शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

संजयकाका, एकदाचं सांगून टाकाच..! कारण -राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 01:01 IST

... अखेर म्हैसाळ आणि ताकारी योजनेचं पाणी पाटात पडलं. पाणी सोडण्याचा प्रश्न प्रतिष्ठेचा केलेल्यांचं, त्यावर

श्रीनिवास नागे... अखेर म्हैसाळ आणि ताकारी योजनेचं पाणी पाटात पडलं. पाणी सोडण्याचा प्रश्न प्रतिष्ठेचा केलेल्यांचं, त्यावर राजकारण तापवणाऱ्यांचं, पोळी भाजून घेणाºयांचं आणि तिकडं सोयीस्कर दुर्लक्ष केलेल्यांचंही फावलं. आमच्यामुळंच ही योजना सुरू झाली, हे सांगणाºयांची कमी नाही, पण ज्या पक्षाचे खासदार यासाठी मेहनत घेत होते, त्याच पक्षाचे म्हणजे सत्ताधारी भाजपचे काही नेते म्हणे योजनाच बंद रहावी, यासाठी प्रयत्न करत होते! या नेत्यांचा दांभिक चेहराही त्यानिमित्तानं पुढं आला. अर्थात तो सर्वांसमोर उघडा करण्याचं खासदारांनी टाळलंय...

मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, जत, पलूस-कडेगाव, खानापूर तालुक्यांतली पिकं मान टाकायला लागली होती, बागा हातातून चालल्या होत्या, विहिरी-तळ्यांच्या पाण्यानं तळ गाठला होता. ताकारी-म्हैसाळ सिंचन योजना सुरू होणं गरजेचं होतं. जानेवारीपासून पाण्यासाठी टाहो सुरू होता. ‘म्हैसाळ’च्या कार्यक्षेत्रातील स्थिती बिकट होती. त्या पाण्यासाठी तर दातांच्या कण्या कराव्या लागल्या. मिनतवाºया झाल्या, निवेदनं दिली, मंत्र्यां-संत्र्यांच्या भेटी झाल्या, आंदोलनं झाली, मोर्चे निघाले... पण पाणी काही सुटत नव्हतं. वीजबिलाचा प्रश्न आ वासून उभा होता. थकीत वीजबील कुणी भरायचं, असा सवाल होता. ते सरकारनं टंचाई निधीतून भरावं (कारण काँग्रेस आघाडी सरकारच्या काळापासून तेच चालत आलेलं) असं मत पुढं येत होतं. शेतकºयांना आशा होती. विरोधकच नव्हे तर सत्ताधारी भाजपची मंडळीही (खासगीत हं) तसंच सांगत होती. पण सरकार बधत नव्हतं.

सांगली जिल्ह्याच्या निम्म्या भागाचं राजकारण पाण्याभोवती फिरतं. हे ज्यांना पक्कं ठावूक आहे, ते विद्यमान खासदार संजयकाका पाटील मात्र लगेच पुढं सरसावले. त्यांच्यासोबत राष्टÑवादीच्या आमदार सुमनताई पाटील, जिल्हा परिषद-पंचायत समितीचे आजी-माजी सदस्यही होते. काकांनी ‘म्हैसाळ’च्या पाण्याचा प्रश्न प्रतिष्ठेचाच बनवला. पुढं लोकसभा निवडणुका आहेत, त्यात भाजपमधल्या स्वत:च्या हितचिंतकांची संख्या वाढतेय, त्यामुळं काका सजग झाले. या दरम्यान मिरज, कवठेमहांकाळ इथल्या काँग्रेस-राष्टÑवादीसह इतर पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीही आक्रमक रेटा लावला.टंचाईची भीषणता अधिक जाणवणाºया मिरज परिसरातल्या नेत्यांचा जोर जरा जादाच होता. त्याचं कारणही तसंच होतं. मिरजेचे स्वयंभू आमदार सुरेश खाडे पाणी सोडण्याच्या प्रयत्नांमध्ये कुठंच दिसत नव्हते. परिणामी ते काँग्रेस-राष्टÑवादीच्या ‘टार्गेट’वर आले नसते तरच नवल! ‘मनी-मसल पॉवर’वर आधी जत आणि नंतर मिरज विधानसभा मतदारसंघाचं मैदान मारणाºया आणि मूळचे उद्योजक असलेल्या खाडेंच्या नसानसात देण्या-घेण्याची व्यावसायिकता भिनलीय. त्यातच आमदारकीच्या तीन टर्म पूर्ण केल्यात. त्यामुळं बेफिकीरीकडं झुकणारा बेमुर्वतपणा कधीच आलाय. पक्षातल्या स्थानिक नेत्यांशी त्यांचं कधी पटतच नाही. (मकरंद देशपांडेंना विचारा!) खासदार संजयकाकांशी तर आधीपासूनच बेबनाव. त्यामुळं पाणी सोडण्याच्या प्रयत्नात संजयकाकांची मेहनत जादा, तर खाडेंची शून्य असल्याचं खुद्द काँग्रेस-राष्टÑवादीची मंडळी सांगत होती.

यादरम्यान संजयकाका नेहमीच चर्चेत राहिले. मंत्र्यांशी भेटी, प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा यात ते पुढं होते. पाणी तापत होतं...मुख्यमंत्र्यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर दि. १० किंवा ११ मार्चला ‘म्हैसाळ’चं पाणी सुटेल, तसे आदेश दिल्याचं संजयकाकांनी ७ मार्चला जाहीर केलं. मात्र १२ मार्चपर्यंत आदेशच नव्हते. त्याच दिवशी रात्री जिल्ह्यातल्या सिंचन योजनांसाठी मुख्यमंत्र्यांनी ५० कोटीचा निधी देऊन त्या कागदपत्रांवर सही केल्याचं संजयकाकांनी थेट मुंबईतून सांगितलं. दोन दिवसात धनादेश वटून पाणी सुटणार, या अपेक्षेत असणाºयांचा भ्रमनिरास झाला. तांत्रिक अडचणींमुळं निधी हस्तांतरित झाला नाही. त्यात तब्बल आठ दिवस गेले. मग संजयकाकांनी कृष्णा खोरे महामंडळाच्या स्वनिधीतील ५० कोटी देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर जलसंपदा मंत्र्यांनी २५ कोटी देण्याची तयारी दाखवली. पण पुन्हा आडकाठी घालण्यात आली. अखेर संजयकाकांनी राजीनामा देण्याची धमकी दिली आणि निधी मिळाला, पण तोही १५ कोटीचा!संजयकाकांनी राजीनाम्याची धमकी दिल्याच्या बातम्या येत असतानाच सुरेश खाडेंनीही राजीनामा देण्याचा इशारा दिल्याच्या बातम्या पसरवल्या गेल्या. अर्थात दोन्ही बातम्या स्वतंत्रपणे प्रसारमाध्यमांपर्यंत आल्या. शनिवारी ‘म्हैसाळ’च्या पंपहाऊसमध्ये कळ दाबतानाही संजयकाका आणि खाडेंतील बेबनाव दिसला. तिथं खाडेंचे समर्थक असलेले भाजपचे तालुकाध्यक्ष दिनकर भोसले आणि संजयकाकांचे समर्थक अनिल आमटवणे (हे काँग्रेसचे नेते आहेत, बरं का!) यांनी एकमेकांची गळपट्टी धरली!

संजयकाकांनी पंपहाऊसची कळ दाबली, पण त्याचवेळी भाजपची कळ काढली! एक नेता हीन दर्जाचं राजकारण करत होता, ही योजना बंदच रहावी यासाठी तो प्रयत्न करत होता, असं त्यांनी जाहीर केलं. अर्थात त्याचं नाव मात्र त्यांनी घेतलं नाही.जाता-जाता : म्हैसाळ योजनेच्या पाण्याचं महाभारत घडत असताना संजयकाका आणि खाडेंतील बेबनाव अधोरेखित होत होता. त्यातच माजी मंत्री, कवठेमहांकाळचे पाणीदार नेते अजितराव घोरपडेही पुढं आले. यात राजकारण करू नका, असं सुनावत त्यांनी योजना नीटपणानं चालवण्याचे धडेही दिले. त्यांचं आणि संजयकाकांचं विळ्या-भोपळ्याचं सख्य असल्यानं, काकांना त्यांचे विचार कितपत रूचले, हा प्रश्न आलाच. त्यामुळं आता प्रश्न पडतो की, संजयकाका म्हणतात तो हीन दर्जाचं राजकारण करणारा नेता कोण..?

ताजा कलम : संजयकाका आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख यांचं चांगलंच फाटलंय. अलीकडं काकांना मुख्यमंत्र्यांचा, तर बाबांना चंद्रकांतदादा पाटलांचा वरदहस्त लाभलाय. त्यातूनच म्हणे चंद्रकांतदादांनी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची सूत्रं संजयकाकांकडं न देता त्यांना बाजूला केलंय. त्यात चंद्रकांतदादा तर महसूलमंत्री. सिंचन योजनांचं पाणी सुटावं, यासाठी निधी देण्यासाठी त्यांच्याच विभागाची कळीची भूमिका ठरली...मग आता सांगा, की तो नेता कोण? स जयकाकांनी सांगून टाकावंच...!