्याची मानसिक स्थिती दर्शविली आहे. मागील हंगामातील एफआरपीची ठरलेली रक्कमही अजून बहुतांशी कारखान्यांनी शेतकºयांना दिलेली नाही.

चालूवर्षीच्या हंगामातील ऊसदराचा निर्णय व्हायच्या आधीच काही कारखानदारांनी कारखाने चालू केले आहेत. परंतु कारखानदारांनी असे करणे बरोबर नाही. शिराळा तालुक्यातील सागाव, नाटोली, कांदे फाटा, देववाडी या गावांमध्ये चालू असणाºया ऊसतोडी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद केल्या आहेत. ट्रॅक्टरचा हार काढून चालकाचा सत्कार करून गांधीगिरी आंदोलनही केले.

यावेळी मानसिंग पाटील, अशोक दिवे, शंकर घोलप, जयसिंग पाटील, गुरुनाथ पाटील, सुरेश म्हाऊटकर, भैय्या वडगावकर, प्रकाश पाटील, अरविंद पाटील, अजित पाटील, दादा पाटील, देवेंद्र धस, चंद्रकांत पाटील, अरुण पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपSangliसांगली