शहरं
Join us  
Trending Stories
1
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
2
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
3
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
4
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
5
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
7
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
8
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
9
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
10
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
11
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
12
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
13
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
14
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
15
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
16
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
17
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
18
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
19
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
20
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
Daily Top 2Weekly Top 5

संजयकाका, जनतेला मामा बनवू नका! : विशाल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 19:04 IST

सांगली : नुकताच तीन राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला विजय म्हणजे भाजपची विश्वासार्हता धोक्यात आल्याचे चिन्ह असून, मोदींचा करिष्माही कमी ...

ठळक मुद्देलोकसभेला भाजपचा पराभव हेच ध्येय

सांगली : नुकताच तीन राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला विजय म्हणजे भाजपची विश्वासार्हता धोक्यात आल्याचे चिन्ह असून, मोदींचा करिष्माही कमी झाला आहे. जनतेचा भाजपबद्दल भ्रमनिरास झाला असून त्यांच्या हुकूमशाहीला जनता कंटाळली आहे. आता परिवर्तनाचे पर्व सुरू झाले असून, लोकसभेला सांगलीत भाजपचा पराभव करणे आपले प्रमुख ध्येय असल्याचा पुनरुच्चार काँग्रेसचे युवानेते विशाल पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

 

विकास कामांबद्दल खासदार संजयकाका पाटील जनतेला मामा बनवत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, लोकसभेच्या उमेदवारीचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठीच घेतील, पण  आमच्यादृष्टीने उमेदवारीपेक्षा भाजपचा पराभव महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.पाटील म्हणाले की, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या परिवर्तनामुळे भाजपची लाट ओसरल्याचे स्पष्ट झाले. या निकालातून भाजपची उलटी मोजणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला दाम आणि तरुणांच्या हाताला काम हेच लोकांना हवे आहे.

लोकसभा निवडणुकीत जनता भाजपला धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. मोदींचा करिष्मा कमी झाला असल्याने केंद्रात काँग्रेस सत्तेवर येईल. सांगलीची उमेदवारी पक्ष ठरवेल, मात्र भाजपचा दारुण पराभव करणे,हेच आपले ध्येय आहे.खासदार संजयकाका पाटील जनतेला मामा बनवू लागले आहेत. काका म्हणतात की, सध्या जिल्'ात अकरा हजार कोटीची कामे सुरू आहेत. तसेच गेल्या पन्नास वर्षात जेवढा निधी आला नाही, तेवढा निधी भाजप सरकारने साडेचार वर्षात दिला आहे. मात्र त्यांचा हा दावा हास्यास्पद आहे.संजयकाकांनी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा ते कोणत्या पक्षात होते, याचा विसर त्यांना पडला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी असा त्यांनी प्रवास केला.

राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. विधानसभेची निवडणूक अपक्ष आणि काँग्रेसच्या चिन्हावर लढवली होती. कॉँग्रेसकडून महामंडळ अध्यक्षपद भोगले. तेव्हा विकास कामांसाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध झाला होता. गेल्या ५० वर्षांत जर निधी आला नसेल तर, ते काय करत होते? वास्तविक ते खासदार होण्यापूर्वी टेंभूचे पाणी आटपाडीमध्ये, तर म्हैसाळचे पाणी जतला पोहोचले होते. ताकारी, म्हैसाळ योजनांचे काम बहुतांशी पूर्ण झाले होते. जिल्'ातील महामार्गांची कामे जुनीच प्रस्तावित होती. निवडणुकीपूर्वी खासदारांनी जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करावीत. उद्योग, व्यवसाय आणून तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले, त्याचे काय झाले, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.जनसंपर्क अभियान राबविणारजिल्हा कॉँग्रेसच्यावतीने संपूर्ण जिल्'ात जनसंपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांचा पाढा जनतेसमोर मांडला जाईल. वाढती महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी, रखडलेली शेतकरी कर्जमाफी योजना, शेतकºयांचे घटलेले उत्पन्न याबाबत प्रबोधन केले जाईल. महापालिकेत भाजपची सत्ता आली आहे, मात्र प्रत्यक्षात कामांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. त्याविरोधात आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली