शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

संजयकाका, जनतेला मामा बनवू नका! : विशाल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 19:04 IST

सांगली : नुकताच तीन राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला विजय म्हणजे भाजपची विश्वासार्हता धोक्यात आल्याचे चिन्ह असून, मोदींचा करिष्माही कमी ...

ठळक मुद्देलोकसभेला भाजपचा पराभव हेच ध्येय

सांगली : नुकताच तीन राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला विजय म्हणजे भाजपची विश्वासार्हता धोक्यात आल्याचे चिन्ह असून, मोदींचा करिष्माही कमी झाला आहे. जनतेचा भाजपबद्दल भ्रमनिरास झाला असून त्यांच्या हुकूमशाहीला जनता कंटाळली आहे. आता परिवर्तनाचे पर्व सुरू झाले असून, लोकसभेला सांगलीत भाजपचा पराभव करणे आपले प्रमुख ध्येय असल्याचा पुनरुच्चार काँग्रेसचे युवानेते विशाल पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

 

विकास कामांबद्दल खासदार संजयकाका पाटील जनतेला मामा बनवत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, लोकसभेच्या उमेदवारीचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठीच घेतील, पण  आमच्यादृष्टीने उमेदवारीपेक्षा भाजपचा पराभव महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.पाटील म्हणाले की, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या परिवर्तनामुळे भाजपची लाट ओसरल्याचे स्पष्ट झाले. या निकालातून भाजपची उलटी मोजणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला दाम आणि तरुणांच्या हाताला काम हेच लोकांना हवे आहे.

लोकसभा निवडणुकीत जनता भाजपला धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. मोदींचा करिष्मा कमी झाला असल्याने केंद्रात काँग्रेस सत्तेवर येईल. सांगलीची उमेदवारी पक्ष ठरवेल, मात्र भाजपचा दारुण पराभव करणे,हेच आपले ध्येय आहे.खासदार संजयकाका पाटील जनतेला मामा बनवू लागले आहेत. काका म्हणतात की, सध्या जिल्'ात अकरा हजार कोटीची कामे सुरू आहेत. तसेच गेल्या पन्नास वर्षात जेवढा निधी आला नाही, तेवढा निधी भाजप सरकारने साडेचार वर्षात दिला आहे. मात्र त्यांचा हा दावा हास्यास्पद आहे.संजयकाकांनी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा ते कोणत्या पक्षात होते, याचा विसर त्यांना पडला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी असा त्यांनी प्रवास केला.

राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. विधानसभेची निवडणूक अपक्ष आणि काँग्रेसच्या चिन्हावर लढवली होती. कॉँग्रेसकडून महामंडळ अध्यक्षपद भोगले. तेव्हा विकास कामांसाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध झाला होता. गेल्या ५० वर्षांत जर निधी आला नसेल तर, ते काय करत होते? वास्तविक ते खासदार होण्यापूर्वी टेंभूचे पाणी आटपाडीमध्ये, तर म्हैसाळचे पाणी जतला पोहोचले होते. ताकारी, म्हैसाळ योजनांचे काम बहुतांशी पूर्ण झाले होते. जिल्'ातील महामार्गांची कामे जुनीच प्रस्तावित होती. निवडणुकीपूर्वी खासदारांनी जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करावीत. उद्योग, व्यवसाय आणून तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले, त्याचे काय झाले, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.जनसंपर्क अभियान राबविणारजिल्हा कॉँग्रेसच्यावतीने संपूर्ण जिल्'ात जनसंपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांचा पाढा जनतेसमोर मांडला जाईल. वाढती महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी, रखडलेली शेतकरी कर्जमाफी योजना, शेतकºयांचे घटलेले उत्पन्न याबाबत प्रबोधन केले जाईल. महापालिकेत भाजपची सत्ता आली आहे, मात्र प्रत्यक्षात कामांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. त्याविरोधात आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली